शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

जनतेनेच लगावली आहे त्यांच्या कानाखाली

By admin | Updated: May 11, 2017 02:01 IST

जनतेने ज्यांच्या कानाखाली वाजवून घरी बसविले, ते काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा करु नये.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : जनतेने ज्यांच्या कानाखाली वाजवून घरी बसविले, ते काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा करु नये. ती त्यांची लायकीच नाही. मुख्यमंत्री सोडा, त्यांनी एका कार्यकर्त्याच्या कानाखाली वाजवून दाखवावी, असे प्रतिआव्हान भाजपाच्या नेत्यांनी बुधवारी दिले. २७ गावांच्या विकासाचे घोंगडे काँग्रेसच्या आघाडी सरकारने भिजत ठेवल्याने या गावांचा विकास झाला नाही. तेव्हा सत्ता हाती असताना २७ गावांचा विकास करण्यापासून चव्हाण यांचे हात कोणी बांधून ठेवले होते, असा सवाल भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थित केला. कल्याण-डोेंबिवली स्मार्ट सिटी होणार आहे. ठाकुर्ली मोठागाव-माणकोली खाडी पूल, दुर्गाडी खाडीपूल सदा पदरी करणे, मेट्रो ट्रेन आणि कल्याण ग्रोथ सेंटरसह रिंग रोड हे महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले. त्याचे कामही सुरु झालेले आहे. या सगळ््या गोष्टी कल्याण-डोंबिवलीसह २७ गावांच्या विकासासाठी आहेत. २७ गावातील ग्रोथ सेंटरसाठी एक हजार ८९ कोटीचा निधी दिला आहे. याची काही एक माहिती नसताना २७ गावांच्या विकासासाठी निधी दिला नाही हे जुनेच तुणतुणे वाजवित बसणे. तसेच साडेसहा हजार कोटींच्या घोषणेचा विरोधक किती काळ किस पाडत बसणार आहेत, असा सवाल त्यांनी केला. या घोषणेचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी वारंवार केला आहे. त्यांनी मंजूर केलेल्या सगळ््या प्रकल्पांची रक्कम एकत्रित केल्यास साडेसहा हजार कोटींच्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होईल. या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत चव्हाण यांनी केलेले बेताल वक्तव्य हे त्यांची लायकी नसतांना केले आहे. चव्हाण यांची बरोबरी मुख्यमंत्र्यांशी होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांविषयी काय व कसे बोलतो, याचे भान त्याना राहिलेले नाही. चव्हाण यांनी वायफळ बडबड केली आहे. यापुढे ते ठाणे जिल्ह्यात आले तर त्यांना भाजपचे कार्यकर्तेच धडा शिकवतील. त्यांनी अकलेचे तारे तोडू नयेत, असा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी दिला.चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करुन सवंग प्रसिद्धी मिळविली असली, तरी त्यांना भाजपचे आव्हान आहे की, त्यांनी भाजपच्या साध्या कार्यकर्त्याच्या कानफटात मारुन दाखवावी. मुख्यमंत्री खूप लांबची गोष्ट आहे, असे भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी बजावले. २७ गावांच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केल्याने सर्वपक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांना विचारता ते म्हणाले, चव्हाण यांनी केलेले वक्तव्य हे केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी केले असून त्यांची ही स्टंटबाजी आहे. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असे वक्तव्य चव्हाणच काय कोणीही करु नये. साडेसहा हजार कोटी रुपये कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आराखड्यावर खर्च करु, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. हा विषय जुना आहे. त्याचा संबंध २७ गावाशी जोडणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन दिले आहे. दिलेला शब्द ते पाळणार आहेत. त्यांच्याच पक्षातील काही मंडळींचा विरोध असल्याने निर्णय लांबणीवर पडला असला, तरी आज ना उद्या मुख्यमंत्री तो निर्णय घेतील यावर आमचा विश्वास आहे. या तापलेल्या तव्यावर इतरांनी राजकीय पोळी भाजून खालच्या स्तराची भाषा करु नये, अशी आमची अपेक्षा आहे, असा टोला वझे यांनी लगावला.