शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

जनतेनेच लगावली आहे त्यांच्या कानाखाली

By admin | Updated: May 11, 2017 02:01 IST

जनतेने ज्यांच्या कानाखाली वाजवून घरी बसविले, ते काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा करु नये.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : जनतेने ज्यांच्या कानाखाली वाजवून घरी बसविले, ते काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा करु नये. ती त्यांची लायकीच नाही. मुख्यमंत्री सोडा, त्यांनी एका कार्यकर्त्याच्या कानाखाली वाजवून दाखवावी, असे प्रतिआव्हान भाजपाच्या नेत्यांनी बुधवारी दिले. २७ गावांच्या विकासाचे घोंगडे काँग्रेसच्या आघाडी सरकारने भिजत ठेवल्याने या गावांचा विकास झाला नाही. तेव्हा सत्ता हाती असताना २७ गावांचा विकास करण्यापासून चव्हाण यांचे हात कोणी बांधून ठेवले होते, असा सवाल भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थित केला. कल्याण-डोेंबिवली स्मार्ट सिटी होणार आहे. ठाकुर्ली मोठागाव-माणकोली खाडी पूल, दुर्गाडी खाडीपूल सदा पदरी करणे, मेट्रो ट्रेन आणि कल्याण ग्रोथ सेंटरसह रिंग रोड हे महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले. त्याचे कामही सुरु झालेले आहे. या सगळ््या गोष्टी कल्याण-डोंबिवलीसह २७ गावांच्या विकासासाठी आहेत. २७ गावातील ग्रोथ सेंटरसाठी एक हजार ८९ कोटीचा निधी दिला आहे. याची काही एक माहिती नसताना २७ गावांच्या विकासासाठी निधी दिला नाही हे जुनेच तुणतुणे वाजवित बसणे. तसेच साडेसहा हजार कोटींच्या घोषणेचा विरोधक किती काळ किस पाडत बसणार आहेत, असा सवाल त्यांनी केला. या घोषणेचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी वारंवार केला आहे. त्यांनी मंजूर केलेल्या सगळ््या प्रकल्पांची रक्कम एकत्रित केल्यास साडेसहा हजार कोटींच्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होईल. या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत चव्हाण यांनी केलेले बेताल वक्तव्य हे त्यांची लायकी नसतांना केले आहे. चव्हाण यांची बरोबरी मुख्यमंत्र्यांशी होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांविषयी काय व कसे बोलतो, याचे भान त्याना राहिलेले नाही. चव्हाण यांनी वायफळ बडबड केली आहे. यापुढे ते ठाणे जिल्ह्यात आले तर त्यांना भाजपचे कार्यकर्तेच धडा शिकवतील. त्यांनी अकलेचे तारे तोडू नयेत, असा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी दिला.चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करुन सवंग प्रसिद्धी मिळविली असली, तरी त्यांना भाजपचे आव्हान आहे की, त्यांनी भाजपच्या साध्या कार्यकर्त्याच्या कानफटात मारुन दाखवावी. मुख्यमंत्री खूप लांबची गोष्ट आहे, असे भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी बजावले. २७ गावांच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केल्याने सर्वपक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांना विचारता ते म्हणाले, चव्हाण यांनी केलेले वक्तव्य हे केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी केले असून त्यांची ही स्टंटबाजी आहे. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असे वक्तव्य चव्हाणच काय कोणीही करु नये. साडेसहा हजार कोटी रुपये कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आराखड्यावर खर्च करु, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. हा विषय जुना आहे. त्याचा संबंध २७ गावाशी जोडणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन दिले आहे. दिलेला शब्द ते पाळणार आहेत. त्यांच्याच पक्षातील काही मंडळींचा विरोध असल्याने निर्णय लांबणीवर पडला असला, तरी आज ना उद्या मुख्यमंत्री तो निर्णय घेतील यावर आमचा विश्वास आहे. या तापलेल्या तव्यावर इतरांनी राजकीय पोळी भाजून खालच्या स्तराची भाषा करु नये, अशी आमची अपेक्षा आहे, असा टोला वझे यांनी लगावला.