शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागाने दुष्काळाशी सामना

By admin | Updated: January 4, 2016 03:13 IST

दुष्काळाने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक घट्ट करण्याचीही गरज आहे. सर्वकाही संपले, अशी भावना निर्माण झाल्यानेच शेतकरी गळफासाकडे वळत असता

प्रताप नलावडे,  बीडदुष्काळाने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक घट्ट करण्याचीही गरज आहे. सर्वकाही संपले, अशी भावना निर्माण झाल्यानेच शेतकरी गळफासाकडे वळत असताना, त्यांच्यात उभारी निर्माण करण्याचे आणि दुष्काळाशी चार हात करण्यासाठी बळ देण्याचे काम अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ने हाती घेतले आहे. बीड जिल्ह्यातील लोळदगाव येथून त्यांनी या कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे.पाणीटंचाई हीच शेतकऱ्यांची मोठी समस्या असल्याचे लक्षात आल्यावर, नाना आणि मकरंद यांनी या समस्येबाबत काय करता येईल, याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. साताऱ्यात डॉ. अविनाश पोळ यांनी पाणलोटच्या केलेल्या कामाचा आढावा घेतला आणि पाणलोटची कामे केली, तर कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल, या निष्कर्षापर्यंत आम्ही सर्व जण पोहोचलो, असे ‘नाम’चे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके सांगतात. त्यानुसार, बीड जिल्ह्यात पहिल्यांदा सुरुवात करायची आणि त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात कामसुरू करण्याचे ठरले. बीडपासून ८-१० किलोमीटर अंतरावरील लोळदगावया गावाची निवड यासाठी केली. गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून ४ लाख रुपये जमा केले आणि बिंदुसरा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती आणि खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले, असे सांगत‘कृषी भूषण’ आणि नामचे जिल्हा समन्वयक शिवराम घोडके म्हणाले, ‘यामुळे गावाचा पाणीप्रश्न सुटणारतर आहेच, परंतु शेजारच्याकिणीपाई, नामलगाव, कुर्ला आणि बेलापुरी या गावांनाही याचा फायदा होणार आहे.’नामचे महाराष्ट्र समन्वयक केशव आघाव यांनी स्वत:च्या ५ पोकलेन मशीन दिल्या असून, आणखी १५ मशीनची व्यवस्था केली आहे. मशीनच्या डिझेलसाठी काही डॉक्टर मंडळींनी पुढाकार घेतला आहे. शासकीय पातळीवर दीड कोटी रुपयांचे बजेट असलेले काम लोकसहभागातून अवघ्या २० लाखांत पूर्ण होऊ लागले आहे. लोकसहभागातून झालेल्या या कामाने एक आदर्श निर्माण केला आहे. बीड जिल्ह्यातून त्याची सुरुवात झाली.