शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

लोकसहभागाने दुष्काळाशी सामना

By admin | Updated: January 4, 2016 03:13 IST

दुष्काळाने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक घट्ट करण्याचीही गरज आहे. सर्वकाही संपले, अशी भावना निर्माण झाल्यानेच शेतकरी गळफासाकडे वळत असता

प्रताप नलावडे,  बीडदुष्काळाने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक घट्ट करण्याचीही गरज आहे. सर्वकाही संपले, अशी भावना निर्माण झाल्यानेच शेतकरी गळफासाकडे वळत असताना, त्यांच्यात उभारी निर्माण करण्याचे आणि दुष्काळाशी चार हात करण्यासाठी बळ देण्याचे काम अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ने हाती घेतले आहे. बीड जिल्ह्यातील लोळदगाव येथून त्यांनी या कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे.पाणीटंचाई हीच शेतकऱ्यांची मोठी समस्या असल्याचे लक्षात आल्यावर, नाना आणि मकरंद यांनी या समस्येबाबत काय करता येईल, याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. साताऱ्यात डॉ. अविनाश पोळ यांनी पाणलोटच्या केलेल्या कामाचा आढावा घेतला आणि पाणलोटची कामे केली, तर कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल, या निष्कर्षापर्यंत आम्ही सर्व जण पोहोचलो, असे ‘नाम’चे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके सांगतात. त्यानुसार, बीड जिल्ह्यात पहिल्यांदा सुरुवात करायची आणि त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात कामसुरू करण्याचे ठरले. बीडपासून ८-१० किलोमीटर अंतरावरील लोळदगावया गावाची निवड यासाठी केली. गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून ४ लाख रुपये जमा केले आणि बिंदुसरा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती आणि खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले, असे सांगत‘कृषी भूषण’ आणि नामचे जिल्हा समन्वयक शिवराम घोडके म्हणाले, ‘यामुळे गावाचा पाणीप्रश्न सुटणारतर आहेच, परंतु शेजारच्याकिणीपाई, नामलगाव, कुर्ला आणि बेलापुरी या गावांनाही याचा फायदा होणार आहे.’नामचे महाराष्ट्र समन्वयक केशव आघाव यांनी स्वत:च्या ५ पोकलेन मशीन दिल्या असून, आणखी १५ मशीनची व्यवस्था केली आहे. मशीनच्या डिझेलसाठी काही डॉक्टर मंडळींनी पुढाकार घेतला आहे. शासकीय पातळीवर दीड कोटी रुपयांचे बजेट असलेले काम लोकसहभागातून अवघ्या २० लाखांत पूर्ण होऊ लागले आहे. लोकसहभागातून झालेल्या या कामाने एक आदर्श निर्माण केला आहे. बीड जिल्ह्यातून त्याची सुरुवात झाली.