शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

देशातील जनता सर्वात स्मार्ट - नरेंद्र मोदी

By admin | Updated: June 25, 2016 18:27 IST

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्मार्ट सिटी योजनेचं उद्घाटन करण्यात आलं, यावेळी बोलताना मराठीतून सर्वांना नमस्कार करून मोदींनी भाषणाला सुरुवात केली

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 25 - देशातील जनता सर्वात स्मार्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्मार्ट सिटी योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. पुणे महापालिकेचे महापौर प्रशांत जगताप यांनी नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. यावेळी बोलताना मराठीतून सर्वांना नमस्कार करून मोदींनी भाषणाला सुरुवात केली. 
 
जगातील अनेक देश आपल्यानंतर स्वतंत्र झाले, गरिब परिस्थितीतून येऊनही त्यांनी विकास केला. जर लोकांच्या हाती सुत्रं दिली तर सरकारची गरजही भासणार नाही. गरिबी हटवण्याची क्षमता शहरांमध्ये आहे. गरिबीला जेवढं जास्त पचवू शकू तेवढा विकास जास्त होईल असं सांगताना नरेंद्र मोदींनी शहरीकरण संकट नसून संधी असल्याचं म्हटलं आहे. शहरं सामर्थ्यवान असतील तर गरिबी मिटवू शकतील असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. 
 
टाकाऊपासून टिकाऊ तयार करण्याचं मिशन हाती घेण्यात येणार आहे. शहरातील कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प तयार करण्यात येणार असून, निर्माण करण्यात आलेल्या खतावर सबसिडी देण्याचाही सरकार विचार करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. तसंच सांडपाण्याचं योग्य नियोजन करण्यावर भर असल्याचंही मोदी बोलले आहेत.
 
 
प्रसारमाध्यमांनी स्मार्ट सिटी योजनेचं अभियान चालवल्याबद्दल मोदींनी प्रसारमाध्यमांच कौतुक करताना पाण्याची समस्या असल्यामुळे क्रिकेट मॅच दुसरीकडे खेळवण्याच्या बातम्या दाखवण्यावरुन टोमणाही मारला. पाणीटंचाईमुळे क्रिकेट सामना दुसरीकडे खेळवला तरी 350 दिवस म्हणजे रोजच खेळपट्टीवर पाणी मारावं लागतं असं सांगत मोदींनी प्रसारमाध्यमांवर टीका केली.
मोदींच्या भाषणातील मुद्दे - 
-मराठीतून सर्वांना नमस्कार करून नरेंद्र मोदींनी केली भाषणाला सुरुवात.
-सरकारची प्रगतीच्या दिशेने वाटचाल
-जगातील अनेक देश आपल्यानंतर स्वतंत्र झाले, गरिब परिस्थितीतून येऊनही त्यांनी विकास केला 
-देशाचा नागरिक सर्वात जास्त स्मार्ट 
-लोकांच्या हाती सुत्रं दिली तर सरकारची गरज भासणार नाही
-आपल्या देशात रस्त्याच्या एका बाजूला काम झालं, तर दुस-या बाजूचे आंदोलन करतात 
-शहरांची निवड आम्ही नाही केली, तर तिथल्या लोकांनी केली, त्यांचं अभिनंदन करा 
-काही प्रसारमाध्यमांचंही केलं अभिनंदन 
-सरकारी खजिन्यातून मिळणा-या योजनाच प्रसिद्ध होत होत्या मात्र आता स्वच्छता आपल्या देशात लोकप्रिय विषय झाला -आहे 
-शहरीकरणाला खूप मोठं संकट मानलं जायचं, शहरीकरणाला समस्या नाही तर संधी म्हणून पाहावं 
-आर्थिक क्षेत्रातील लोक विकासाच्या दृष्टीने शहराकडे पाहतात 
-गरिबी सांभाळण्याची जास्त ताकद शहराकडे असते 
-प्रत्येक शहराची वेगळी आत्मा, ओळख असते 
-तंत्रज्ञानाचं रुपांतर सामूहिक सेवेत केलं गेलं पाहिजे 
-एकत्रित विचार केला नाही तर विकास होणार नाही -
-आजकाल पाण्याचं संकट आहे, प्रसारमाध्यम पण कमाल करतात, पाणी वाया जातं म्हणून क्रिकेट मॅच दुसरीकडे खेळायला लावतात 
-क्रिकेट मैदानावर 365 दिवस पाणी मारायलाच लागत 
-सांडपाण्याचं रुपांतर शुद्ध पाण्यात करणार 
-योजना नाही तर लोकांमुळे देशाचा विकास होतो 
-सर्व राज्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन करतो
-25 लाख लोकांनी स्मार्ट सिटीवर सूचना पाठवल्या 
-गरिबीला जेवढं जास्त पचवू शकू तेवढा विकास जास्त होईल 
-टाकाऊपासून टिकाऊ तयार करण्याचं मिशन
-निर्माण कऱण्यात आलेल्या खतावर सबसिडी देण्याचाही सरकार विचार