शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

‘पेंग्विन’ लगीनघाई...!

By admin | Updated: March 4, 2017 01:41 IST

महापालिका निवडणुका पार पडून पंधरवडा उलटला तरी अद्याप मुंबईकर पेंग्विन दर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.

मुंबई : महापालिका निवडणुका पार पडून पंधरवडा उलटला तरी अद्याप मुंबईकर पेंग्विन दर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात सत्ता स्थापनेबाबत अनिश्चिती असल्याने आपल्या कारकीर्दीत या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची घाई शिवसेनेच्या शिलेदारांना लागली आहे. भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेत दक्षिण कोरियातून आठ हम्बोल्ट जातीचे पेंग्विन महापालिकेने आणले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या प्रकल्पाचा श्रेय महापालिका निवडणुकीत घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू होता. मात्र आॅक्टोबर महिन्यात एका पेंग्विनच्या मृत्यूने शिवसेना टीकेची धनी बनली. लोकायुक्त आणि झू एथोरिटी यांनी घेतलेला आक्षेप, आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयावर झालेल्या हानीनंतर पेंग्विन दर्शन लांबणीवर पडले. त्यात पेंग्विनसाठी विशेष व्यवस्था करण्यातही महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याने उद्घाटनाची तारीख तीनवेळा पुढे ढकलण्यात आली. मात्र निवडणुकीनंतरही पेंग्विनच्या दर्शनाला मुहूर्त नाही.महापालिका निवडणुकीत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे या बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे नगरसेवकपदाचे त्यांची कारकीर्द संपुष्टात आली आहे. म्हणून ८ मार्च ला नगरसेवकपदाचा काळ संपण्याआधी जाता जाता पेंग्विन उद्घाटन करून जावे, अशी या शिलेदारांची इच्छा आहे. तसा दबावही त्यांनी प्रशासनावर आणला आहे. पेंग्विनच्या दर्शनासाठी मुंबईकरांसोबतच माजी नगरसेवक आतुर झाल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)मुंबई: मुंबईकरांनाही पेंग्विनचा लाईव्ह शो बघू द्या, असे म्हणत उच्च न्यायालयाने दक्षिण कोरियामधून भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात आणलेल्या सात पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांसाठी खुले करण्यावर स्थगिती देण्यास नकार दिला. महापालिका त्यांची काळजी घेत नाही, असा निष्कर्ष घाईघाईत काढणार नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.>प्रशासनाने फेरले पाणी पेंग्विनसाठी आवश्यक असलेले वातावरण निर्मिती आणि पाणी नमुना तपासणी सुरु आहे. पाण्याचे नमुने अयोग्य असल्याने पेंग्विनना हानी पोहचू शकते. पाण्याचा नमुना चाचणीसाठी पाठवला आहे. तो योग्य आल्यास दोन-तीन दिवसात पेंग्विनना त्यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या काचेच्या घरात जातील. त्या नंतर १०-१५ दिवस पाहणी करून पेंग्विन दर्शन सुरु होईल, असे राणीबागचे अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. यामुळे सत्ताधारी शिवसेनेचा हिरमोड झाला.>मुंबईकरांना लाइव्ह शो बघू द्या - हायकोर्टद. कोरियातून मुंबईत आणलेल्या पेंग्विनची भायखळा प्राणीसंग्रहालय प्रशासन योग्य ती काळजी घेत नाही. त्याशिवाय मुंबईतील हवामान त्यांच्यासाठी पोषक नसल्याने त्यांना द. कोरियात पाठवावे, अशी मागणी चार-पाच वकिलांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. ही याचिका प्रलंबित असेपर्यंत पेंग्विनचे दर्शन सामान्यांसाठी खुले करू नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी खंडपीठाला केली. त्यावर महापालिकेच्या वकिलांनी अद्याप पेंग्विनचे दर्शन लोकांसाठी खुले केले नसल्याची माहिती खंडपीठाला दिली. पेंग्विना पुढील आठवड्यात क्वारेंटाईनमध्ये हलवण्यात येईल. तेथे त्यांना आवश्यक असलेले वातावरण तयार करण्यात आले आहे, अशीही माहिती महापालिकेने खंडपीठाला दिली. ‘पेंग्विनची काळजी घेण्यात येत नाही, असा निष्कर्ष आम्ही काढणार नाही. त्यामुळे सामान्यांसाठी त्यांचे दर्शन खुले करण्यापासून आम्ही प्रशासनाला अडवू शकत नाही. मुंबईकरांनी पेंग्विनची मजा का घेऊ नये? त्यांनाही लाईव्ह शो पाहू द्या. अन्य देशांमध्ये नागरिकांना पेंग्विन पाहण्यास बंदी घातली आहे का?’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच सुनावले. जुलै २०१६ मध्ये द. कोरियामधून भायखळयाच्या प्राणीसंग्रहालयात आठ पेंग्विन आणण्यात आले. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण चांगलेच पेटले.मात्र महापालिकेने उरलेल्या पेंग्विनसाठी क्वारेंटाईन बांधण्यास सुरुवात केली. क्वारेंटाईनचे काम पूर्ण झाले असून ७ किंवा ८ मार्चला त्यांना येथे हलवण्यात येईल.