शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

‘पेंग्विन’ लगीनघाई...!

By admin | Updated: March 4, 2017 01:41 IST

महापालिका निवडणुका पार पडून पंधरवडा उलटला तरी अद्याप मुंबईकर पेंग्विन दर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.

मुंबई : महापालिका निवडणुका पार पडून पंधरवडा उलटला तरी अद्याप मुंबईकर पेंग्विन दर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात सत्ता स्थापनेबाबत अनिश्चिती असल्याने आपल्या कारकीर्दीत या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची घाई शिवसेनेच्या शिलेदारांना लागली आहे. भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेत दक्षिण कोरियातून आठ हम्बोल्ट जातीचे पेंग्विन महापालिकेने आणले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या प्रकल्पाचा श्रेय महापालिका निवडणुकीत घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू होता. मात्र आॅक्टोबर महिन्यात एका पेंग्विनच्या मृत्यूने शिवसेना टीकेची धनी बनली. लोकायुक्त आणि झू एथोरिटी यांनी घेतलेला आक्षेप, आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयावर झालेल्या हानीनंतर पेंग्विन दर्शन लांबणीवर पडले. त्यात पेंग्विनसाठी विशेष व्यवस्था करण्यातही महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याने उद्घाटनाची तारीख तीनवेळा पुढे ढकलण्यात आली. मात्र निवडणुकीनंतरही पेंग्विनच्या दर्शनाला मुहूर्त नाही.महापालिका निवडणुकीत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे या बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे नगरसेवकपदाचे त्यांची कारकीर्द संपुष्टात आली आहे. म्हणून ८ मार्च ला नगरसेवकपदाचा काळ संपण्याआधी जाता जाता पेंग्विन उद्घाटन करून जावे, अशी या शिलेदारांची इच्छा आहे. तसा दबावही त्यांनी प्रशासनावर आणला आहे. पेंग्विनच्या दर्शनासाठी मुंबईकरांसोबतच माजी नगरसेवक आतुर झाल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)मुंबई: मुंबईकरांनाही पेंग्विनचा लाईव्ह शो बघू द्या, असे म्हणत उच्च न्यायालयाने दक्षिण कोरियामधून भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात आणलेल्या सात पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांसाठी खुले करण्यावर स्थगिती देण्यास नकार दिला. महापालिका त्यांची काळजी घेत नाही, असा निष्कर्ष घाईघाईत काढणार नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.>प्रशासनाने फेरले पाणी पेंग्विनसाठी आवश्यक असलेले वातावरण निर्मिती आणि पाणी नमुना तपासणी सुरु आहे. पाण्याचे नमुने अयोग्य असल्याने पेंग्विनना हानी पोहचू शकते. पाण्याचा नमुना चाचणीसाठी पाठवला आहे. तो योग्य आल्यास दोन-तीन दिवसात पेंग्विनना त्यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या काचेच्या घरात जातील. त्या नंतर १०-१५ दिवस पाहणी करून पेंग्विन दर्शन सुरु होईल, असे राणीबागचे अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. यामुळे सत्ताधारी शिवसेनेचा हिरमोड झाला.>मुंबईकरांना लाइव्ह शो बघू द्या - हायकोर्टद. कोरियातून मुंबईत आणलेल्या पेंग्विनची भायखळा प्राणीसंग्रहालय प्रशासन योग्य ती काळजी घेत नाही. त्याशिवाय मुंबईतील हवामान त्यांच्यासाठी पोषक नसल्याने त्यांना द. कोरियात पाठवावे, अशी मागणी चार-पाच वकिलांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. ही याचिका प्रलंबित असेपर्यंत पेंग्विनचे दर्शन सामान्यांसाठी खुले करू नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी खंडपीठाला केली. त्यावर महापालिकेच्या वकिलांनी अद्याप पेंग्विनचे दर्शन लोकांसाठी खुले केले नसल्याची माहिती खंडपीठाला दिली. पेंग्विना पुढील आठवड्यात क्वारेंटाईनमध्ये हलवण्यात येईल. तेथे त्यांना आवश्यक असलेले वातावरण तयार करण्यात आले आहे, अशीही माहिती महापालिकेने खंडपीठाला दिली. ‘पेंग्विनची काळजी घेण्यात येत नाही, असा निष्कर्ष आम्ही काढणार नाही. त्यामुळे सामान्यांसाठी त्यांचे दर्शन खुले करण्यापासून आम्ही प्रशासनाला अडवू शकत नाही. मुंबईकरांनी पेंग्विनची मजा का घेऊ नये? त्यांनाही लाईव्ह शो पाहू द्या. अन्य देशांमध्ये नागरिकांना पेंग्विन पाहण्यास बंदी घातली आहे का?’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच सुनावले. जुलै २०१६ मध्ये द. कोरियामधून भायखळयाच्या प्राणीसंग्रहालयात आठ पेंग्विन आणण्यात आले. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण चांगलेच पेटले.मात्र महापालिकेने उरलेल्या पेंग्विनसाठी क्वारेंटाईन बांधण्यास सुरुवात केली. क्वारेंटाईनचे काम पूर्ण झाले असून ७ किंवा ८ मार्चला त्यांना येथे हलवण्यात येईल.