शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

रस्त्याच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्यांना दंड ठोठवा

By admin | Updated: February 28, 2017 02:19 IST

रस्त्यांच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्या अभियंत्यांना व कंत्राटदारांकडून भरभक्कम दंड आकारा, अशी सूचना राज्य सरकार व महापालिकेला केली.

मुंबई : पावसाळ्यादरम्यान शहरातील एकही रस्ता खराब होता काम नये, याची खात्री करा, असे म्हणत, उच्च न्यायालयाने रस्त्यांच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्या अभियंत्यांना व कंत्राटदारांकडून भरभक्कम दंड आकारा, अशी सूचना राज्य सरकार व महापालिकेला केली. शहरातील खड्ड्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि वाहतूक विभागाच्या सहआयुक्तांना १० मार्च रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.रस्त्यांच्या खराब अवस्थेबद्दल विशेषत: पावसाळ्यात रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था असल्याने, उच्च न्यायालयाने याची स्वत:हून दखल घेत, याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर न्या. व्ही. एम.कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होती.सोमवारच्या सुनावणीत मध्यस्थींच्या वकिलांनी उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. ‘उच्च न्यायालयाच्या आदेशप्रमाणे नागरिकांच्या खड्ड्यासंबंधी तक्रारी दूर करण्यात येत नाहीत. खड्ड्यांमुळे अद्यापही खूप लोकांचा मृत्यू झाला आहे,’ अशी माहिती मध्यस्थींच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. मुंबई महापालिकतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सध्या ६४ मोठे रस्ते आणि १३ जंक्शनचे कामकाज सुरू असून, मेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती खंडपीठाला दिली.‘आत्तापर्यंत काहीही प्रगती करण्यात आलेली नाही. जरी रस्ते दुरुस्त केले किंवा नवीन बांधले, तरी पावसाळ्यात त्यांची दुर्दशा होतेच,’ असा शेरा खंडपीठाने मारला.‘हे सर्व कोणत्याही विभागात समन्वय नसल्याने होत आहे. त्यामुळे आम्ही महापालिका. एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, बीपीटी, एमएसआरडीसी आणि वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश देत आहोत,’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १० मार्च रोजी ठेवली आहे.वाहतूक विभागामुळे रस्ते दुरुस्त करता येत नाहीत, असे पालिकेने उच्च न्यायालयाला सांगितल्यावर, कोर्टाने प्रत्येक विभागाने रस्ते सुस्थितीत ठेवण्यास प्राधान्य द्यावे, असे म्हटले. (प्रतिनिधी)