शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रस्त्याच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्यांना दंड ठोठवा

By admin | Updated: February 28, 2017 02:19 IST

रस्त्यांच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्या अभियंत्यांना व कंत्राटदारांकडून भरभक्कम दंड आकारा, अशी सूचना राज्य सरकार व महापालिकेला केली.

मुंबई : पावसाळ्यादरम्यान शहरातील एकही रस्ता खराब होता काम नये, याची खात्री करा, असे म्हणत, उच्च न्यायालयाने रस्त्यांच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्या अभियंत्यांना व कंत्राटदारांकडून भरभक्कम दंड आकारा, अशी सूचना राज्य सरकार व महापालिकेला केली. शहरातील खड्ड्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि वाहतूक विभागाच्या सहआयुक्तांना १० मार्च रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.रस्त्यांच्या खराब अवस्थेबद्दल विशेषत: पावसाळ्यात रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था असल्याने, उच्च न्यायालयाने याची स्वत:हून दखल घेत, याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर न्या. व्ही. एम.कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होती.सोमवारच्या सुनावणीत मध्यस्थींच्या वकिलांनी उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. ‘उच्च न्यायालयाच्या आदेशप्रमाणे नागरिकांच्या खड्ड्यासंबंधी तक्रारी दूर करण्यात येत नाहीत. खड्ड्यांमुळे अद्यापही खूप लोकांचा मृत्यू झाला आहे,’ अशी माहिती मध्यस्थींच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. मुंबई महापालिकतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सध्या ६४ मोठे रस्ते आणि १३ जंक्शनचे कामकाज सुरू असून, मेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती खंडपीठाला दिली.‘आत्तापर्यंत काहीही प्रगती करण्यात आलेली नाही. जरी रस्ते दुरुस्त केले किंवा नवीन बांधले, तरी पावसाळ्यात त्यांची दुर्दशा होतेच,’ असा शेरा खंडपीठाने मारला.‘हे सर्व कोणत्याही विभागात समन्वय नसल्याने होत आहे. त्यामुळे आम्ही महापालिका. एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, बीपीटी, एमएसआरडीसी आणि वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश देत आहोत,’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १० मार्च रोजी ठेवली आहे.वाहतूक विभागामुळे रस्ते दुरुस्त करता येत नाहीत, असे पालिकेने उच्च न्यायालयाला सांगितल्यावर, कोर्टाने प्रत्येक विभागाने रस्ते सुस्थितीत ठेवण्यास प्राधान्य द्यावे, असे म्हटले. (प्रतिनिधी)