शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छता पसरवल्यास दंड!

By admin | Updated: September 24, 2016 01:39 IST

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून स्वच्छता सप्ताह साजरा केला जात

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहांतर्गत रेल्वे हद्दीत अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जात असून सात दिवसांत १ हजार ९६७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. हा सप्ताह २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून स्वच्छता सप्ताह साजरा करताना स्थानक, लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्या, रेल्वे कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. तसेच कार्यालय परिसर, लोको शेड व कारखान्यांमध्येही स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने साफसफाई मोहीम करतानाच जनजागृतीचे कार्यक्रमही केले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे स्वच्छता सप्ताह साजरा करतानाच अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशांविरोधातही कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेवर अस्वच्छता पसरवणाऱ्या १,०९९ प्रवाशांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ३ लाख एवढा दंड वसूल करण्यात आल्याचे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी सांगितले. १९७ मेल-एक्स्प्रेस ट्रेनपैकी विदर्भ एक्स्प्रेस, दुरोन्तो एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, जीटी एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, अनुव्रत एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि अन्य काही ट्रेनमधील जवळपास १५ हजार ७५१ प्रवाशांशी स्वच्छतेबाबत संपर्क साधण्यात आला. त्यातून १९२ जणांनी स्वच्छतेविषयी तक्रारी केल्या आणि यातील जवळपास १६८ तक्रारी सोडवल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवरही अशाच प्रकारची कारवाई करताना ८६८ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ८६ हजार रुपये एवढा दंड वसूल केल्याचे साहाय्यक विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>पश्चिम रेल्वेवर ३,१०० जणांवर कारवाईअस्वच्छता पसरवल्याने आॅगस्ट महिन्यात पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांत केलेल्या कारवाईत ३,१०० प्रवासी रेल्वेच्या जाळ्यात अडकले. त्यातून पश्चिम रेल्वेला ३.३९ लाख रुपये दंड मिळाला. स्वच्छता मोहिमेबाबत रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेने चतु:सूत्री अमलात आणली आहे. त्यानुसार जनजागृती, सुविधा पुरवणे, उपाययोजना आणि दंड आकारलाजात आहे. पश्चिम रेल्वेवर दर दिवशी १०० ते १२५ प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो. रेल्वे बोर्ड नियमानुसार दंड १०० ते ५०० रुपये एवढा आकारला जाऊ शकतो. यातील पहिल्या टप्प्यात १०० रुपये दंड जागेवरच आकारला जात आहे.