शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
3
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
4
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
5
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
6
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
7
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
8
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
9
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
10
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
11
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
12
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
13
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
14
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
15
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
16
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
17
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
18
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
19
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
20
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग

अस्वच्छता पसरवल्यास दंड!

By admin | Updated: September 24, 2016 01:39 IST

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून स्वच्छता सप्ताह साजरा केला जात

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहांतर्गत रेल्वे हद्दीत अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जात असून सात दिवसांत १ हजार ९६७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. हा सप्ताह २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून स्वच्छता सप्ताह साजरा करताना स्थानक, लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्या, रेल्वे कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. तसेच कार्यालय परिसर, लोको शेड व कारखान्यांमध्येही स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने साफसफाई मोहीम करतानाच जनजागृतीचे कार्यक्रमही केले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे स्वच्छता सप्ताह साजरा करतानाच अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशांविरोधातही कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेवर अस्वच्छता पसरवणाऱ्या १,०९९ प्रवाशांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ३ लाख एवढा दंड वसूल करण्यात आल्याचे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी सांगितले. १९७ मेल-एक्स्प्रेस ट्रेनपैकी विदर्भ एक्स्प्रेस, दुरोन्तो एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, जीटी एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, अनुव्रत एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि अन्य काही ट्रेनमधील जवळपास १५ हजार ७५१ प्रवाशांशी स्वच्छतेबाबत संपर्क साधण्यात आला. त्यातून १९२ जणांनी स्वच्छतेविषयी तक्रारी केल्या आणि यातील जवळपास १६८ तक्रारी सोडवल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवरही अशाच प्रकारची कारवाई करताना ८६८ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ८६ हजार रुपये एवढा दंड वसूल केल्याचे साहाय्यक विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>पश्चिम रेल्वेवर ३,१०० जणांवर कारवाईअस्वच्छता पसरवल्याने आॅगस्ट महिन्यात पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांत केलेल्या कारवाईत ३,१०० प्रवासी रेल्वेच्या जाळ्यात अडकले. त्यातून पश्चिम रेल्वेला ३.३९ लाख रुपये दंड मिळाला. स्वच्छता मोहिमेबाबत रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेने चतु:सूत्री अमलात आणली आहे. त्यानुसार जनजागृती, सुविधा पुरवणे, उपाययोजना आणि दंड आकारलाजात आहे. पश्चिम रेल्वेवर दर दिवशी १०० ते १२५ प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो. रेल्वे बोर्ड नियमानुसार दंड १०० ते ५०० रुपये एवढा आकारला जाऊ शकतो. यातील पहिल्या टप्प्यात १०० रुपये दंड जागेवरच आकारला जात आहे.