शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

अस्वच्छता पसरवल्यास दंड!

By admin | Updated: September 24, 2016 01:39 IST

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून स्वच्छता सप्ताह साजरा केला जात

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहांतर्गत रेल्वे हद्दीत अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जात असून सात दिवसांत १ हजार ९६७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. हा सप्ताह २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून स्वच्छता सप्ताह साजरा करताना स्थानक, लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्या, रेल्वे कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. तसेच कार्यालय परिसर, लोको शेड व कारखान्यांमध्येही स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने साफसफाई मोहीम करतानाच जनजागृतीचे कार्यक्रमही केले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे स्वच्छता सप्ताह साजरा करतानाच अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशांविरोधातही कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेवर अस्वच्छता पसरवणाऱ्या १,०९९ प्रवाशांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ३ लाख एवढा दंड वसूल करण्यात आल्याचे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी सांगितले. १९७ मेल-एक्स्प्रेस ट्रेनपैकी विदर्भ एक्स्प्रेस, दुरोन्तो एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, जीटी एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, अनुव्रत एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि अन्य काही ट्रेनमधील जवळपास १५ हजार ७५१ प्रवाशांशी स्वच्छतेबाबत संपर्क साधण्यात आला. त्यातून १९२ जणांनी स्वच्छतेविषयी तक्रारी केल्या आणि यातील जवळपास १६८ तक्रारी सोडवल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवरही अशाच प्रकारची कारवाई करताना ८६८ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ८६ हजार रुपये एवढा दंड वसूल केल्याचे साहाय्यक विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>पश्चिम रेल्वेवर ३,१०० जणांवर कारवाईअस्वच्छता पसरवल्याने आॅगस्ट महिन्यात पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांत केलेल्या कारवाईत ३,१०० प्रवासी रेल्वेच्या जाळ्यात अडकले. त्यातून पश्चिम रेल्वेला ३.३९ लाख रुपये दंड मिळाला. स्वच्छता मोहिमेबाबत रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेने चतु:सूत्री अमलात आणली आहे. त्यानुसार जनजागृती, सुविधा पुरवणे, उपाययोजना आणि दंड आकारलाजात आहे. पश्चिम रेल्वेवर दर दिवशी १०० ते १२५ प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो. रेल्वे बोर्ड नियमानुसार दंड १०० ते ५०० रुपये एवढा आकारला जाऊ शकतो. यातील पहिल्या टप्प्यात १०० रुपये दंड जागेवरच आकारला जात आहे.