शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

खड्ड्यांस जबाबदारांकडून दंड आकारा

By admin | Updated: November 8, 2015 00:35 IST

उल्हासनगर शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल चिंता व्यक्त करीत रस्त्यांवरील खड्डे भरणाऱ्या कंत्राटदारांशी करण्यात येणाऱ्या करारात जाचक अटी घालाव्यात आणि प्रसंगी

मुंबई : उल्हासनगर शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल चिंता व्यक्त करीत रस्त्यांवरील खड्डे भरणाऱ्या कंत्राटदारांशी करण्यात येणाऱ्या करारात जाचक अटी घालाव्यात आणि प्रसंगी त्यांच्याकडून दंडही आकारावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने उल्हासनगर महापालिकेला केली.जे कंत्राटदार चांगल्या दर्जाचे काम करणार नाहीत त्यांना ब्लॅकलिस्ट करा. खड्डे भरण्याच्या कामाची व्हीडिओग्राफी करा, असे म्हणत न्या. नरेश पाटील आणि न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने महापालिका आयुक्तांना निविदामध्ये आणि करारात काय बदल करण्यात येणार आहेत, यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. कंत्राटदार खड्डे भरण्याचे आणि पॅच वर्क नीट करीत नसल्याने महापालिकेला या कामासाठी वारंवार निविदा काढाव्या लागतात. या कामांसाठी सिमेंट काँक्रिटऐवजी कंत्राटदार मातीचा वापर करतात. परिणामी पावसाळ्यात ही माती निघून जाते. महापालिकेला यावर ठोस तोडगा काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उल्हासनगरचे रहिवासी प्रकाश कुकरेजा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान खंडपीठाने वरील सूचना महापालिकेला केल्या. एखाद्या कंत्राटदाराने करारानुसार काम केले नाही आणि जनतेचा निधी वाया गेला, असे महापालिकेला वाटले, तर त्यांनी संबधित कंत्राटदाराला भविष्यात निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ देऊ नये, असेही खंडपीठाने म्हटले. या याचिकेवरील पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी होणार आहे. तसेच याचिकेमध्ये महापालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांवर करण्यात आलेल्या आरोपांची दखल घेऊन संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा, असे निर्देशही खंडपीठाने महापालिका आयुक्तांना दिले. (प्रतिनिधी)