शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

जमिनी परत मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पेलेट गनचा मारा; १४ जण जखमी

By admin | Updated: June 23, 2017 03:10 IST

धावपट्टी उभारणीसाठी ब्रिटिशांनी घेतलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवरून गुरुवारी १७ गावांतील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : धावपट्टी उभारणीसाठी ब्रिटिशांनी घेतलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवरून गुरुवारी १७ गावांतील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी टायर, वाहने पेटवून देत काटईनाका-बदलापूर रस्त्यावरील वाहतूक सहा तास रोखून धरली. आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली, तर या हिंसक जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी पेलेट गनमधून गोळीबार केला. यात पोलिसांसह २६ जण जखमी झाले. मात्र ही जमीन आपल्याच मालिकीची असल्याचा दावा संरक्षण विभागाने केला आहे.दुसऱ्या महायुद्धावेळी ब्रिटिशांनी घेतलेल्या १७ गावांतील या शेतजमिनींचा ताबा सध्या नौदलाकडे आहे. त्यांनी भिंत बांधण्याचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांना आत जाण्यास मज्जाव केल्याविरोधात जमीन बचाव आंदोलन समितीने काटई नाका-बदलापूर रस्त्यावरील नेवाळी नाक्यावर रास्ता रोकोचा इशारा दिला होता. नौदल उभारत असलेल्या संरक्षक भिंतीला काही शेतकऱ्यांनी विरोध केला आणि शेतात जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. तेव्हा चारही बाजूंनी आलेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने नेवाळी नाक्यावरील पोलिसांची व्हॅन जाळली. तसेच अंबरनाथच्या दिशेने व खोणीच्या दिशेने रस्त्यावर टायर जाळले आणि १५ खासगी तर पोलिसांच्या दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत १२ पोलीस; तर गोळीबारात १४ शेतकरी जखमी झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तणावपूर्ण शांतता आहे. मात्र जमिनी ताब्यात मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने पोलीस बंदोबस्त कायम आहे.