शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी परत मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पेलेट गनचा मारा; १४ जण जखमी

By admin | Updated: June 23, 2017 03:10 IST

धावपट्टी उभारणीसाठी ब्रिटिशांनी घेतलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवरून गुरुवारी १७ गावांतील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : धावपट्टी उभारणीसाठी ब्रिटिशांनी घेतलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवरून गुरुवारी १७ गावांतील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी टायर, वाहने पेटवून देत काटईनाका-बदलापूर रस्त्यावरील वाहतूक सहा तास रोखून धरली. आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली, तर या हिंसक जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी पेलेट गनमधून गोळीबार केला. यात पोलिसांसह २६ जण जखमी झाले. मात्र ही जमीन आपल्याच मालिकीची असल्याचा दावा संरक्षण विभागाने केला आहे.दुसऱ्या महायुद्धावेळी ब्रिटिशांनी घेतलेल्या १७ गावांतील या शेतजमिनींचा ताबा सध्या नौदलाकडे आहे. त्यांनी भिंत बांधण्याचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांना आत जाण्यास मज्जाव केल्याविरोधात जमीन बचाव आंदोलन समितीने काटई नाका-बदलापूर रस्त्यावरील नेवाळी नाक्यावर रास्ता रोकोचा इशारा दिला होता. नौदल उभारत असलेल्या संरक्षक भिंतीला काही शेतकऱ्यांनी विरोध केला आणि शेतात जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. तेव्हा चारही बाजूंनी आलेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने नेवाळी नाक्यावरील पोलिसांची व्हॅन जाळली. तसेच अंबरनाथच्या दिशेने व खोणीच्या दिशेने रस्त्यावर टायर जाळले आणि १५ खासगी तर पोलिसांच्या दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत १२ पोलीस; तर गोळीबारात १४ शेतकरी जखमी झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तणावपूर्ण शांतता आहे. मात्र जमिनी ताब्यात मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने पोलीस बंदोबस्त कायम आहे.