शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पादचारी पूल छपराविना

By admin | Updated: April 5, 2017 02:38 IST

गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेला आणि फलाटाला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाची दुरुस्ती करून, अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला

मनोहर कुंभेजकर,मुंबई- गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेला आणि फलाटाला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाची दुरुस्ती करून, अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला असून, चर्चगेटच्या दिशेने असलेला सदर पादचारी पूल छपराविना आहे. त्यामुळे सध्याच्या रखरखत्या ऊन्हात हजारो प्रवाशांना ऊन्हाच्या झळा बसत आहे.दररोज हजारो प्रवासी आणि पादचारी येथील पुलाचा वापर करतात. सध्याच्या ऐन उन्हाळ्यात पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांना ऊन्हाचे चटके सहन करत, रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. या प्रकरणी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी ही बाब संबंधित रेल्वे अधिकाऱ्याकडे दाखल करत, पादचारी पुलावर छप्पर बसवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून या पादचारी पुलावरून पादचारी आणि प्रवासी भर ऊन्हातून जाताना, त्यांना ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातच हा पादचारी पुलाचा तळ पत्र्याचा असल्यामुळे, त्यांना कडकडत्या ऊन्हाचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे गोरेगावकर त्रस्त झाले आहेत. या पादचारी पुलावरून दररोज हजारो प्रवासी ये—जा करत असतानाही रेल्वे प्रशासन पुलावर छप्पर का बसवत नाही? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.सदर पादचारी पूल हा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या अख्यारित येत आहे. त्यांनीच या पुलाची दुरुस्ती केलेली आहे. त्यामुळे या पुलावर कधी छप्पर बसविण्यात येईल, यांचे रेल्वे प्रशासनाकडे उत्तर नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडे बोट दाखविले आहे. मात्र, याचा त्रास प्रवाशांना होत आहे.