शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

शेतकऱ्यांना पीक कर्ज !

By admin | Updated: July 20, 2016 04:20 IST

आतापर्यंत १३७ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केल्याचा दावा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने केला आहे.

सुरेश लोखंडे,

ठाणे- खरिपाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना होत असलेली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आतापर्यंत १३७ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केल्याचा दावा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने केला आहे. या वर्षी दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रब्बी कर्जापोटी ४५ कोटी, तर खरीप कर्जापोटी १६५ कोटी ८० रुपये वाटप करण्याचे नियोजन टीडीसीसी बँकेने केले आहे. यापैकी २६ हजार २१ शेतकऱ्यांना १३७ कोटी २५ लाखांचे खरीप पीककर्जवाटप केले आहे. २४ हजार ८१० हेक्टर शेतातील पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना हा कर्जपुरवठा केला असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी लोकमतला सांगितले. ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ६०३ शेतकऱ्यांनी त्यांच्या १३ हजार २१९ हेक्टर शेतावरील पिकांच्या उमेदीवर ७४ कोटी ५४ लाख रुपये कर्ज घेतले आहे. तर, पालघर जिल्ह्यातील १० हजार ४१८ शेतकऱ्यांनी ११ हजार ५९० शेतीवर ६२ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनादेखील या पीककर्जाचा लाभ ३० सप्टेंबरपर्यंत घेता येणार आहे. तर, पंतप्रधान पीकविम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत बँकेत अर्ज दाखल करणे अपेक्षित असल्याचे टीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांनी नमूद केले.>बँकेच्या ५९ शाखांद्वारे कर्जवाटप; पालघरमध्येही ३० शाखाशेतकऱ्यांना टीडीसीसी बँकेच्या ५९ शाखांद्वारेच पीककर्जाचे वाटप होत आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात २९ शाखा असून पालघर जिल्ह्यात ३० शाखा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करीत आहेत. जिल्ह्यातील भात या प्रमुख पिकापोटी हेक्टरी ६० हजार रुपये व नागली पिकाकरिता हेक्टरी ३५ हजार रुपये कर्ज शेतकऱ्यांना दिले जात आहे. यानुसार, या आर्थिक वर्षात रब्बी व खरीप पिकांसाठी ठाणे जिल्ह्यात ९० कोटी ८१ लाख, तर पालघर जिल्ह्यात १२० कोटी रुपये पीककर्जवाटप करण्याचा लक्ष्यांक बँकेने निश्चित केला आहे.>भातलागवडीला विलंब; केवळ ३० टक्के लागवडजिल्ह्यात आतापर्यंत ८० टक्के भातलागवड होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ३० टक्के क्षेत्रात लागवड झाली असून संततधार पावसामुळे भातलागवडीस विलंब होत असल्याच्या वृत्तास जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी दुजोरा दिला आहे.जिल्ह्यात ६० हजार ७१७ हेक्टर क्षेत्रावर यंदा भातलागवड होणार आहे. यापैकी केवळ ३० टक्के म्हणजे २० हजार हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत लागवड झाली आहे. उर्वरित क्षेत्रात आठवडाभरात लागवड होणे अपेक्षित आहे. पाऊस एक आठवडा उशिरा सुरू झाला, त्यामुळे लागवडीला विलंब झाला.जिल्ह्यात सध्या भातरोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ती दर्जेदार आहेत. यासाठी ११ हजार २६९ क्विंटल दर्जेदार भातबियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय, पावसाचे प्रमाणही चांगले असल्यामुळे यंदा हेक्टरी दोन हजार ५०८ किलो भाताची उत्पादकता अपेक्षित असून जिल्हाभरात सुमारे एक लाख ५२ हजार २७८ मेट्रीक टन भाताच्या उत्पादनाचा अंदाज आहे.