शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपात पश्‍चिम विदर्भ माघारला

By admin | Updated: September 5, 2014 01:46 IST

लक्षांकाच्या तुलनेत ८७ टक्केच कर्ज वाटप

अकोला : अनियमीत पावसामुळे शेतकर्‍यांना खरीप पीक कर्जाची निंतात गरज असली तरी, राष्ट्रीयकृत बँकांच्या जाचक अटींमुळे पश्‍चिम विदर्भाला पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट अद्याप गाठता आले नाही. असे असले तरी, मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पुढाकाराने पीक कर्जाचा हा आकडा यंदा तीन हजार पाचशे २९ कोटी ७३ लाख ४२ हजारापर्यंत पोहोचला आहे.पश्‍चिम विदर्भातील जवळपास ५ लाख २१ हजार ८६२ शेतकर्‍यांनी यंदा पीक कर्ज घेतले आहे. हे सर्व कर्ज पश्‍चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी उपलब्ध करू न दिले आहे. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या डबघाईस आलेली असल्याने, या जिल्हयातील शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांवरच अवलंबून राहावे लागले. त्यामुळे या जिल्हय़ातील २ लाख ३७ हजार ८0१ शेतकर्‍यांना २८ ऑगस्टपर्यंत १४८१ कोटी ९५ लाख ४२ हजाराचे कर्ज वाटप झाले आहे. हे कर्जवाटप एकूण उद्दीष्टाच्या ८७ टक्के असून, उद्दीष्टपूर्तीसाठी आणखी १३ टक्के कर्ज वाटप होणे आवश्यक आहे. पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकांनी ३१ जूलैपर्यंत २८६ कोटी १६ लाखाचे खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. विदर्भ - कोंकण ग्रामीण बॅकांचा यामध्ये ७६ कोटी ९५ लाखाचा वाटा असून, व्यावसायिक अर्थात व्यापारी बँकांनी यामध्ये ७ टक्के कर्ज वाटप केले आहे. त्यांच्या कर्जवाटपाचा आकडा हा ६९ कोटी ८७ लाखापर्यंतचा आहे. पीक कर्ज वाटपाची मुदत यंदा येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत असल्याने पश्‍चिम विदर्भाला देण्यात आलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण होईल, अशी अ पेक्षा विभागीय सहनिंबधक संगिता डोंगरे यांनी व्यक्त केली. ** अकोला जिल्हा मध्यवर्तीचे लक्षांक अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदा खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. यंदा ३७२ कोटी ११ लाख ३0 हजाराचे उद्दीष्ट होते. या बँकेने यंदा ३५६ कोटी २५ लाख म्हणजचे १0४.४५ टक्के पीक कर्जवाटप केले आहे. हे कर्ज ६६ हजार २५७ शेतकर्‍यांनी घेतले आहे.** कर्ज वाटप स्थिरावले ८५ टक्क्यांवर !गतवर्षी जवळपास ९५ टक्क्यांपेक्षा जास्त खरीप पीक कर्जवाटपाचे उद्दीष्ट पूर्ण झाले होते. यंदा मात्र पीक कर्जाचा हा आकडा ८५ टक्क्यांच्या जवळपास स्थिरावला आहे. हे उद्दीष्ट पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकानी लवचिक भूमिका घेणे गरजेचे आहे.