शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

शेतकऱ्यांना श्रद्धांजली काय वाहता, परिवर्तन घडवा!

By admin | Updated: October 26, 2015 02:48 IST

उत्पादन खर्चाच्या तुलनेत न मिळणारा भाव, नैसर्गिक आपत्ती अशा समस्यांच्या गर्तेत कापूस उत्पादक अडकला आहे. त्यातून आत्महत्या होतात

जळगाव : उत्पादन खर्चाच्या तुलनेत न मिळणारा भाव, नैसर्गिक आपत्ती अशा समस्यांच्या गर्तेत कापूस उत्पादक अडकला आहे. त्यातून आत्महत्या होतात. आपण श्रद्धांजली वाहण्याची जबाबदारी पार पडतो. पण ही श्रद्धांजली वाहण्याऐवजी कापूस क्षेत्रातील सर्व उद्योजक, शास्त्रज्ञ यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी विश्वसनीय, ठोस काम करायला हवे. मूल्यवर्धनावर भर द्यायला हवा, असे आवाहन मुंबई येथील कोटक ग्रुपचे सर्वेसर्वा तथा जागतिक कापूस बाजारपेठेचे अभ्यासक सुरेश कोटक यांनी केले.जैन हिल्सवरील गांधी तीर्थवरील सभागृहात रविवारी महाकॉट संमेलन झाले. कपाशीच्या तंत्रज्ञानाबाबत आपण मागे असल्याने उत्पादकताही कमी आहे. थ्री जीएम (जेनेटीकली मॉडीफाईड) तंत्र अजून नाही. देशाची कापूस उत्पादकता ३०० ते ४०० किलो रुई प्रतिहेक्टरवर अडकली आहे. चीनने यंदा १,५०० किलो रुई प्रतिहेक्टरी उत्पादकता गाठण्याचे ठरविले आहे. त्याचा विचार देशातील शास्त्रज्ञ, शासन व इतर संस्थांनी करावा. आपल्याकडे कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते; पण उत्पादन येत नाही. दुसरीकडे इतर देशांमध्ये लागवड कमी क्षेत्रावर होते, पण उत्पादनात ते भारताला मागे टाकण्याची स्पर्धा करतात, असेही कोटक म्हणाले. गुजरातने शंकर हा रुईचा ब्रॅण्ड विकसित केला आहे. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आफ्रिकेतील देशांच्या तुलनेत भारतातील रुई स्वस्त केली आहे. ब्रॅण्डींग करताना आपल्या रुईचे दर आपल्या मागे असलेल्या देशांमधील रुईच्या तुलनेत अधिक हवेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.