शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

‘सुरक्षारक्षक मंडळातील कर्मचाऱ्यांना ७ तारखेला वेतन द्या’

By admin | Updated: August 2, 2016 05:30 IST

सर्व जिल्ह्यांतील सुरक्षा रक्षक मंडळांत काम करणाऱ्या कामगारांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन देण्याची जबाबदारी सुरक्षा रक्षक मंडळाची

मुंबई : सर्व जिल्ह्यांतील सुरक्षा रक्षक मंडळांत काम करणाऱ्या कामगारांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन देण्याची जबाबदारी सुरक्षा रक्षक मंडळाची असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला ७ तारखेला वेतन देण्यात यावे, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विधानभवानातील कामगार मंत्र्यांच्या कक्षात कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.माथाडी बोडामार्फत शासकीय कार्यालयांना सुरक्षा रक्षक त्यांच्या मागणीनुसार पुरवण्यात येतात. मात्र शासकीय विभागाकडून वेळेवर निधी मिळत नाही. परिणामी वेतनाला विलंब होतो, असे बैठकीवेळी अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले. वास्तविक शासकीय विभागाकडून दिलेल्या सेवेचा निधी वसूल करणे अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी तो वसूल करावा आणि कर्मचाऱ्यांना ७ तारखेला द्यावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.राज्यात २८ सुरक्षा रक्षक मंडळे आहेत. या अंतर्गत २८ लाख लोक काम करतात. माथाडी आणि सुरक्षा रक्षक हे दोन वेगळे विभाग आहेत. सर्व सुरक्षा रक्षक मंडळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळात सहभागी करुन घेण्यात यावी. याबाबत शासनाने एक कायदा तयार केला आहे. त्या कायद्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. सुरक्षेचे काम माथाडी बोर्डाकडून काढून शासनाच्या सुरक्षा महामंडळाकडे देण्यात यावे. याकरिता कामगार मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आठ दिवसांत बैठक घ्यावी, अशी सूचनाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)>कामगारांनी वाचला तक्रारींचा पाढाशासनाने एकाच वेळी घेतलेला निर्णय सर्व बोर्डांना लागू होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. सुरक्षा रक्षकांना गणवेश पुरवला जात नाही. रात्रपाळीचा भत्ता दिला जात नाही, अशा अनेक तक्रारी बैठकीवेळी कामगारांनी केल्या. यावर माथाडी बोर्ड आणि सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यप्रणालीवर आठ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्याची सूचना ऊर्जामंत्र्यांनी केली.