शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पैसे द्या, मगच हात लावा म्हणताच त्यांनी केला तृतीयपंथीचा खून

By admin | Updated: June 28, 2016 20:34 IST

गतवर्षी मे महिन्यात भागंसी माता गडाच्या पायथ्याशी संध्या सखी (३५) या तृतीयपंथीचा निघृण खून झाला होता. तब्बल एक वर्षानंतर या खुनाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले.

खुनाचे गूढ उकलले: दोघांना अटक

औरंगाबाद : गतवर्षी मे महिन्यात भागंसी माता गडाच्या पायथ्याशी संध्या सखी (३५) या तृतीयपंथीचा निघृण खून झाला होता. तब्बल एक वर्षानंतर या खुनाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले. दारूच्या नशेत असलेले दोन तरुण अनैसर्गिक संभोग करण्यासाठी या तृतीयपंथ्याला डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेले. तेथे आधी पैसे द्या, मगच संभोग करा असे म्हणत तृतीयपंथीने अंगाला हात लावण्यास विरोध केला. या तरुणांकडे तर पैसेच नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात दोन्ही तरुणांनी या तृतीयपंथीचा खून केला होता, असे तपासात समोर आले. खून करणाऱ्या रामकृष्ण ऊर्फ पिंट्या अश्वथामा त्रिपाठी (३५, रा. वडगाव कोल्हाटी) आणि एकनाथ शिवाजी आहेर (२६, रा जयभवानी चौक, बजाजनगर) या दोन्ही आरोपींना गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २२ मे २०१५ रोजी भांगसी माता गडाच्या पायथ्यांशी संध्या या तृतीयपंथीचे प्रेत आढळून आले होते. त्याचा अत्यंत निघृण खून करण्यात आलेला होता. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पोलिसांनी आपले खबरे कामाला लावले. विविध अंगांनी या गुन्ह्याचा तपास केला; परंतु काहीही हाती लागले नाही. शेवटी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी हतबळ होऊन तपास थंड बस्त्यात टाकून दिला होता.

आयुक्तांनाच मिळाली खबरपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही गेल्या वर्षभराच्या कालावधीत औरंगाबादेत आपले स्वत:च्या खबऱ्यांचे एक वेगळे नेटवर्क उभारलेले आहे. आयुक्तांचे हेच नेटवर्क संध्याच्या खुनाचे गूढ उकलण्यासाठी कामी आले. आयुक्तांच्या एका खबऱ्याने चार दिवसांपूर्वी थेट आयुक्तांनाच संपर्क साधून संध्याच्या खुनामागे वडगाव कोल्हाटी परिसरातील रामकृष्ण त्रिपाठी उर्फ पिंट्याचा हात आहे, अशी खबर दिली. लागलीच आयुक्तांनी गुन्हे शाखेला कामाला लावले. लगेच गुन्हे शाखा पोलिसांनी शोध घेऊन चार दिवसांपूर्वी पिंट्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली; परंतु त्याने काही तोंड उघडले नाही. आपल्याला काही माहीत नाही, असेच तो सांगत होता. शेवटी चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले. मात्र, हाच आरोपी आहे, याची आयुक्त आणि गुन्हे शाखेला खात्री होती. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली.

म्हणे पोलिसांना वेड्यात काढलेपोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर पिंट्या त्रिपाठी दारूच्या गुथ्यावर गेला. आपल्या साथिदारांसोबत त्याने मनसोक्त दारू ढोसली आणि नशेत बोलता बोलता मी तर पोलिसांना वेड्यात काढून आलोह्ण असे तो बोलून गेला. ही बाब पाळतीवर असलेल्या खबऱ्याने लगेच पोलिसांना सांगिलते. मग काल अखेर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, निरीक्षक मधुकर सावंत, फौजदार बागूल, जमादार नितीन मोरे विलास वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिंट्याला उचलले. त्याला खाक्या दाखवून विचारपूस सुरू करताच अखेर त्याने तोंड उघडले. साथिदार एकनाथ आहेर याच्या मदतीने तृतीयपंथी संध्याचा खून केल्याची त्याचे स्पष्ट कबुली दिली. लगेच त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी एकनाथलाही अटक केली.

पैशांची मागणी केल्याने खूनआरोपी पिंट्या आणि एकनाथ हे खाजगी कंपनीत नोकरी करतात. दोघे चांगले मित्र आहेत. सोबत सतत ते दारू पितात. त्या दिवशी दोघांनी दारू ढोसली होती. घरी जात असताना त्यांना कोलगेट कंपनीसमोर तृतीयपंथी संध्या नजरेस पडला. मग त्यांनी संध्यासोबत अनैसर्गिक संबधाची बोलणी केली. नंतर त्याला घेऊन ते भांगसी माता गडाच्या पायथ्याशी आले. तेथे आधी पैसे द्या, त्याशिवाय अंगाला हात लावू देणार नाही असे तृतीयपंथी म्हणाला. या दोघांकडे पैसे नव्हते. पैशाशिवाय तो हात लावू देईना. त्यातून त्यांच्यात वाद झाला आणि मग रागाच्या भरात नशेत असलेल्या पिंट्या आणि एकनाथने या तृतीयपंथ्याचा खून केला, असे तपासात समोर आल्याचे पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.