शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
3
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
4
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
5
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
6
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
7
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
8
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
9
BMC Election 2026: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
10
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
11
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
12
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
13
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
14
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
15
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
16
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
17
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
18
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
19
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
20
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
Daily Top 2Weekly Top 5

पैसे द्या, मगच हात लावा म्हणताच त्यांनी केला तृतीयपंथीचा खून

By admin | Updated: June 28, 2016 20:34 IST

गतवर्षी मे महिन्यात भागंसी माता गडाच्या पायथ्याशी संध्या सखी (३५) या तृतीयपंथीचा निघृण खून झाला होता. तब्बल एक वर्षानंतर या खुनाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले.

खुनाचे गूढ उकलले: दोघांना अटक

औरंगाबाद : गतवर्षी मे महिन्यात भागंसी माता गडाच्या पायथ्याशी संध्या सखी (३५) या तृतीयपंथीचा निघृण खून झाला होता. तब्बल एक वर्षानंतर या खुनाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले. दारूच्या नशेत असलेले दोन तरुण अनैसर्गिक संभोग करण्यासाठी या तृतीयपंथ्याला डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेले. तेथे आधी पैसे द्या, मगच संभोग करा असे म्हणत तृतीयपंथीने अंगाला हात लावण्यास विरोध केला. या तरुणांकडे तर पैसेच नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात दोन्ही तरुणांनी या तृतीयपंथीचा खून केला होता, असे तपासात समोर आले. खून करणाऱ्या रामकृष्ण ऊर्फ पिंट्या अश्वथामा त्रिपाठी (३५, रा. वडगाव कोल्हाटी) आणि एकनाथ शिवाजी आहेर (२६, रा जयभवानी चौक, बजाजनगर) या दोन्ही आरोपींना गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २२ मे २०१५ रोजी भांगसी माता गडाच्या पायथ्यांशी संध्या या तृतीयपंथीचे प्रेत आढळून आले होते. त्याचा अत्यंत निघृण खून करण्यात आलेला होता. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पोलिसांनी आपले खबरे कामाला लावले. विविध अंगांनी या गुन्ह्याचा तपास केला; परंतु काहीही हाती लागले नाही. शेवटी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी हतबळ होऊन तपास थंड बस्त्यात टाकून दिला होता.

आयुक्तांनाच मिळाली खबरपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही गेल्या वर्षभराच्या कालावधीत औरंगाबादेत आपले स्वत:च्या खबऱ्यांचे एक वेगळे नेटवर्क उभारलेले आहे. आयुक्तांचे हेच नेटवर्क संध्याच्या खुनाचे गूढ उकलण्यासाठी कामी आले. आयुक्तांच्या एका खबऱ्याने चार दिवसांपूर्वी थेट आयुक्तांनाच संपर्क साधून संध्याच्या खुनामागे वडगाव कोल्हाटी परिसरातील रामकृष्ण त्रिपाठी उर्फ पिंट्याचा हात आहे, अशी खबर दिली. लागलीच आयुक्तांनी गुन्हे शाखेला कामाला लावले. लगेच गुन्हे शाखा पोलिसांनी शोध घेऊन चार दिवसांपूर्वी पिंट्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली; परंतु त्याने काही तोंड उघडले नाही. आपल्याला काही माहीत नाही, असेच तो सांगत होता. शेवटी चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले. मात्र, हाच आरोपी आहे, याची आयुक्त आणि गुन्हे शाखेला खात्री होती. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली.

म्हणे पोलिसांना वेड्यात काढलेपोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर पिंट्या त्रिपाठी दारूच्या गुथ्यावर गेला. आपल्या साथिदारांसोबत त्याने मनसोक्त दारू ढोसली आणि नशेत बोलता बोलता मी तर पोलिसांना वेड्यात काढून आलोह्ण असे तो बोलून गेला. ही बाब पाळतीवर असलेल्या खबऱ्याने लगेच पोलिसांना सांगिलते. मग काल अखेर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, निरीक्षक मधुकर सावंत, फौजदार बागूल, जमादार नितीन मोरे विलास वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिंट्याला उचलले. त्याला खाक्या दाखवून विचारपूस सुरू करताच अखेर त्याने तोंड उघडले. साथिदार एकनाथ आहेर याच्या मदतीने तृतीयपंथी संध्याचा खून केल्याची त्याचे स्पष्ट कबुली दिली. लगेच त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी एकनाथलाही अटक केली.

पैशांची मागणी केल्याने खूनआरोपी पिंट्या आणि एकनाथ हे खाजगी कंपनीत नोकरी करतात. दोघे चांगले मित्र आहेत. सोबत सतत ते दारू पितात. त्या दिवशी दोघांनी दारू ढोसली होती. घरी जात असताना त्यांना कोलगेट कंपनीसमोर तृतीयपंथी संध्या नजरेस पडला. मग त्यांनी संध्यासोबत अनैसर्गिक संबधाची बोलणी केली. नंतर त्याला घेऊन ते भांगसी माता गडाच्या पायथ्याशी आले. तेथे आधी पैसे द्या, त्याशिवाय अंगाला हात लावू देणार नाही असे तृतीयपंथी म्हणाला. या दोघांकडे पैसे नव्हते. पैशाशिवाय तो हात लावू देईना. त्यातून त्यांच्यात वाद झाला आणि मग रागाच्या भरात नशेत असलेल्या पिंट्या आणि एकनाथने या तृतीयपंथ्याचा खून केला, असे तपासात समोर आल्याचे पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.