शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी पवारांचा ‘अल्टिमेटम’

By admin | Updated: May 17, 2016 05:57 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ५ जूनचा ‘अल्टिमेटम’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ५ जूनचा ‘अल्टिमेटम’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला. या तारखेपर्यंत संपूर्ण कर्जमाफी, जनावरांना चारा-पाण्याची सोय आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ न केल्यास शेतकरी रुमणे हातात घेऊन सरकारला बडवतील, असा इशाराही त्यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या मराठवाडा दुष्काळ परिषदेत खा. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवीला. जे सरकार शेतकऱ्यांना जगू देत नाही, जनावरांना चारा पाणी देत नाही, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करत नाही, त्या सरकारला जगू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांनो ‘जेलभरो’ साठी तयार आहात का.. असे विचारताच संपूर्ण मैदानातून शेतकऱ्यांनी ‘होय....’ असा प्रतिसाद दिला. आता सरकारने कर्ज पुनर्गठनाचा निर्णय घेतला आहे. मात्र ते करताना शेतकऱ्यांना पाच वर्षांत ५४ टक्के व्याज हे सरकार आकारणार असल्याचा आरोप करून ते म्हणाले, १९७२च्या दुष्काळात वसंतराव नाईक यांनी जनतेला अन्नधान्य आणि रोजगार देण्यात कमी पडलो तर जाहीर फाशी द्या असे जाहीर केले होते. इतक्या गांभीर्याने दुष्काळाचा विषय हाताळला होता. त्यावेळी राज्यात ४५ लाख लोकांना रोजगार दिला. जगभरातून धान्य मागवून लोक जगवले. आता सरकार दिसतच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री आ. जयंत पाटील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, दिलीप वळसे पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, फौजिया खान, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ. सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आदींची मंचावर उपस्थिती होती.>आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतया परिषदेत राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून औरंगाबाद जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या १४६ शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना तसेच कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा चेक देण्यात आला. खा. पवार यांच्या हस्ते ९ महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात चेक देण्यात आले. इतरांना सभेच्या ठिकाणीच चेक देण्यात आले. परिषदेत पैठण येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या सृष्टी जावळे नावाच्या मुलीने आपली व्यथा मांडली. आम्ही जिद्दीने शिकूच पण सरकारने कर्जमाफी करून आमच्या कुटुंबाच्या डोक्यावरील भार हलका करावा, असे आवाहन केले.