शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कर्जमाफीसाठी पवारांचा ‘अल्टिमेटम’

By admin | Updated: May 17, 2016 05:57 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ५ जूनचा ‘अल्टिमेटम’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ५ जूनचा ‘अल्टिमेटम’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला. या तारखेपर्यंत संपूर्ण कर्जमाफी, जनावरांना चारा-पाण्याची सोय आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ न केल्यास शेतकरी रुमणे हातात घेऊन सरकारला बडवतील, असा इशाराही त्यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या मराठवाडा दुष्काळ परिषदेत खा. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवीला. जे सरकार शेतकऱ्यांना जगू देत नाही, जनावरांना चारा पाणी देत नाही, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करत नाही, त्या सरकारला जगू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांनो ‘जेलभरो’ साठी तयार आहात का.. असे विचारताच संपूर्ण मैदानातून शेतकऱ्यांनी ‘होय....’ असा प्रतिसाद दिला. आता सरकारने कर्ज पुनर्गठनाचा निर्णय घेतला आहे. मात्र ते करताना शेतकऱ्यांना पाच वर्षांत ५४ टक्के व्याज हे सरकार आकारणार असल्याचा आरोप करून ते म्हणाले, १९७२च्या दुष्काळात वसंतराव नाईक यांनी जनतेला अन्नधान्य आणि रोजगार देण्यात कमी पडलो तर जाहीर फाशी द्या असे जाहीर केले होते. इतक्या गांभीर्याने दुष्काळाचा विषय हाताळला होता. त्यावेळी राज्यात ४५ लाख लोकांना रोजगार दिला. जगभरातून धान्य मागवून लोक जगवले. आता सरकार दिसतच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री आ. जयंत पाटील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, दिलीप वळसे पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, फौजिया खान, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ. सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आदींची मंचावर उपस्थिती होती.>आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतया परिषदेत राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून औरंगाबाद जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या १४६ शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना तसेच कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा चेक देण्यात आला. खा. पवार यांच्या हस्ते ९ महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात चेक देण्यात आले. इतरांना सभेच्या ठिकाणीच चेक देण्यात आले. परिषदेत पैठण येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या सृष्टी जावळे नावाच्या मुलीने आपली व्यथा मांडली. आम्ही जिद्दीने शिकूच पण सरकारने कर्जमाफी करून आमच्या कुटुंबाच्या डोक्यावरील भार हलका करावा, असे आवाहन केले.