शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

कर्जमाफीसाठी पवारांचा ‘अल्टिमेटम’

By admin | Updated: May 17, 2016 05:57 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ५ जूनचा ‘अल्टिमेटम’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ५ जूनचा ‘अल्टिमेटम’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला. या तारखेपर्यंत संपूर्ण कर्जमाफी, जनावरांना चारा-पाण्याची सोय आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ न केल्यास शेतकरी रुमणे हातात घेऊन सरकारला बडवतील, असा इशाराही त्यांनी दिला. देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या मराठवाडा दुष्काळ परिषदेत खा. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवीला. जे सरकार शेतकऱ्यांना जगू देत नाही, जनावरांना चारा पाणी देत नाही, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करत नाही, त्या सरकारला जगू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांनो ‘जेलभरो’ साठी तयार आहात का.. असे विचारताच संपूर्ण मैदानातून शेतकऱ्यांनी ‘होय....’ असा प्रतिसाद दिला. आता सरकारने कर्ज पुनर्गठनाचा निर्णय घेतला आहे. मात्र ते करताना शेतकऱ्यांना पाच वर्षांत ५४ टक्के व्याज हे सरकार आकारणार असल्याचा आरोप करून ते म्हणाले, १९७२च्या दुष्काळात वसंतराव नाईक यांनी जनतेला अन्नधान्य आणि रोजगार देण्यात कमी पडलो तर जाहीर फाशी द्या असे जाहीर केले होते. इतक्या गांभीर्याने दुष्काळाचा विषय हाताळला होता. त्यावेळी राज्यात ४५ लाख लोकांना रोजगार दिला. जगभरातून धान्य मागवून लोक जगवले. आता सरकार दिसतच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री आ. जयंत पाटील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, दिलीप वळसे पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, फौजिया खान, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ. सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आदींची मंचावर उपस्थिती होती.>आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतया परिषदेत राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून औरंगाबाद जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या १४६ शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना तसेच कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा चेक देण्यात आला. खा. पवार यांच्या हस्ते ९ महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात चेक देण्यात आले. इतरांना सभेच्या ठिकाणीच चेक देण्यात आले. परिषदेत पैठण येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या सृष्टी जावळे नावाच्या मुलीने आपली व्यथा मांडली. आम्ही जिद्दीने शिकूच पण सरकारने कर्जमाफी करून आमच्या कुटुंबाच्या डोक्यावरील भार हलका करावा, असे आवाहन केले.