शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

पवारांचे गलिच्छ ब्राह्मणविरोधी राजकारण - राज ठाकरे यांची घणाघाती टीका

By admin | Updated: August 18, 2015 13:17 IST

ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांचा पोटशूळ वाढला असून बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्ताने ते गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांचा पोटशूळ वाढला असून बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्ताने ते गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. शरद पवारांच्या हस्ते यापूर्वी अनेकवेळा बाबासाहेबांचा सत्कार झाला आहे, त्यावेळी त्यांना माहीत नव्हते का की बाबासाहेबांनी शिवाजीमहाराजांचा अपमान केलाय? की त्यांनी पुरस्कार दिल्यानंतर शिवचरीत्र वाचायला घेतले? असा सवाल करत राज ठाकरे यांनी शरद पवार ब्राह्मणद्वेष्टे राजकारण करत असल्याचा आरोप करत हे राज्याच्या हिताचे नसल्याचे सांगितले. बाबासाहेब पुरंदरेंना हात लावून बघा मी संपूर्ण महाराष्ट्रात तांडव करीन असा इशाराही त्यांनी पुरंदरेविरोधी गटाला दिला आहे.
राष्ट्रवादीमधल्या मराठा लॉबीसह भारतीय जनता पार्टीमधले काही मंत्रीही बाबासाहेबांना पुरस्कार देण्यास आतून विरोध करत असून हे कुभांड रचण्यात आल्याचे ठाकरे म्हणाले.
भालचंद्र नेमाड्यांचाही खरपूस समाचार घेताना त्यांना ५० वर्षांनी कुठे जाग आल्याचा उल्लेख करतानाच नेमाड्यांना हा पुरस्कार हवा होता का? असा प्रश्न विचारत त्यांच्या हेतूबद्दलच शंका उत्पन्न केली.
जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाची शरद पवारांचा पाठिंबा असल्यामुळेच असं काहीतरी बोलण्याची हिंमत होते असेही ठाकरे म्हणाले.
 
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- परदेशी लेखकांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या लिखाणाचा अभ्यास करूनच बाबासाहेब पुरंद-यांनी पुस्तक लिहीले आहे.
- बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत असलेले लोक त्यांच्या बाजून ठामपणे का उभे रहात नाहीत.
- पुरस्कारांपेक्षा बाबासाहेब खूप मोठे आहेत. ते स्वत: हा पुरस्कार मागायला गेले नव्हते.
- ज्ञानपीठ' पुरस्कार मिळाल्यावर कसं वागावं याचे धडे नेमाडेंनी कुसुमाग्रजांकडून घ्यायला हवे होते.
- नेमाडे यांना ज्ञानपीठ देण्यावरूनही वाद झाला होता मग का स्वीकारला तो पुरस्कार नेमाड्यांनी?
- या सर्व वादामागे भाजपाचे काही मंत्रीही आहेत.
- इतिहासाबाबत आक्षेप असेल तर तो विषय चर्चेने सोडवायचा होता. शरद पवारांनी फूस लावल्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांची बाबासाहेबांविरोधात बोलण्याची हिंमत होते.
- २०१३ साली पवारांनी बाबासाहेबांचा सत्कार का केला? हे सर्व विद्वान आधी कुठे होते ?
- जर तुम्हाला बाबासाहेबांची मतं पटत नव्हती तर पुस्तकं लिहून खोडून काढा त्यांना, इतकी वर्षे विरोधक काय झोपले होते का?
- ब्राह्मण मुख्यमंत्री झाला हे अजून पचनी पडत नसल्यामुळे शरद पवार गलिच्छ राजकारण करत आहेत.