शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पवारांचे गलिच्छ ब्राह्मणविरोधी राजकारण - राज ठाकरे यांची घणाघाती टीका

By admin | Updated: August 18, 2015 13:17 IST

ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांचा पोटशूळ वाढला असून बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्ताने ते गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांचा पोटशूळ वाढला असून बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्ताने ते गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. शरद पवारांच्या हस्ते यापूर्वी अनेकवेळा बाबासाहेबांचा सत्कार झाला आहे, त्यावेळी त्यांना माहीत नव्हते का की बाबासाहेबांनी शिवाजीमहाराजांचा अपमान केलाय? की त्यांनी पुरस्कार दिल्यानंतर शिवचरीत्र वाचायला घेतले? असा सवाल करत राज ठाकरे यांनी शरद पवार ब्राह्मणद्वेष्टे राजकारण करत असल्याचा आरोप करत हे राज्याच्या हिताचे नसल्याचे सांगितले. बाबासाहेब पुरंदरेंना हात लावून बघा मी संपूर्ण महाराष्ट्रात तांडव करीन असा इशाराही त्यांनी पुरंदरेविरोधी गटाला दिला आहे.
राष्ट्रवादीमधल्या मराठा लॉबीसह भारतीय जनता पार्टीमधले काही मंत्रीही बाबासाहेबांना पुरस्कार देण्यास आतून विरोध करत असून हे कुभांड रचण्यात आल्याचे ठाकरे म्हणाले.
भालचंद्र नेमाड्यांचाही खरपूस समाचार घेताना त्यांना ५० वर्षांनी कुठे जाग आल्याचा उल्लेख करतानाच नेमाड्यांना हा पुरस्कार हवा होता का? असा प्रश्न विचारत त्यांच्या हेतूबद्दलच शंका उत्पन्न केली.
जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाची शरद पवारांचा पाठिंबा असल्यामुळेच असं काहीतरी बोलण्याची हिंमत होते असेही ठाकरे म्हणाले.
 
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- परदेशी लेखकांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या लिखाणाचा अभ्यास करूनच बाबासाहेब पुरंद-यांनी पुस्तक लिहीले आहे.
- बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत असलेले लोक त्यांच्या बाजून ठामपणे का उभे रहात नाहीत.
- पुरस्कारांपेक्षा बाबासाहेब खूप मोठे आहेत. ते स्वत: हा पुरस्कार मागायला गेले नव्हते.
- ज्ञानपीठ' पुरस्कार मिळाल्यावर कसं वागावं याचे धडे नेमाडेंनी कुसुमाग्रजांकडून घ्यायला हवे होते.
- नेमाडे यांना ज्ञानपीठ देण्यावरूनही वाद झाला होता मग का स्वीकारला तो पुरस्कार नेमाड्यांनी?
- या सर्व वादामागे भाजपाचे काही मंत्रीही आहेत.
- इतिहासाबाबत आक्षेप असेल तर तो विषय चर्चेने सोडवायचा होता. शरद पवारांनी फूस लावल्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांची बाबासाहेबांविरोधात बोलण्याची हिंमत होते.
- २०१३ साली पवारांनी बाबासाहेबांचा सत्कार का केला? हे सर्व विद्वान आधी कुठे होते ?
- जर तुम्हाला बाबासाहेबांची मतं पटत नव्हती तर पुस्तकं लिहून खोडून काढा त्यांना, इतकी वर्षे विरोधक काय झोपले होते का?
- ब्राह्मण मुख्यमंत्री झाला हे अजून पचनी पडत नसल्यामुळे शरद पवार गलिच्छ राजकारण करत आहेत.