शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पवारांचे गलिच्छ ब्राह्मणविरोधी राजकारण - राज ठाकरे यांची घणाघाती टीका

By admin | Updated: August 18, 2015 13:17 IST

ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांचा पोटशूळ वाढला असून बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्ताने ते गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांचा पोटशूळ वाढला असून बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्ताने ते गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. शरद पवारांच्या हस्ते यापूर्वी अनेकवेळा बाबासाहेबांचा सत्कार झाला आहे, त्यावेळी त्यांना माहीत नव्हते का की बाबासाहेबांनी शिवाजीमहाराजांचा अपमान केलाय? की त्यांनी पुरस्कार दिल्यानंतर शिवचरीत्र वाचायला घेतले? असा सवाल करत राज ठाकरे यांनी शरद पवार ब्राह्मणद्वेष्टे राजकारण करत असल्याचा आरोप करत हे राज्याच्या हिताचे नसल्याचे सांगितले. बाबासाहेब पुरंदरेंना हात लावून बघा मी संपूर्ण महाराष्ट्रात तांडव करीन असा इशाराही त्यांनी पुरंदरेविरोधी गटाला दिला आहे.
राष्ट्रवादीमधल्या मराठा लॉबीसह भारतीय जनता पार्टीमधले काही मंत्रीही बाबासाहेबांना पुरस्कार देण्यास आतून विरोध करत असून हे कुभांड रचण्यात आल्याचे ठाकरे म्हणाले.
भालचंद्र नेमाड्यांचाही खरपूस समाचार घेताना त्यांना ५० वर्षांनी कुठे जाग आल्याचा उल्लेख करतानाच नेमाड्यांना हा पुरस्कार हवा होता का? असा प्रश्न विचारत त्यांच्या हेतूबद्दलच शंका उत्पन्न केली.
जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाची शरद पवारांचा पाठिंबा असल्यामुळेच असं काहीतरी बोलण्याची हिंमत होते असेही ठाकरे म्हणाले.
 
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- परदेशी लेखकांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या लिखाणाचा अभ्यास करूनच बाबासाहेब पुरंद-यांनी पुस्तक लिहीले आहे.
- बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत असलेले लोक त्यांच्या बाजून ठामपणे का उभे रहात नाहीत.
- पुरस्कारांपेक्षा बाबासाहेब खूप मोठे आहेत. ते स्वत: हा पुरस्कार मागायला गेले नव्हते.
- ज्ञानपीठ' पुरस्कार मिळाल्यावर कसं वागावं याचे धडे नेमाडेंनी कुसुमाग्रजांकडून घ्यायला हवे होते.
- नेमाडे यांना ज्ञानपीठ देण्यावरूनही वाद झाला होता मग का स्वीकारला तो पुरस्कार नेमाड्यांनी?
- या सर्व वादामागे भाजपाचे काही मंत्रीही आहेत.
- इतिहासाबाबत आक्षेप असेल तर तो विषय चर्चेने सोडवायचा होता. शरद पवारांनी फूस लावल्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांची बाबासाहेबांविरोधात बोलण्याची हिंमत होते.
- २०१३ साली पवारांनी बाबासाहेबांचा सत्कार का केला? हे सर्व विद्वान आधी कुठे होते ?
- जर तुम्हाला बाबासाहेबांची मतं पटत नव्हती तर पुस्तकं लिहून खोडून काढा त्यांना, इतकी वर्षे विरोधक काय झोपले होते का?
- ब्राह्मण मुख्यमंत्री झाला हे अजून पचनी पडत नसल्यामुळे शरद पवार गलिच्छ राजकारण करत आहेत.