शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

पवारांचे गलिच्छ ब्राह्मणविरोधी राजकारण - राज ठाकरे यांची घणाघाती टीका

By admin | Updated: August 18, 2015 13:17 IST

ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांचा पोटशूळ वाढला असून बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्ताने ते गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांचा पोटशूळ वाढला असून बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्ताने ते गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. शरद पवारांच्या हस्ते यापूर्वी अनेकवेळा बाबासाहेबांचा सत्कार झाला आहे, त्यावेळी त्यांना माहीत नव्हते का की बाबासाहेबांनी शिवाजीमहाराजांचा अपमान केलाय? की त्यांनी पुरस्कार दिल्यानंतर शिवचरीत्र वाचायला घेतले? असा सवाल करत राज ठाकरे यांनी शरद पवार ब्राह्मणद्वेष्टे राजकारण करत असल्याचा आरोप करत हे राज्याच्या हिताचे नसल्याचे सांगितले. बाबासाहेब पुरंदरेंना हात लावून बघा मी संपूर्ण महाराष्ट्रात तांडव करीन असा इशाराही त्यांनी पुरंदरेविरोधी गटाला दिला आहे.
राष्ट्रवादीमधल्या मराठा लॉबीसह भारतीय जनता पार्टीमधले काही मंत्रीही बाबासाहेबांना पुरस्कार देण्यास आतून विरोध करत असून हे कुभांड रचण्यात आल्याचे ठाकरे म्हणाले.
भालचंद्र नेमाड्यांचाही खरपूस समाचार घेताना त्यांना ५० वर्षांनी कुठे जाग आल्याचा उल्लेख करतानाच नेमाड्यांना हा पुरस्कार हवा होता का? असा प्रश्न विचारत त्यांच्या हेतूबद्दलच शंका उत्पन्न केली.
जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाची शरद पवारांचा पाठिंबा असल्यामुळेच असं काहीतरी बोलण्याची हिंमत होते असेही ठाकरे म्हणाले.
 
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- परदेशी लेखकांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या लिखाणाचा अभ्यास करूनच बाबासाहेब पुरंद-यांनी पुस्तक लिहीले आहे.
- बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत असलेले लोक त्यांच्या बाजून ठामपणे का उभे रहात नाहीत.
- पुरस्कारांपेक्षा बाबासाहेब खूप मोठे आहेत. ते स्वत: हा पुरस्कार मागायला गेले नव्हते.
- ज्ञानपीठ' पुरस्कार मिळाल्यावर कसं वागावं याचे धडे नेमाडेंनी कुसुमाग्रजांकडून घ्यायला हवे होते.
- नेमाडे यांना ज्ञानपीठ देण्यावरूनही वाद झाला होता मग का स्वीकारला तो पुरस्कार नेमाड्यांनी?
- या सर्व वादामागे भाजपाचे काही मंत्रीही आहेत.
- इतिहासाबाबत आक्षेप असेल तर तो विषय चर्चेने सोडवायचा होता. शरद पवारांनी फूस लावल्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांची बाबासाहेबांविरोधात बोलण्याची हिंमत होते.
- २०१३ साली पवारांनी बाबासाहेबांचा सत्कार का केला? हे सर्व विद्वान आधी कुठे होते ?
- जर तुम्हाला बाबासाहेबांची मतं पटत नव्हती तर पुस्तकं लिहून खोडून काढा त्यांना, इतकी वर्षे विरोधक काय झोपले होते का?
- ब्राह्मण मुख्यमंत्री झाला हे अजून पचनी पडत नसल्यामुळे शरद पवार गलिच्छ राजकारण करत आहेत.