शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार - पवार

By admin | Updated: June 8, 2014 17:36 IST

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून निवडणुकीनंतर पक्षाचे आमदार नेता निवडतील असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.

 ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ८ - राज्यातील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने सामूहिक नेतृत्वाखालीच लढवणार असून निवडणुकीनंतर लोकशाहीपद्धतीने निर्वाचीत आमदारांपैकी एकाची नेता म्हणून निवड करु असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविषयी सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मी दिल्लीतच आनंदी असून राज्यात परतणार नाही असे विधानही शरद पवार यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा १५ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांनी स्वपक्षीय नेत्यांना फटकारतानाच मुख्यमंत्रीपदाविषयीची भूमिकाही स्पष्ट केली.  विधानसभेविषयी शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविषयी सुरु असलेली चर्चा पुरे झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखालीच निवडणुकीला सामोरे जाणार. जनतेने पुन्हा संधी दिल्यास निर्वाचीत आमदारांपैकी एकाची नेता म्हणून निवड करु असे पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांनी सुरु केली आहे. याविषयीही पवारांनी भाष्य केले.'मी दिल्लीत आनंदात आहे. आता दिल्लीत सत्तेत नसल्याने मला फिरता येईल. पुन्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधता येईल. मात्र राज्यात परतणार नाही' असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीविषयी सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून नाउमेद न होता नव्या जिद्दीने कामाला लागा. जनतेशी संवाद वाढवा. दिल्ली व राज्यात मतदान करताना मतदार वेगळा विचार करतात असे पवार यांनी सांगितले. 

दिल्लीत सत्ताबदल होताच अल्पसंख्याक दहशतीखाली

दिल्लीत सत्ताबदल झाल्याने सर्व सत्ता एका विशिष्ट वर्गाच्या हातात गेली आहे. याचे परिणामही आता दिसू लागले आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकून समाजात तेढ करण्याचे प्रकार घडले. यात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांवर, व्यक्तींवर हल्ले झाले. या आक्षेपार्ह फोटोशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका इंजिनिअर तरुणाचा बळी गेला. समाजातील लहान घटक दहशतीखाली वावरत असेल तर ते चुकीचे आहे असे पवार यांनी सांगितले. 

दुरुस्ती करा अन्यथा जनताच दुरुस्ती करेल

नेता व कार्यकर्ता तसेच जनतेमधील अंतर वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसला आहे.आता हे अंतर कमी करुन कार्यकर्ता व जनता दोघांशी सुसंवाद साधा. जनतेशी सुसंवाद साधून विकास करा. आता चुक दुरुस्त करा अन्यता विधानसभेत जनताच आपल्याला दुरुस्त करेल असा इशाराही त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला.