शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार - पवार

By admin | Updated: June 8, 2014 17:36 IST

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून निवडणुकीनंतर पक्षाचे आमदार नेता निवडतील असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.

 ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ८ - राज्यातील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने सामूहिक नेतृत्वाखालीच लढवणार असून निवडणुकीनंतर लोकशाहीपद्धतीने निर्वाचीत आमदारांपैकी एकाची नेता म्हणून निवड करु असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविषयी सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मी दिल्लीतच आनंदी असून राज्यात परतणार नाही असे विधानही शरद पवार यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा १५ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांनी स्वपक्षीय नेत्यांना फटकारतानाच मुख्यमंत्रीपदाविषयीची भूमिकाही स्पष्ट केली.  विधानसभेविषयी शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविषयी सुरु असलेली चर्चा पुरे झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखालीच निवडणुकीला सामोरे जाणार. जनतेने पुन्हा संधी दिल्यास निर्वाचीत आमदारांपैकी एकाची नेता म्हणून निवड करु असे पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांनी सुरु केली आहे. याविषयीही पवारांनी भाष्य केले.'मी दिल्लीत आनंदात आहे. आता दिल्लीत सत्तेत नसल्याने मला फिरता येईल. पुन्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधता येईल. मात्र राज्यात परतणार नाही' असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीविषयी सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून नाउमेद न होता नव्या जिद्दीने कामाला लागा. जनतेशी संवाद वाढवा. दिल्ली व राज्यात मतदान करताना मतदार वेगळा विचार करतात असे पवार यांनी सांगितले. 

दिल्लीत सत्ताबदल होताच अल्पसंख्याक दहशतीखाली

दिल्लीत सत्ताबदल झाल्याने सर्व सत्ता एका विशिष्ट वर्गाच्या हातात गेली आहे. याचे परिणामही आता दिसू लागले आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकून समाजात तेढ करण्याचे प्रकार घडले. यात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांवर, व्यक्तींवर हल्ले झाले. या आक्षेपार्ह फोटोशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका इंजिनिअर तरुणाचा बळी गेला. समाजातील लहान घटक दहशतीखाली वावरत असेल तर ते चुकीचे आहे असे पवार यांनी सांगितले. 

दुरुस्ती करा अन्यथा जनताच दुरुस्ती करेल

नेता व कार्यकर्ता तसेच जनतेमधील अंतर वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसला आहे.आता हे अंतर कमी करुन कार्यकर्ता व जनता दोघांशी सुसंवाद साधा. जनतेशी सुसंवाद साधून विकास करा. आता चुक दुरुस्त करा अन्यता विधानसभेत जनताच आपल्याला दुरुस्त करेल असा इशाराही त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला.