शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार - पवार

By admin | Updated: June 8, 2014 17:36 IST

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून निवडणुकीनंतर पक्षाचे आमदार नेता निवडतील असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.

 ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ८ - राज्यातील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने सामूहिक नेतृत्वाखालीच लढवणार असून निवडणुकीनंतर लोकशाहीपद्धतीने निर्वाचीत आमदारांपैकी एकाची नेता म्हणून निवड करु असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविषयी सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मी दिल्लीतच आनंदी असून राज्यात परतणार नाही असे विधानही शरद पवार यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा १५ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांनी स्वपक्षीय नेत्यांना फटकारतानाच मुख्यमंत्रीपदाविषयीची भूमिकाही स्पष्ट केली.  विधानसभेविषयी शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविषयी सुरु असलेली चर्चा पुरे झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखालीच निवडणुकीला सामोरे जाणार. जनतेने पुन्हा संधी दिल्यास निर्वाचीत आमदारांपैकी एकाची नेता म्हणून निवड करु असे पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांनी सुरु केली आहे. याविषयीही पवारांनी भाष्य केले.'मी दिल्लीत आनंदात आहे. आता दिल्लीत सत्तेत नसल्याने मला फिरता येईल. पुन्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधता येईल. मात्र राज्यात परतणार नाही' असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीविषयी सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून नाउमेद न होता नव्या जिद्दीने कामाला लागा. जनतेशी संवाद वाढवा. दिल्ली व राज्यात मतदान करताना मतदार वेगळा विचार करतात असे पवार यांनी सांगितले. 

दिल्लीत सत्ताबदल होताच अल्पसंख्याक दहशतीखाली

दिल्लीत सत्ताबदल झाल्याने सर्व सत्ता एका विशिष्ट वर्गाच्या हातात गेली आहे. याचे परिणामही आता दिसू लागले आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकून समाजात तेढ करण्याचे प्रकार घडले. यात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांवर, व्यक्तींवर हल्ले झाले. या आक्षेपार्ह फोटोशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका इंजिनिअर तरुणाचा बळी गेला. समाजातील लहान घटक दहशतीखाली वावरत असेल तर ते चुकीचे आहे असे पवार यांनी सांगितले. 

दुरुस्ती करा अन्यथा जनताच दुरुस्ती करेल

नेता व कार्यकर्ता तसेच जनतेमधील अंतर वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसला आहे.आता हे अंतर कमी करुन कार्यकर्ता व जनता दोघांशी सुसंवाद साधा. जनतेशी सुसंवाद साधून विकास करा. आता चुक दुरुस्त करा अन्यता विधानसभेत जनताच आपल्याला दुरुस्त करेल असा इशाराही त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला.