शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पथदिव्यांचे ढिसाळ नियोजन

By admin | Updated: April 26, 2016 02:42 IST

महापालिकेच्या गलथानपणामुळे पथदिव्यांची देखभाल आणि विद्युत देयकांपोटी कोट्यवधी रुपये खर्ची घातले जात आहेत.

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- महापालिकेच्या गलथानपणामुळे पथदिव्यांची देखभाल आणि विद्युत देयकांपोटी कोट्यवधी रुपये खर्ची घातले जात आहेत. या प्रकाराकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने वीज बचतीच्या धोरणाला हरताळ फासला गेल्याचे दिसून आले आहे.महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ४0 हजार ९५८ पथदिवे आहेत. हे पथदिवे चालू आणि बंद करण्यासाठी यांत्रिकी पध्दतीचा अवलंब करण्यात येतो. यात पथदिवे चालू करण्याची व बंद करण्याची वेळ नमूद करण्यात आलेली असते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी ठरलेल्या वेळेत हे पथदिवे आपोआप चालू होतात, तर सकाळच्या वेळी नमूद वेळेत बंद होतात. असे असले तरी अनेक विभागाचे वेळेचे हे गणित विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी सूर्यास्ताअगोदरच दिवे लागतात. काही भागात सूर्योदयानंतरही दिवे चालू असल्याचे पाहावयास मिळते. या प्रकारामुळे विजेचा अतिरिक्त वापर होत आहे. विशेष म्हणजे त्यामुळे वीज बिलातही वाढ होत आहे.महापालिका शहरातील पथदिव्यांची देखभाल व वीज बिलापोटी वर्षाला २५ कोटी ६५ लाख रुपये खर्च करते. यात केवळ विद्युत बिलावर १७ कोटी ४0 लाख ८८ हजार रुपये खर्च होतात. याचाच अर्थ महिन्याला साधारण दीड कोटी रुपये खर्च केले जात असल्याची बाब माहितीच्या आधिकारातून उघड झाली आहे. वास्तविकपणे हा खर्च अवास्तव असून केवळ संबंधित विभागाच्या गलथानपणामुळे प्रशासनाला अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते सुधीर दाणी यांनी केला आहे.पथदिव्यांच्या देखभालीसाठी वर्षाला आठ कोटी २४ लाख ४९ हजार रुपये खर्च केले जातात. विशेष म्हणजे शहराच्या अनेक भागातील विद्युत दिवे बंद अवस्थेत आहेत. झोपडपट्टी परिसरातील विद्युत खांबांचीच दुरवस्था झाली आहे.