शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पथदिव्यांचे ढिसाळ नियोजन

By admin | Updated: April 26, 2016 02:42 IST

महापालिकेच्या गलथानपणामुळे पथदिव्यांची देखभाल आणि विद्युत देयकांपोटी कोट्यवधी रुपये खर्ची घातले जात आहेत.

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- महापालिकेच्या गलथानपणामुळे पथदिव्यांची देखभाल आणि विद्युत देयकांपोटी कोट्यवधी रुपये खर्ची घातले जात आहेत. या प्रकाराकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने वीज बचतीच्या धोरणाला हरताळ फासला गेल्याचे दिसून आले आहे.महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ४0 हजार ९५८ पथदिवे आहेत. हे पथदिवे चालू आणि बंद करण्यासाठी यांत्रिकी पध्दतीचा अवलंब करण्यात येतो. यात पथदिवे चालू करण्याची व बंद करण्याची वेळ नमूद करण्यात आलेली असते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी ठरलेल्या वेळेत हे पथदिवे आपोआप चालू होतात, तर सकाळच्या वेळी नमूद वेळेत बंद होतात. असे असले तरी अनेक विभागाचे वेळेचे हे गणित विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी सूर्यास्ताअगोदरच दिवे लागतात. काही भागात सूर्योदयानंतरही दिवे चालू असल्याचे पाहावयास मिळते. या प्रकारामुळे विजेचा अतिरिक्त वापर होत आहे. विशेष म्हणजे त्यामुळे वीज बिलातही वाढ होत आहे.महापालिका शहरातील पथदिव्यांची देखभाल व वीज बिलापोटी वर्षाला २५ कोटी ६५ लाख रुपये खर्च करते. यात केवळ विद्युत बिलावर १७ कोटी ४0 लाख ८८ हजार रुपये खर्च होतात. याचाच अर्थ महिन्याला साधारण दीड कोटी रुपये खर्च केले जात असल्याची बाब माहितीच्या आधिकारातून उघड झाली आहे. वास्तविकपणे हा खर्च अवास्तव असून केवळ संबंधित विभागाच्या गलथानपणामुळे प्रशासनाला अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते सुधीर दाणी यांनी केला आहे.पथदिव्यांच्या देखभालीसाठी वर्षाला आठ कोटी २४ लाख ४९ हजार रुपये खर्च केले जातात. विशेष म्हणजे शहराच्या अनेक भागातील विद्युत दिवे बंद अवस्थेत आहेत. झोपडपट्टी परिसरातील विद्युत खांबांचीच दुरवस्था झाली आहे.