शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

अणुऊर्जेतून जगाला शांततेची दिशा

By admin | Updated: May 27, 2015 01:07 IST

अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर करून जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन्ही शहरे बेचिराख करण्यात आली.

पुणे : अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर करून जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन्ही शहरे बेचिराख करण्यात आली. यात अनेक निष्पापांचा बळी गेला. तेव्हा ही घटना जगभरातील अणुशास्त्रज्ञांच्या जिव्हारी लागली आणि अणुऊर्जा निर्माण करावी की नाही यावर चर्चा सुरू झाल्या. तेव्हा भारतातील अणुऊर्जेचे जनक असलेल्या डॉ. होमी भाभा यांनी त्या काळात जिनिव्हा येथे झालेल्या जगभरातील शास्त्रज्ञांच्या परिषदेत अणुऊर्जेतून जगात शांतता कशा प्रकारे प्रस्थापित करता येऊ शकेल, याची दिशा दिली. भाभा हे खऱ्या अर्थाने जगमान्य अणुशास्त्रज्ञ होते, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी व्यक्त केले.फिरोदिया फाउंडेशन, संवाद आणि यशवंत प्रकाशन यांच्या वतीने रामचंद्र कुलकर्णी लिखित डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई यांच्या जीवनावरील व सिक्स गोल्डन लीवज् आॅफ इंडियन न्युक्लिअर सागा या तीन पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. मराठा चेंबरच्या सभागृहात मंगळवारी कार्यक्रम झाला. ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, डॉ. जयश्री फिरोदिया व रामचंद्र कुलकर्णी व्यासपीठावर होते. भारतीय हवाई दलातील योगदानाबद्दल धुंडिराज कुलकर्णी, प्रभाकर कुलकर्णी व रामचंद्र कुलकर्णी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.गोवारीकर म्हणाले, ‘‘जगात अणुऊर्जेचा शोध लागण्यापूर्वी होमी भाभा यांनी त्यात संशोधनास सुरुवात केली होती. त्यांचे ‘कॉस्मिक रे’वरील संशोधन अतुल्य होते. त्याबद्दल खरेतर त्यांना नोबेल पारितोषिक मिळायला हवे होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्वितीय होते. त्यांच्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विश्वास दाखविल्याने भाभा यांनी भारताच्या अणुऊर्जेची पायाभरणी केली.’’ (प्रतिनिधी)४अरुण फिरोदिया म्हणाले, ‘‘होमी भाभा, विक्रम साराभाई यांनी दाखविलेल्या पथावर चालल्यामुळे जगात भारताला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. भाभा यांचा मृत्यू संशयास्पद होता. अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरोनेही ते मान्य केले आहे. जर भाभांचा अपघाती मृत्यू झाला नसता तर आज अणुऊर्जेच्या माध्यमातून भारत अमेरिकेपेक्षाही प्रगत झालेला असता. ज्या काळात भारतात बैलगाडीचा वापर केला जात होता, त्या १९५६च्या काळात भारतात अणुऊर्जेचे रिअ‍ॅक्टर भाभांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले होते. त्या काळात फक्त युरोपमध्येच असे रिअ‍ॅक्टर होते. यावरून भाभा यांचे कर्तृत्व सिद्ध होते. आज आपण अणुऊर्जेने सज्ज असल्याने कोणताही देश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.