शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अणुऊर्जेतून जगाला शांततेची दिशा

By admin | Updated: May 27, 2015 01:07 IST

अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर करून जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन्ही शहरे बेचिराख करण्यात आली.

पुणे : अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर करून जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन्ही शहरे बेचिराख करण्यात आली. यात अनेक निष्पापांचा बळी गेला. तेव्हा ही घटना जगभरातील अणुशास्त्रज्ञांच्या जिव्हारी लागली आणि अणुऊर्जा निर्माण करावी की नाही यावर चर्चा सुरू झाल्या. तेव्हा भारतातील अणुऊर्जेचे जनक असलेल्या डॉ. होमी भाभा यांनी त्या काळात जिनिव्हा येथे झालेल्या जगभरातील शास्त्रज्ञांच्या परिषदेत अणुऊर्जेतून जगात शांतता कशा प्रकारे प्रस्थापित करता येऊ शकेल, याची दिशा दिली. भाभा हे खऱ्या अर्थाने जगमान्य अणुशास्त्रज्ञ होते, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी व्यक्त केले.फिरोदिया फाउंडेशन, संवाद आणि यशवंत प्रकाशन यांच्या वतीने रामचंद्र कुलकर्णी लिखित डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई यांच्या जीवनावरील व सिक्स गोल्डन लीवज् आॅफ इंडियन न्युक्लिअर सागा या तीन पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. मराठा चेंबरच्या सभागृहात मंगळवारी कार्यक्रम झाला. ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, डॉ. जयश्री फिरोदिया व रामचंद्र कुलकर्णी व्यासपीठावर होते. भारतीय हवाई दलातील योगदानाबद्दल धुंडिराज कुलकर्णी, प्रभाकर कुलकर्णी व रामचंद्र कुलकर्णी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.गोवारीकर म्हणाले, ‘‘जगात अणुऊर्जेचा शोध लागण्यापूर्वी होमी भाभा यांनी त्यात संशोधनास सुरुवात केली होती. त्यांचे ‘कॉस्मिक रे’वरील संशोधन अतुल्य होते. त्याबद्दल खरेतर त्यांना नोबेल पारितोषिक मिळायला हवे होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्वितीय होते. त्यांच्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विश्वास दाखविल्याने भाभा यांनी भारताच्या अणुऊर्जेची पायाभरणी केली.’’ (प्रतिनिधी)४अरुण फिरोदिया म्हणाले, ‘‘होमी भाभा, विक्रम साराभाई यांनी दाखविलेल्या पथावर चालल्यामुळे जगात भारताला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. भाभा यांचा मृत्यू संशयास्पद होता. अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरोनेही ते मान्य केले आहे. जर भाभांचा अपघाती मृत्यू झाला नसता तर आज अणुऊर्जेच्या माध्यमातून भारत अमेरिकेपेक्षाही प्रगत झालेला असता. ज्या काळात भारतात बैलगाडीचा वापर केला जात होता, त्या १९५६च्या काळात भारतात अणुऊर्जेचे रिअ‍ॅक्टर भाभांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले होते. त्या काळात फक्त युरोपमध्येच असे रिअ‍ॅक्टर होते. यावरून भाभा यांचे कर्तृत्व सिद्ध होते. आज आपण अणुऊर्जेने सज्ज असल्याने कोणताही देश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.