शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

अणुऊर्जेतून जगाला शांततेची दिशा

By admin | Updated: May 27, 2015 01:07 IST

अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर करून जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन्ही शहरे बेचिराख करण्यात आली.

पुणे : अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर करून जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन्ही शहरे बेचिराख करण्यात आली. यात अनेक निष्पापांचा बळी गेला. तेव्हा ही घटना जगभरातील अणुशास्त्रज्ञांच्या जिव्हारी लागली आणि अणुऊर्जा निर्माण करावी की नाही यावर चर्चा सुरू झाल्या. तेव्हा भारतातील अणुऊर्जेचे जनक असलेल्या डॉ. होमी भाभा यांनी त्या काळात जिनिव्हा येथे झालेल्या जगभरातील शास्त्रज्ञांच्या परिषदेत अणुऊर्जेतून जगात शांतता कशा प्रकारे प्रस्थापित करता येऊ शकेल, याची दिशा दिली. भाभा हे खऱ्या अर्थाने जगमान्य अणुशास्त्रज्ञ होते, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी व्यक्त केले.फिरोदिया फाउंडेशन, संवाद आणि यशवंत प्रकाशन यांच्या वतीने रामचंद्र कुलकर्णी लिखित डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई यांच्या जीवनावरील व सिक्स गोल्डन लीवज् आॅफ इंडियन न्युक्लिअर सागा या तीन पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. मराठा चेंबरच्या सभागृहात मंगळवारी कार्यक्रम झाला. ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, डॉ. जयश्री फिरोदिया व रामचंद्र कुलकर्णी व्यासपीठावर होते. भारतीय हवाई दलातील योगदानाबद्दल धुंडिराज कुलकर्णी, प्रभाकर कुलकर्णी व रामचंद्र कुलकर्णी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.गोवारीकर म्हणाले, ‘‘जगात अणुऊर्जेचा शोध लागण्यापूर्वी होमी भाभा यांनी त्यात संशोधनास सुरुवात केली होती. त्यांचे ‘कॉस्मिक रे’वरील संशोधन अतुल्य होते. त्याबद्दल खरेतर त्यांना नोबेल पारितोषिक मिळायला हवे होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्वितीय होते. त्यांच्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विश्वास दाखविल्याने भाभा यांनी भारताच्या अणुऊर्जेची पायाभरणी केली.’’ (प्रतिनिधी)४अरुण फिरोदिया म्हणाले, ‘‘होमी भाभा, विक्रम साराभाई यांनी दाखविलेल्या पथावर चालल्यामुळे जगात भारताला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. भाभा यांचा मृत्यू संशयास्पद होता. अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरोनेही ते मान्य केले आहे. जर भाभांचा अपघाती मृत्यू झाला नसता तर आज अणुऊर्जेच्या माध्यमातून भारत अमेरिकेपेक्षाही प्रगत झालेला असता. ज्या काळात भारतात बैलगाडीचा वापर केला जात होता, त्या १९५६च्या काळात भारतात अणुऊर्जेचे रिअ‍ॅक्टर भाभांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले होते. त्या काळात फक्त युरोपमध्येच असे रिअ‍ॅक्टर होते. यावरून भाभा यांचे कर्तृत्व सिद्ध होते. आज आपण अणुऊर्जेने सज्ज असल्याने कोणताही देश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.