शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

हस्ताक्षरातील पासपोर्ट ठरणार कालबाह्य

By admin | Updated: November 20, 2015 00:41 IST

परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय : मंगळवारपासून अंमलबजावणी, इलेक्ट्रॉनिक पद्धतीतील पासपोर्ट सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्त्वाचे

कोल्हापूर : ज्या नागरिकांचे दहा अथवा वीस वर्षांच्या कालावधीसाठीचे हस्ताक्षरातील पासपोर्ट आहेत. शिवाय त्यांनी ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नवीन स्वरूपात करून घेतलेले नाहीत, अशा पासपोर्टधारकांना आता परदेशात प्रवेश मिळणार नाही. याबाबतचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी मंगळवार (दि. २४) पासून होणार आहे.गेल्या पाच ते सात वर्षांपूर्वी वीस आणि दहा वर्षांच्या कालावधीसाठी पासपोर्ट देण्यात आले होते. हे पासपोर्ट हस्ताक्षरात लिहिलेले होते. मात्र, सुरक्षितता आणि अचूकतेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तयार केलेले पासपोर्ट देणे सुरू केले. हस्ताक्षरातील ज्यांचे पासपोर्ट आहेत. त्यांनी ते नवीन करून घ्यावेत, अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयाने प्रवासी सेवा पुरविणाऱ्या संस्था आणि विविध माध्यमांद्वारे दिल्या होत्या. त्यानंतर आता १७ नोव्हेंबरला परराष्ट्र मंत्रालयाने हस्ताक्षरातील पासपोर्ट असणाऱ्या नागरिकांना परदेशात प्रवेश द्यावयाचा नाही, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवार (दि. २४) पासून होणार आहे. याबाबतच्या सूचना परराष्ट्र मंत्रालयाने प्रवासी सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, प्रतिनिधींना दिल्या आहेत. ज्यांचे पासपोर्ट हस्ताक्षरातील असतील त्यांना विमानतळावरूनच मागे फिरावे लागणार आहे. वर्षभरापूर्वी दिलेली सूचना बेदखल करून हस्ताक्षरातील पासपोर्ट घेऊन बसलेल्या लोकांना या निर्णयामुळे फटका बसणार आहे. कोल्हापुरातील ९५ टक्के  नवीन पासपोर्टपर्यटन तसेच विविध कामांनिमित्त परदेशवारी करणाऱ्यांचे कोल्हापुरातील प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. साधारणत: महिन्याला सहाशेजण पासपोर्ट काढतात. ते नवीन स्वरूपातील असल्याचे ‘ट्रेडविंग्ज’ कोल्हापूरचे व्यवस्थापक बी. व्ही. वराडे यांनी सांगितले. ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक पद्धतीतील नवे पासपोर्ट हे सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. हस्ताक्षरातील पासपोर्टधारकांना प्रवास बंदीचा परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेला निर्णय चांगला आहे. हस्ताक्षरातील पासपोर्टधारकांची देशातील संख्या सुमारे ६० हजारांपर्यत आहे. कोल्हापुरातील ९५ टक्के पासपोर्ट नव्या स्वरूपातील आहेत. ज्यांना भविष्यात कोणत्याही परदेशात जायचे नाही, अशा व्यक्तींनी हस्ताक्षरातील पासपोर्ट बदलून घेण्याची तसदी घेतलेली नाही. अशा व्यक्तींचेही प्रमाण बऱ्यापैकी आहे. ज्यांनी व्हिसा काढला आहे आणि त्यांना २४ नोव्हेंबरनंतर प्रवास करायचा आहे. त्यांना आता प्रवासाचे नियोजन पुढे ढकलून नवीन पासपोर्ट काढण्याशिवाय पर्याय नाही. (प्रतिनिधी)बनावटगिरीला चापहस्ताक्षरातील पासपोर्टमध्ये बनावटगिरी करता येत होती. त्याला चाप बसविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीतील नवीन पासपोर्ट बनविण्यात आले आहेत. या नव्या पासपोर्टचे पहिल्यांदा स्क्रिनिंग केले जाते. त्यामुळे पासपोर्ट क्रमांक अथवा नाव हे विमानतळावरील संगणकीकृ त यंत्रणेवर प्रवेशित केल्यानंतर पासपोर्टधारकांची माहिती समजते. शिवाय जगातील कोणत्याही विमानतळावर पासपोर्ट पाहता येतो.