शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

प्रवाशांनो, समस्या असेल तर तक्रार करा!

By admin | Updated: August 16, 2014 02:27 IST

कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी समस्या सतावत असतानाही त्याची तक्रार प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडे करता येत नाही. प्रवाशांना सतावणारी ही समस्या पाहता तक्रार करण्यासाठी कोकण रेल्वेने एसएमएस सेवा १५ आॅगस्टपासून सुरु केली आहे. खानपान सेवा आणि टॉयलेटची व्यवस्था बरोबर नसणे, डब्यांमध्ये अस्वच्छता असणे, फेरीवाले, तृतीयपंथीयांकडून त्रास होणे या आणि अनेक कारणांमुळे प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होत असतो. याचबरोबर प्रवाशांना स्थानकात असल्यास ट्रेन वेळेवर नसणे, पाण्याची आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची व्यवस्था नसणे अशा समस्यांनाही तोंड द्यावे लागते. याबाबत स्टेशन मास्तरकडे तक्रार नोंदवल्यास ती तक्रार रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर पोहोचेलच असे नाही. तसेच त्याचे निराकरण त्वरित होणेही अशक्य असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या या सर्व समस्या पाहता कोकण रेल्वेने प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी या मार्गावर एसएमएस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही सेवा १५ आॅगस्टपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी ९००४४७०७० या मोबाईल नंबर प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. प्रवाशांनी पाठवलेल्या एसएमएसची दखल कोकण रेल्वेच्या बेलापूर, नवी मुंबईस्थित कंट्रोल रुममध्ये २४ तास घेतली जाणार असल्याचे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले. या नंबरवर फक्त एसएमएस पाठवण्याची सोय असून फोन करुन बोलता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या क्रमांकावर प्रवाशांची तक्रार आल्यास तात्काळ संबंधित विभागाला त्याची माहीती दिली जाईल आणि प्रवाशाच्या समस्येचे निराकरण केले जाईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)