शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

तेजसबाबत प्रवाशांनी लावला तक्रारींचा सूर

By admin | Updated: May 24, 2017 17:10 IST

मोठा गाजावाजा करत कोकण रेल्वेनं चाकरमान्यांच्या सेवेत तेजस एक्स्प्रेस नावाची नवी ट्रेन दाखल केली.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 24 - मोठा गाजावाजा करत कोकण रेल्वेनं चाकरमान्यांच्या सेवेत तेजस एक्स्प्रेस नावाची नवी ट्रेन दाखल केली. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्याचाही रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. मात्र तेजस एक्स्प्रेसनं प्रवाशांची निराशा केली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटलेली तेजस एक्स्प्रेस सुस्थितीत करमाळीत पोहोचली. मात्र करमाळीहून परततानाही तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना घाणीचं साम्राज्य पाहायला मिळालं. ट्रेनमध्ये जागोजागी अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपुऱ्या सोयींमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मंगळवारी तेजस एक्स्प्रेस करमाळी स्थानकावरून सुटली, त्यावेळी ट्रेनमध्ये अस्वच्छता पाहायला मिळाली. तसंच तेजस एक्स्प्रेसमधील शौचालय स्वच्छ न ठेवल्यामुळे अनेक डब्यात दुर्गंधी पसरली होती. तेजस एक्स्प्रेसमधील एका कुटुंबाला स्वयंचलित दरवाज्यांमुळे त्रास झाला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचा मज्जा लुटणा-या प्रवाशांच्या हालाला पारावार उरला नव्हता. एक मुलगा रत्नागिरी स्टेशनला उतरला, मात्र त्याच वेळी अचानक ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले. त्यामुळे त्याला ट्रेनमध्ये प्रवेश करता आला नाही. नाइलाजास्तव त्या तरुणाला रत्नागिरी स्थानकावर दुस-या ट्रेनची वाट पाहावी लागली. तर त्याचे कुटुंबीय मुंबईला पुढे निघून गेले. त्यामुळे कोणतेही स्टेशन आल्याची आणि दरवाजे बंद कधी होणार असल्याची उद्घोषणा करावी, अशी मागणी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 
 
तत्पूर्वी ताशी तब्बल 200 किलोमीटर वेगाने धावणारी देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणारी ‘तेजस’ एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गावर अखेर सोमवारी धावली. दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी सुटलेली तेजस एक्स्प्रेस रात्री 12.35 वाजता करमाळी(गोवा) स्थानकात पोहोचण्याची वेळ असतानाच उशिरा दाखल झाली.  तेजस एक्स्प्रेसला छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ आणि करमाळी अशा स्थानकांवरच थांबा देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे रविवारी शर्मा आणि अन्य अधिकाऱ्यांनी ‘तेजस’ एक्स्प्रेसचे (मुंबई-करमळी) निरीक्षण केले होते. त्या वेळी ते म्हणाले होते की, ‘गेली तीन वर्षे ‘तेजस’ एक्स्प्रेससाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.’ प्रवाशांच्या गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.