शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रवाशांना सेवा पोलादी एसटीतून

By admin | Updated: August 24, 2016 05:50 IST

एसटी महामंडळाने अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी व ती कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

मुंबई : ‘एसटीचा प्रवास, विना अपघात प्रवास’ असे घोषवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाने अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी व ती कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. जीवितहानी टाळण्यासाठी महामंडळाने बसच्या बांधणीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्व बसेसच्या बांधणीसाठी पोलादाचा वापर केला जाईल. एसटीच्या ताफ्यात जवळपास १८ हजार बसेस असून, त्यांची बांधणी ही अ‍ॅल्युमिनियमने करण्यात आली आहे. या बसेसचे आयुर्मान हे साधारणपणे आठ वर्षांचे असते. एसटी बसचा अपघात झाल्यास अ‍ॅल्युमिनियम बांधणीच्या असलेल्या बसेस जीवितहानी टाळण्यासाठी कमी पडत आहेत. त्यामुळे बस स्टीलने बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सध्या एका बसमध्ये असा प्रयोग करण्यात आला आणि त्याची कार्यशाळेत चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी दिली. त्यामुळे एसटीच्या सुरुवातीला ५00 बसेसची संपूर्ण बाह्य बांधणी ही पोलादाने केली जाईल. या सर्व बसेस अन्य कारखान्यातून बांधून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी कंत्राट पद्धतीने काम दिले जाईल. त्यावर एसटीच्या तंत्रज्ञांकडूनही लक्ष दिले जाणार आहे. बसच्या आकारातही बदल करतानाच, त्यांची उंची वाढविण्यावरही भर दिला जात असल्याचे देओल म्हणाले. (प्रतिनिधी)>राज्यात मोठ्या प्रमाणात एसटी बसचे अपघात होताना दिसतात. २0१२-१३ ते २0१४-१५ सालापर्यंत दर लाख किलोमीटरमागे अपघातांचे प्रमाण हे 0.१५ टक्के एवढे होते. हेच प्रमाण 0.१४ टक्क्यांवर आले आहे. २0१४-१५मध्ये एकूण ४९५ जण अपघातांत दगावले होते. २0१५-१६शी तुलना करता या वर्षात ४0७ जण दगावले असून, ते प्रमाण बरेचसे कमी आहे. सरासरी वर्षाला जवळपास ४८५ जण एसटीच्या अपघातात दगावतात. यामध्ये एसटी प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण साधारपणे ६९ आहे.