शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

रेल्वेच्या पार्किंग इमारतीत दारू पार्टी!

By admin | Updated: June 6, 2017 04:15 IST

रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात येत असलेल्या पार्किंगच्या इमारतीत रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या

पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात येत असलेल्या पार्किंगच्या इमारतीत रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या असून येथे रात्रीच्या वेळेस दारूच्या पार्ट्या रंगत असल्याची साक्ष देत आहेत. महत्त्वाचे म्हणजे हाकेच्या अंतरावर रेल्वे लोहमार्ग पोलीस, सुरक्षा बल तसेच स्टेशन प्रबंधक कार्यालय आहे. तरीसुद्धा, या पार्ट्या कोणाच्या नजरेत कशा येत नाहीत, अशी चर्चा रेल्वे प्रवाशांमध्ये रंगली आहे. ही मंडळी जाणूनबुजून तर त्या पार्ट्यांकडे कानाडोळा करीत नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. ठाणे स्थानकाच्या आवारात वाहने पार्क करण्यासाठी बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वेचे लोहमार्ग पोलीस ठाणेही दुसरीकडे हलवण्यात आले आहे. या इमारतीचा तळ अधिक एक मजला उभा राहिला आहे. मात्र, हे काम निधीअभावी कित्येक दिवसांपासून रखडले आहे. याचदरम्यान, ठाणे शहराचे भाजपा आमदार संजय केळकर यांनी, या रखडलेल्या कामासह रेल्वे प्रवाशांच्या विविध विषयांबाबत रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा केली. त्या वेळी हे काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची कुठलीच पूर्तता झालेली नाही. वाहन पार्किंगसाठी मात्र हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर परिसरात लावलेल्या बेशिस्त वाहनांमधून रस्ता काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.या बहुमजली पार्किंग इमारतीचे काम पुढे सरकत नसले तरी, पहिला मजला दररोज रात्रीच्या वेळेस दारूच्या पार्ट्या करण्याचा अड्डा झाला आहे. दारू पिऊन तर्र होणारे तेथेच बाटल्या टाकून जातात. त्यामुळे हे पार्टी करणारे कोण, त्यांना तेथे कोणी परवानगी दिली, लोहमार्ग पोलीस आणि सुरक्षा बल यांचे त्याकडे कसे लक्ष जात नाही, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. या परिसरात गर्दुल्ल्यांनी आपले बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. दिवस असो वा रात्र तेथे गर्दुल्ले विसाव्यासाठी असल्याचे पाहण्यास मिळते.>...त्या घटनेने तरी शहाणे व्हावेनुकताच, अंबरनाथ येथे रेल्वे सुरक्षा दलाचा जवान सुधीर कांबळे यांनी रेल्वेच्या हद्दीत दारू पिण्यास विरोध केला. त्यामुळे ७ ते ८ जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यामध्ये ते जबर जखमी झाले आहेत. दरम्यान, ठाण्यातील पार्किंग इमारतीतील चित्र पाहता येथील पोलीस यंत्रणा कधी जागी होईल, असा सवाल उपस्थित होत आहे.असे प्रकार घडत असतील, तर हे चुकीचे आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाची अकार्यक्षमता समोर आली आहे. ठाणे स्थानक आणि आवारात घडणाऱ्या बारीकसारीक घटनांकडे स्थानक प्रबंधकांनी लक्ष द्यावे. महिला आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे विशेषकरून रेल्वे पोलीस असो वा प्रबंधक यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.- कांचन खरे, मध्य रेल्वे झोनल कमिटीखासदारांनी लक्ष द्यावेएकीकडे कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच कल्याण रेल्वे स्थानकातील जुगार अड्ड्यावर धाड टाक ली होती. त्याप्रमाणे ठाण्याचे शिवसेना पक्षाचे खासदार राजन विचारे हे स्थानकात अनैतिक धंद्यांना कधी आळा घालणार, अशी चर्चा सुरू आहे.