शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

गुंतवणूकदारांसोबत सरकारची भूमिका भागीदाराची

By admin | Updated: December 2, 2014 04:29 IST

‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्याचा आमचा ठाम निर्धार असून, उद्योग, गुंतवणूक क्षेत्रातील सर्व परवानग्या फास्ट ट्रॅकवर आणण्यात येतील

मुंबई : ‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्याचा आमचा ठाम निर्धार असून, उद्योग, गुंतवणूक क्षेत्रातील सर्व परवानग्या फास्ट ट्रॅकवर आणण्यात येतील आणि गुंतवणूकदारांसोबत आम्ही भागीदाराची भूमिका पार पाडू, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथील जागतिक दर्जाच्या बहुउद्देशीय पोर्ट टर्मिनल आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर या प्रकल्पाचा औपचारिक प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव एस.के. शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन, करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक प्रा.लि.चे अध्यक्ष निखिल गांधी व आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योगांच्या भरभराटीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे रोजगाराच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे राज्यातील उद्योगांच्या भरभराटीसाठी बंदरांच्या सुविधाही आवश्यक आहेत. जवळपास एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला व येत्या दोन वर्षांत पूर्ण होणारा हा प्रकल्प करंजा परिसराचा कायापालट करणार आहे. शासनाने उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक ई-प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. जलद परवानग्यांसाठी सचिवस्तरीय समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्यासाठी बंदरे, रेल्वे, रस्ते आदी सर्व क्षेत्रांत गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे. निखिल गांधी यांनी शासनाच्या सहकार्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते औपचारिक प्रारंभ झालेल्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम आजच सुरू होत आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून मिळालेले त्वरित सहकार्य आणि प्रतिसाद हा आमच्यासाठी सुखद धक्का होता. हा प्रकल्प होत असलेल्या करंजा परिसराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा आमचा निर्धार शासनाच्या विधायक प्रतिसादामुळे दुणावला आहे.’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन बक्षी यांनी आभार मानले. (विशेष प्रतिनिधी)