शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारण लढ्यात सहभागी व्हा

By admin | Updated: March 17, 2016 04:04 IST

पाण्याचे संवर्धन, पुनर्भरण, पुनर्वापरातूनच दुष्काळावर मात शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या मोहिमेत आणि दुष्काळ निवारणाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन

मुख्यमंत्र्यांचे आवाहन : जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन; ‘लोकमत’चा विशेष सहभागमुंबई : पाण्याचे संवर्धन, पुनर्भरण, पुनर्वापरातूनच दुष्काळावर मात शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या मोहिमेत आणि दुष्काळ निवारणाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.‘जलजागृती’ सप्ताहाचा प्रारंभ मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या निमित्ताने दुष्काळाची भीषणता आणि पाण्याचे महत्त्व विशद करणारे अत्यंत बोलक्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या राज्यभरातील छायाचित्रकारांच्या चित्रांचा यात समावेश आहे. ‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी ‘लोकमत’ने घेतलेल्या या पुढाकाराबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पाण्याचे दुर्भिक्ष्य हा गावागावात चिंतेचा, वादाचा विषय झाला आहे. त्यामुळे आताच पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास ते पुढील पिढीसाठी घातक ठरेल. जलप्रदूषण हाही चिंतेचा विषय आहे. सांडपाणी नद्यांत सोडणे, घनकचरा साठून राहणे, अतिक्रमण यामुळे जलस्रोत प्रदूषित होतात. त्यामुळेच शासनाने स्वच्छता अभियानात सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनावर विशेष भर दिला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून भूजल पातळी वाढविण्याचाही प्रयत्न होत आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. जलसंपदामंत्री महाजन प्रास्ताविकात म्हणाले की, ‘पाण्याचे नैसिर्गक स्रोत कोरडे झाले आहेत. शेती, उद्योगासह पेयजलासाठी पाणी नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळे ही वेळ आली आहे.’ कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यातील विविध नद्यांमधून आणलेल्या पाण्याचे पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी)लोकमतचा सहभाग‘लोकमत’च्या राज्यातील छायाचित्रकारांनी दुष्काळाची भीषणता आणि पाण्याचे महत्त्व या विषयावर काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी ‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. होळीला पाण्याचा गैरवापर टाळाहोळी हा आपला महत्त्वाचा सण आहे. सर्वांनी तो आनंदाने साजरा करायचा आहे. तथापि, पाण्याची उधळपट्टी होता कामा नये. पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा. कोरडी होळी खेळावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.