शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील मोऱ्यांचे अर्धवट काम

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

सैनवाडी व पोलीस ठाण्यानजीक असलेल्या दोन मोऱ्यांच्या कामांना एक वर्ष पूर्ण होवूनही याठिकाणचे बांधकाम मात्र अर्धवट अवस्थेतच आहे.

धाटाव : रोहा-कोलाड रस्त्यावरील धाटाव परिसरातील सैनवाडी व पोलीस ठाण्यानजीक असलेल्या दोन मोऱ्यांच्या कामांना एक वर्ष पूर्ण होवूनही याठिकाणचे बांधकाम मात्र अर्धवट अवस्थेतच आहे. या रस्त्यावर आजही साईडपट्ट्यांचा बऱ्याच ठिकाणी अभाव दिसून येतो. या अर्धवट कामांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सतत वर्दळ सुरू असलेल्या या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.गतवर्षी पावसाळा सुरू होण्याआगोदरच मे महिन्याच्या अखेरीस या दोनही मोऱ्यांची कामे सुरू झाली. या सुरू असलेल्या मोऱ्यांच्या कामांमुळे पर्यायी म्हणून धाटाव औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत रस्त्याचा त्याप्रसंगी वाहतुकीकरिता वापर करण्यात आला होता. अवघ्या आठ दिवसांनी शाळा सुरू होणार असून या रस्त्यावर पुन्हा शालेय विद्यार्थीवर्गाची रहदारी वाढणार आहे. सध्या या रस्त्यावरून धाटाव औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. सततचा वर्दळीचा रस्ता म्हणून रोहा-कोलाड रस्ता सुपरिचित आहे. भरधाव जाणाऱ्या वाहनांना या रस्त्यावरील मोऱ्यांच्या अर्धवट बांधकामांचा अंदाज न आल्याने व साईडपट्ट्यांच्या अभावामुळे कित्येक अपघात घडले आहेत. त्यातच रस्त्यालगत असलेल्या मोठमोठ्या वृक्षांचाही अडथळा अपघाताला कारणीभूत ठरत आहे. एका वर्षापूर्वी सुरू केलेल्या या मोऱ्यांची कामांच्या कार्यारंभ आदेशाची रक्कम ५२ लाख रूपये एवढी आहे. मात्र या दोन मोऱ्यांच्या कामाकरिता आजवर एकूण २५ लाख ५४ हजार रूपये एवढा खर्च झाला आहे. आज या कामाला तब्बल एक वर्ष पूर्ण झाले असून सध्या दोनही मोऱ्यांवरील स्लॅब टाकून झाल्यानंतर दोेन महिन्याच्या कालावधीनंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र या मोऱ्यांलगत असलेल्या कठड्यांचे काम मात्र आजही अर्धवट अवस्थेतच आहेत. या रस्त्यावरून सतत प्रवास करणाऱ्या कामगार, पादचाऱ्यांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोऱ्यांवरील कठड्यांचे काम पूण करण्याची मागणी पादचारी करत आहेत. वाळू नसल्याने काम थांबले; ठेके दाराला दिली नोटीसमध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीत रोजीरोटीकरिता कामगार वर्ग याच रस्त्याने प्रवास करतात. तर बहुतांशी शाळकरी विद्यार्थी या परिसरातील गावागावातून रोह्याकडे सायकलवर शाळेत किंवा कॉलेजमध्ये जातात. अलिबाग, मुरुडकडील पर्यटकांना पुण्याकडे जाण्यासाठी हाच सोयीचा रस्ता आहे. दरम्यान, रस्त्यावरील साईडपट्ट्या बऱ्याच ठिकाणी नसल्यामुळे या मोऱ्यांच्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहे.बांधकाम अर्धवट असल्याने मोऱ्यांच्या सळ्या वर आल्याचे दिसते. या ठिकाणचे काम सुरू असताना मध्यंतरी वाळू उपलब्ध नसल्यामुळे काम थांबले असल्याचे ठेकेदाराकडून संबंधित विभागाला सांगण्यात आल्याचे समजते. तर संबंधित विभागीय व उपविभागीय स्तरावर या ठेकेदाराला उर्वरित कामाबाबत नोटीस बजावण्यात आल्याचे रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एम.एस. घाडगे यांनी सांगितले.>रोहा-कोलाड रस्त्यावरील अर्धवट मोऱ्यांच्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे. सदर ठेकेदाराकडून हे काम लवकर न झाल्यास त्याठिकाणी दुसऱ्या ठेकेदाराला काम देऊन उर्वरित काम लवकरात लवकर करण्यात येईल. - एस.बी. ठाकूर, उपविभागीय अधिकारी,सा.बां. विभाग,रोहा>संरक्षक कठडे हे संरक्षणासाठी असतात. रस्त्यावरील दोन्ही मोऱ्यांच्या ठिकाणी कठडे नसल्यामुळे वाहनचालकांना अडचण होते.एक वर्ष पूर्ण होवूनही काम अर्धवट राहणे म्हणजे निष्काळजीपणाच म्हणावा लागेल.- वीरेंद्र पाशिलकर, सामाजिक कार्यकर्ते>रस्त्यावरून सायकलवर प्रवास करताना रस्त्यालगत साईडपट्ट्या काही ठिकाणी नाहीत, तर अर्धवट काम झालेल्या मोऱ्यांच्या ठिकाणी संरक्षण कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता जाणवते. - शार्दूल मोरे, शालेय विद्यार्थी.