शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

भांडणाला कंटाळून आई-वडिलांची हत्या

By admin | Updated: March 8, 2016 03:07 IST

दररोज होणाऱ्या भांडणाने वैतागलेल्या मुलाने सोमवारी पहाटे सूर्यादय चौकात आपल्या वडिलांची चाकूने गळा कापून आणि सावत्र आईची डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची घटना वासिंद येथे घडली.

वासिंदमधील घटना;तरुणाला अटकवासिंद/शहापूर : दररोज होणाऱ्या भांडणाने वैतागलेल्या मुलाने सोमवारी पहाटे सूर्यादय चौकात आपल्या वडिलांची चाकूने गळा कापून आणि सावत्र आईची डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची घटना वासिंद येथे घडली. या प्रकरणी आरोपी सागर सुरेश दिनकर यास पोलिसांनी अटक केली आहे.सुरेश वामन दिनकर व लता सुरेश दिनकर अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. सुरेश यांना पहिल्या पत्नीपासून सागर आणि अजय ही दोन मुले असून, पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुरेश यांनी लता यांच्याबरोबर दुसरा विवाह केला. तिच्यापासून एक मुलगी झाली आहे. हे सर्व वासिंद येथे एकत्र राहतात. वडील आणि सावत्र आई यांच्याबरोबर मुलांचे काही ना काही कारणांवरून रोज खटके उडत होते. या भांडणाने आणि शिवीगाळीमुळे घरातील वातावरण नेहमी तप्त असायचे. तालुक्यातील बिरवाडी येथे कबड्डी स्पर्धेतून सोमवारी पहाटे परतल्यानंतर मोठा भाऊ सागर घरी गेला; तर अजय मित्रांशी गप्पा मारत बसला. सागरचे आईवडिलांशी भांडण झाले. रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात वरवंटा घातला. त्यानंतर चाकूने वडिलांचा गळा चिरला. साधारण अर्ध्या तासाने लहान भाऊ अजय घरी आला असता त्याने आपले आईवडील दोघे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहिले. यामुळे बाहेर येऊन त्याने सुरेशला काय प्रकार झाला, असे विचारले असता त्याने मी दोघांना मारून टाकले, असे सांगितले. त्यानंतर वासिंद पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.