शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

शैक्षणिक अनुदान पालकांच्या हाती

By admin | Updated: January 16, 2016 01:38 IST

आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या धर्तीवर शैक्षणिक अनुदान थेट पालकांच्या हाती देण्याचा शासन विचार करीत आहे. येत्या वर्षभरात प्रायोगिक तत्त्वावर काही भागांत हा उपक्रम राबविणार

सांगली : आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या धर्तीवर शैक्षणिक अनुदान थेट पालकांच्या हाती देण्याचा शासन विचार करीत आहे. येत्या वर्षभरात प्रायोगिक तत्त्वावर काही भागांत हा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार बैठकीत केली. राज्य शासन शिक्षणावर ४२ हजार कोटी रुपये खर्च करते. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ९६ हजार रुपये खर्च होतात. या खर्चाचे व्हाऊचर पालकांना दिले, तर त्यांना हवे त्या शाळेत प्रवेश घेता येईल. असा प्रयोग आंध व तामिळनाडूच्या ग्रामीण भागांत यशस्वी ठरला आहे. त्यातून ज्या सरकारी शाळा चांगल्या आहेत, त्या चालतील आणि ज्या खासगी शाळा चांगल्या नाहीत, त्या बंद होतील. याबाबत आपण शिक्षक संघटना, संस्थाचालक, पालकांशी चर्चा करून वर्षभरात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्याचा विचार करीत आहोत, असे तावडे म्हणाले.राज्यातील १२०० शाळांत २०पेक्षा कमी पटसंख्या आहे. त्यात पुणे, नगर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक शाळांचा समावेश आहे. त्यावर काही बोलले, तर शिक्षक - संस्थाचालक नाराज होतात, पण त्यातून शिक्षणाचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा शाळा बंद झाल्या तरी मुलांचे शिक्षण थांबणार नाही. अशा धाडसी निर्णयात चांगले शिक्षक निश्चित शासनाच्या पाठीशी राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)साहित्यसेवा करा, वाद नकोमराठी साहित्य क्षेत्र वादविवादापासून दूर ठेवून साहित्याची सेवा करावी, असा सल्ला शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी साहित्यिकांना दिला. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व समारोपाला आपण स्वत: हजर राहणार आहोत. संमेलनात मराठी साहित्य, भाषा यावर अधिक विचार व्हावा. वादविवाद टाळले असते, तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.