शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

समांतर बिरादरीची भाजपात चर्चा

By admin | Updated: March 13, 2016 04:46 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट कनेक्ट असणाऱ्यांची एक मोठी फळी ‘मुख्यमंत्री मित्र’ या उपक्रमाद्वारे तयार केली जात असून, त्यामुळे भाजपामधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

यदु जोशी,  मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट कनेक्ट असणाऱ्यांची एक मोठी फळी ‘मुख्यमंत्री मित्र’ या उपक्रमाद्वारे तयार केली जात असून, त्यामुळे भाजपामधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री-सरकार आणि पक्ष यांच्यात प्रभावी समन्वयासाठीच हा प्रयत्न असल्याचे या उपक्रमाच्या कर्त्याधर्त्यांचे म्हणणे आहे. भाजपाच्या सध्याच्या यंत्रणेला सरकार आणि जनतेतील दुवा म्हणून काम करण्यात अपेक्षित यश न आल्याने, ‘मुख्यमंत्री मित्र’चा पर्याय पुढे आला आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना हजारो नागरिकांशी जोडून समांतर बिरादरी तर निर्माण केली जात नाही ना, अशी शंका घेतली जात आहे. तथापि, नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात स्वत:चा गट निर्माण करण्यात कधीही रस नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या विकासात जनतेला सामावून घेण्यासाठी ‘मुख्यमंत्री मित्र’ उपक्रमाला मान्यता दिली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. प्रत्यक्ष भाजपाचे काम करण्याची इच्छा नाही, पण सामाजिक कार्यात रस आहे, अशा लोकांना मुख्यमंत्री आणि पक्षाच्या जवळ आणण्यासाठी हा अजेंडा असल्याचे बोलले जाते. या उपक्रमाचा भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दहा जणांची एक टीम तयार केली जात आहे. त्यात एक निवृत्त सरकारी अधिकारी, एक निवृत्त पोलीस अधिकारी, एक निवृत्त शिक्षक, डॉक्टर आणि माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञाचा समावेश असेल. सरकारी योजनांची गावपातळीवर नीट अंमलबजावणी होते की नाही, कुठे, कोणत्या उणिवा आहेत, याचा फीडबॅक ही टीम घेईल आणि दर आठवड्याला मुख्यमंत्री कार्यालयास रिपोर्ट करेल. भाजपा आणि मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयासाठी नियुक्त करण्यात आलेले ओएसडी श्रीकांत भारतीय यांचीही या उपक्रमात महत्त्वाची भूमिका असेल. ‘मुख्यमंत्री मित्र’ हे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच काम करतील. लोक आपले काम घेऊन मुख्यमंत्री, मंत्री वा प्रशासनाच्या दारी जातात. लोकांना सरकार दरबारी कोणत्या अडचणी आहेत, हे विचारण्यासाठी मुख्यमंत्री मित्र त्यांच्या दारी जातील. तीन महिन्यांनंतर प्रत्येक तालुक्यात ‘मुख्यमंत्री मित्र’ची टीम उभी केली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याची आॅनलाइन इच्छा बाराशे जणांनी गेल्या वीस दिवसांत व्यक्त केली आहे. प्रत्येक ‘मुख्यमंत्री मित्र’ची निवड ही वैयक्तिक मुलाखतींद्वारेच करण्यात येणार आहे.