शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

प. रेल्वेवर नव्या फे-या नाहीत

By admin | Updated: July 18, 2014 03:07 IST

रेल्वे अर्थसंकल्पात जुनेच प्रकल्प उपनगरीय लोकल प्रवाशांच्या माथी मारण्याचे काम रेल्वेने केलेले असतानाच आता आणखी एक संकट पश्चिम रेल्वे प्रवाशांवर ओढवले आहे

मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पात जुनेच प्रकल्प उपनगरीय लोकल प्रवाशांच्या माथी मारण्याचे काम रेल्वेने केलेले असतानाच आता आणखी एक संकट पश्चिम रेल्वे प्रवाशांवर ओढवले आहे. यापूर्वीच भरमसाठ वाढलेल्या लोकल फेऱ्या आणि आणखी फेऱ्या चालवण्यासाठी नसलेली क्षमता पाहता यापुढे नवीन लोकल फेऱ्या वाढवणे अशक्य असल्याचे पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी सांगितले. त्यामुळे नवीन फेऱ्यांसाठी पश्चिम रेल्वे प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे. पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्प आणि पश्चिम रेल्वेवर येणाऱ्या तसेच सुरू असणाऱ्या प्रकल्पांविषयी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती समोर आणली. मागील सहा वर्षांत पश्चिम रेल्वेमार्गावर ९ डब्यांच्या लोकल १२ डब्यांच्या करण्यात आल्या. तसेच १२ डब्यांच्या लोकल आता १५ डबाही करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढली असून, गर्दीतला प्रवास कमी झालेला आहे. सध्या पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलच्या १,३00 फेऱ्या होत असून, या फेऱ्यांमध्ये येत्या काळात आणखी वाढ होणे अशक्य आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याची माहिती त्यांनी दिली. पाच मिनिटांच्या फरकाने सध्या ९२ ते ९३ टक्के लोकल धावत असून, हे पाहता फेऱ्या वाढवणार कशा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हार्बर रेल्वेचा विस्तार गोरेगावपर्यंत झाल्यावर सुसूत्रता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)