शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

प. महाराष्ट्रासह कोकणात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

By admin | Updated: May 5, 2017 03:57 IST

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला गुरुवारी सलग दुसऱ्या

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी वळीवाने झोडपले. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतमालाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर शहरासह आजरा, कागल, करवीर, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, भुदरगड मलकापूर या तालुक्यात सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला. सांगली शहरासह वाळवा, शिराळा आणि खानापूर तालुक्यांनाही पावसाने जोरदार तडाखा दिला. तर शिराळा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. खानापूर पूर्वभागातही मध्यरात्री गारा पडल्या. सातारा जिल्ह्यातील फलटण, शिरवळ, पाटण, औंध, कोरेगाव व मेढा परिसरातही जोरदार पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यात करमाळा, पंढरपूर, माळशिरस, सांगोल्यासह अक्कलकोट तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह दुपारी जोरदार पाऊस झाला. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर वळीवाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने कुडाळ तालुक्यातील शिवापूर आणि परिसरात मोठी पडझड झाली. दरम्यान, चंदगडमधील जंगमहट्टी (जि. कोल्हापूर) येथे मयूरेश तुप्पट (५) या अंगणवाडीतील बालकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. तर शेतात सिमेंटच्या विटांची भिंत अंगावर पडल्याने अंकली (जि. सांगली) येथील श्रीकांत पाटील (६०) यांचा मृत्यू झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क) चार दिवसांत राज्यात सगळीकडे पाऊसमुंबई : राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, विदर्भासह मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र ठिकठिकाणी गारांसह पावसाचा मारा सुरूच आहे. येत्या चार दिवसांसाठी राज्यात असेच वातावरण राहणार असून, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह ठिकठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.