शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

प. महाराष्ट्रातील नेत्यांचे ‘गाव चलो’ अभियान

By admin | Updated: September 14, 2014 00:36 IST

विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रत्येक मतदाराचे महत्त्व लक्षात घेऊन गावाकडील नेत्यांनी आता मुंबईतील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबई
विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रत्येक मतदाराचे महत्त्व लक्षात घेऊन गावाकडील नेत्यांनी आता मुंबईतील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये मेळावे घेतले जात असून जन्मभूमीच्या विकासासाठी मतदानास गावी येण्याचे आवाहन केले जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे. यामुळे आतार्पयत गावी मतदान करायचे व नंतर शाई पुसून पुन्हा मुंबईत मतदान करता येणार नाही. यामुळे  मुंबई व ग्रामीण भागातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. ग्रामीण भागातील विशेषत: सातारा, पुणो जिल्ह्यातील नेत्यांनी एकाच दिवशी मतदानाची शक्यता गृहीत धरून यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जुलैपासूनच मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. सातारा-जावी मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई व नवी मुंबईमध्ये तीन मेळावे घेऊन चाकरमान्यांना गावी येण्याचे आवाहन केले आहे. जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा घेतला. डॉ. अतुल भोसले यांनी  कराड दक्षीत मतदारसंघातील रहिवाशांचा नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये मेळावा आयोजित केला होता. सातारा जिल्ह्यातील चुरशीची लढत होणा:या माण-खटाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व येथील इच्छुक उमेदवार अनिल देसाई यांनीही कळंबोलीमध्ये मेळावा घेऊन मतदारांना गावी येण्याचे आवाहन केले. पुणो जिल्ह्यातील जुन्नर, खेड व आंबेगावमधील रहिवाशांचा मेळावा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत केला होता. चाकरमान्यांना कोणत्याही स्थितीत मतदानासाठी गावी घेऊन जाण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. याचा फटका मुंबई व नवी मुंबईमधील उमेदवारांना बसणार आहे.
 
च्या निवडणुकीत मुंबईतील चाकरमान्यांचे महत्त्व वाढले आहे. चाकरमानी गावी आले की एकगठ्ठा मतदान होते. कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा मोठा प्रभाव पडतो. यामुळे यावेळी चाकरमान्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
मुंबई, नवी मुंबईतील नेत्यांची डोकेदुखी वाढली 
ग्रामीण भागातील नेत्यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. चाकरमान्यांना भावनिक साद घातली जात आहे. यामुळे हजारो चाकरमानी मतदानासाठी गावी जाणार हे निश्चित झाले आहे. यामुळे मुंबई व नवी मुंबईतील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदारांचे स्थलांतर थांबविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.