शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
5
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
6
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
7
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांचा जागतिक स्तरावर डंका
8
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
9
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
10
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
11
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
12
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
13
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
14
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
16
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
17
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
18
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
19
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
20
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

प. महाराष्ट्रातील नेत्यांचे ‘गाव चलो’ अभियान

By admin | Updated: September 14, 2014 00:36 IST

विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रत्येक मतदाराचे महत्त्व लक्षात घेऊन गावाकडील नेत्यांनी आता मुंबईतील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबई
विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रत्येक मतदाराचे महत्त्व लक्षात घेऊन गावाकडील नेत्यांनी आता मुंबईतील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये मेळावे घेतले जात असून जन्मभूमीच्या विकासासाठी मतदानास गावी येण्याचे आवाहन केले जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे. यामुळे आतार्पयत गावी मतदान करायचे व नंतर शाई पुसून पुन्हा मुंबईत मतदान करता येणार नाही. यामुळे  मुंबई व ग्रामीण भागातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. ग्रामीण भागातील विशेषत: सातारा, पुणो जिल्ह्यातील नेत्यांनी एकाच दिवशी मतदानाची शक्यता गृहीत धरून यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जुलैपासूनच मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. सातारा-जावी मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई व नवी मुंबईमध्ये तीन मेळावे घेऊन चाकरमान्यांना गावी येण्याचे आवाहन केले आहे. जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा घेतला. डॉ. अतुल भोसले यांनी  कराड दक्षीत मतदारसंघातील रहिवाशांचा नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये मेळावा आयोजित केला होता. सातारा जिल्ह्यातील चुरशीची लढत होणा:या माण-खटाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व येथील इच्छुक उमेदवार अनिल देसाई यांनीही कळंबोलीमध्ये मेळावा घेऊन मतदारांना गावी येण्याचे आवाहन केले. पुणो जिल्ह्यातील जुन्नर, खेड व आंबेगावमधील रहिवाशांचा मेळावा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत केला होता. चाकरमान्यांना कोणत्याही स्थितीत मतदानासाठी गावी घेऊन जाण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. याचा फटका मुंबई व नवी मुंबईमधील उमेदवारांना बसणार आहे.
 
च्या निवडणुकीत मुंबईतील चाकरमान्यांचे महत्त्व वाढले आहे. चाकरमानी गावी आले की एकगठ्ठा मतदान होते. कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा मोठा प्रभाव पडतो. यामुळे यावेळी चाकरमान्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
मुंबई, नवी मुंबईतील नेत्यांची डोकेदुखी वाढली 
ग्रामीण भागातील नेत्यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. चाकरमान्यांना भावनिक साद घातली जात आहे. यामुळे हजारो चाकरमानी मतदानासाठी गावी जाणार हे निश्चित झाले आहे. यामुळे मुंबई व नवी मुंबईतील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदारांचे स्थलांतर थांबविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.