शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

प. महाराष्ट्रातील नेत्यांचे ‘गाव चलो’ अभियान

By admin | Updated: September 14, 2014 00:36 IST

विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रत्येक मतदाराचे महत्त्व लक्षात घेऊन गावाकडील नेत्यांनी आता मुंबईतील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबई
विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रत्येक मतदाराचे महत्त्व लक्षात घेऊन गावाकडील नेत्यांनी आता मुंबईतील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये मेळावे घेतले जात असून जन्मभूमीच्या विकासासाठी मतदानास गावी येण्याचे आवाहन केले जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे. यामुळे आतार्पयत गावी मतदान करायचे व नंतर शाई पुसून पुन्हा मुंबईत मतदान करता येणार नाही. यामुळे  मुंबई व ग्रामीण भागातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. ग्रामीण भागातील विशेषत: सातारा, पुणो जिल्ह्यातील नेत्यांनी एकाच दिवशी मतदानाची शक्यता गृहीत धरून यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जुलैपासूनच मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. सातारा-जावी मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई व नवी मुंबईमध्ये तीन मेळावे घेऊन चाकरमान्यांना गावी येण्याचे आवाहन केले आहे. जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा घेतला. डॉ. अतुल भोसले यांनी  कराड दक्षीत मतदारसंघातील रहिवाशांचा नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये मेळावा आयोजित केला होता. सातारा जिल्ह्यातील चुरशीची लढत होणा:या माण-खटाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व येथील इच्छुक उमेदवार अनिल देसाई यांनीही कळंबोलीमध्ये मेळावा घेऊन मतदारांना गावी येण्याचे आवाहन केले. पुणो जिल्ह्यातील जुन्नर, खेड व आंबेगावमधील रहिवाशांचा मेळावा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत केला होता. चाकरमान्यांना कोणत्याही स्थितीत मतदानासाठी गावी घेऊन जाण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. याचा फटका मुंबई व नवी मुंबईमधील उमेदवारांना बसणार आहे.
 
च्या निवडणुकीत मुंबईतील चाकरमान्यांचे महत्त्व वाढले आहे. चाकरमानी गावी आले की एकगठ्ठा मतदान होते. कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा मोठा प्रभाव पडतो. यामुळे यावेळी चाकरमान्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
मुंबई, नवी मुंबईतील नेत्यांची डोकेदुखी वाढली 
ग्रामीण भागातील नेत्यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. चाकरमान्यांना भावनिक साद घातली जात आहे. यामुळे हजारो चाकरमानी मतदानासाठी गावी जाणार हे निश्चित झाले आहे. यामुळे मुंबई व नवी मुंबईतील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदारांचे स्थलांतर थांबविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.