शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमधील वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर?

By admin | Updated: May 13, 2014 04:31 IST

पश्चिम बंगालात वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कुणासाठी लाभदायी ठरतो याबद्दल येथे मोठी उत्सुकता आहे.

किरण अग्रवाल, कोलकाता राज्यातील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यातील वाक्युद्धाने तापलेल्या पश्चिम बंगालात वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कुणासाठी लाभदायी ठरतो याबद्दल येथे मोठी उत्सुकता आहे. राज्यात यंदा विक्रमी मतदान झाले. प. बंगालात मतदानाचा शेवटचा टप्पा आज पार पडला, यात ८० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी झालेल्या चार चरणांतही मतदानाची सरासरी ८१ टक्क्यांनी इतकी राहिली जी गेल्या २००९ च्या निवडणुकीपेक्षा दीड ते दोनने जास्त आहे. अर्थात, यंदाच्या मतदानात मतदान केंद्र बळकाविणे व बोगस मतदानाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आरोप भाजपा व डाव्यांतर्फे करण्यात आले असून, तशा लेखी तक्रारीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार राज्यात निवडणूक हिंसाचाराच्या सुमारे एक हजारांहून अधिक घटना घडल्या असून, त्यात आठ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तर ९५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आजच्या मतदानाप्रसंगी उत्तर २४ परगणा परिसरातील हाडवा येथे तृणमूल व डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोळीबारात चार गंभीर व १७ जखमी झाले आहेत. नक्षलवादी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या झाडग्राम मधील गोयीबल्लभपूर येथे चौथ्या चरणांत झालेल्या मतदानानंतर हिंसाचार होऊन तीन लोक गंभीर जखमी झाले. तेथे १२ घरांची तोडफोड करण्यात आली. भाकपाच्या मतदान प्रतिनिधीला मतदान केंद्रातून काढून दिल्यानंतर ही घटना घडली होती. राज्यातील निवडणूक मैदान यंदा ममता दीदी व मोदी यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी गाजले. गुजरातचे कसाई, कागदी वाघ व दंगेखोर म्हणून मोदींना संबोधत त्यांना बेड्या घालून जेलमध्ये डांबण्याची भाषा तृणमूलतर्फे केली गेली, तर ‘वेड्यांसाठी वापरल्या जाणार्‍या दोरीतही तुम्ही भ्रष्टाचार कराल, त्यापेक्षा सांगाल, त्या जेलमध्ये मीच जाऊन बसतो’, असे म्हणत मोदींनी तृणमूलच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. बांगलादेशी घुसखोर व शरणार्थी, मूळ बंगाली व बंगाल बाहेरून आलेले हिंदी भाषिक तसेच मतुआ नागरिकांचे अधिकार अशा धार्मिक जातीय व प्रांतवादी मुद्याखेरीज राज्यातील शारदा चिटफंड घोटाळ्यासारख्या विषयांवर आरोप-प्रत्यारोपांचे बार भरले गेले. गेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकांत तृणमूल व काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडीने लढले होते. तेव्हा दुसर्‍या स्थानी डावे होते. भाजपाच्या पदरात अवघी एकच जागा होती, तर संपूर्ण राज्यात भाजपाला अवघ्या ४ ते ४.५० टक्के प्रमाणात मते मिळाली होती. यंदा ‘मोदी फॅक्टर’ मुळे हे प्रमाण वाढणार असले तरी ते विजयाप्रत उंचावलेल का, हा खरा औत्सुक्याचा विषय आहे. तृणमूल व काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्याने त्यांच्यात होणारे मतविभाजन भाजपाच्या पथ्यावर पडते की डाव्यांच्या; हादेखील प्रश्न आहे, ज्याचे उत्तर आणखी चार दिवसांनी मिळेल.