शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प. बंगालमधील वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर?

By admin | Updated: May 13, 2014 04:31 IST

पश्चिम बंगालात वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कुणासाठी लाभदायी ठरतो याबद्दल येथे मोठी उत्सुकता आहे.

किरण अग्रवाल, कोलकाता राज्यातील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यातील वाक्युद्धाने तापलेल्या पश्चिम बंगालात वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कुणासाठी लाभदायी ठरतो याबद्दल येथे मोठी उत्सुकता आहे. राज्यात यंदा विक्रमी मतदान झाले. प. बंगालात मतदानाचा शेवटचा टप्पा आज पार पडला, यात ८० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी झालेल्या चार चरणांतही मतदानाची सरासरी ८१ टक्क्यांनी इतकी राहिली जी गेल्या २००९ च्या निवडणुकीपेक्षा दीड ते दोनने जास्त आहे. अर्थात, यंदाच्या मतदानात मतदान केंद्र बळकाविणे व बोगस मतदानाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आरोप भाजपा व डाव्यांतर्फे करण्यात आले असून, तशा लेखी तक्रारीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार राज्यात निवडणूक हिंसाचाराच्या सुमारे एक हजारांहून अधिक घटना घडल्या असून, त्यात आठ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तर ९५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आजच्या मतदानाप्रसंगी उत्तर २४ परगणा परिसरातील हाडवा येथे तृणमूल व डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोळीबारात चार गंभीर व १७ जखमी झाले आहेत. नक्षलवादी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या झाडग्राम मधील गोयीबल्लभपूर येथे चौथ्या चरणांत झालेल्या मतदानानंतर हिंसाचार होऊन तीन लोक गंभीर जखमी झाले. तेथे १२ घरांची तोडफोड करण्यात आली. भाकपाच्या मतदान प्रतिनिधीला मतदान केंद्रातून काढून दिल्यानंतर ही घटना घडली होती. राज्यातील निवडणूक मैदान यंदा ममता दीदी व मोदी यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी गाजले. गुजरातचे कसाई, कागदी वाघ व दंगेखोर म्हणून मोदींना संबोधत त्यांना बेड्या घालून जेलमध्ये डांबण्याची भाषा तृणमूलतर्फे केली गेली, तर ‘वेड्यांसाठी वापरल्या जाणार्‍या दोरीतही तुम्ही भ्रष्टाचार कराल, त्यापेक्षा सांगाल, त्या जेलमध्ये मीच जाऊन बसतो’, असे म्हणत मोदींनी तृणमूलच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. बांगलादेशी घुसखोर व शरणार्थी, मूळ बंगाली व बंगाल बाहेरून आलेले हिंदी भाषिक तसेच मतुआ नागरिकांचे अधिकार अशा धार्मिक जातीय व प्रांतवादी मुद्याखेरीज राज्यातील शारदा चिटफंड घोटाळ्यासारख्या विषयांवर आरोप-प्रत्यारोपांचे बार भरले गेले. गेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकांत तृणमूल व काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडीने लढले होते. तेव्हा दुसर्‍या स्थानी डावे होते. भाजपाच्या पदरात अवघी एकच जागा होती, तर संपूर्ण राज्यात भाजपाला अवघ्या ४ ते ४.५० टक्के प्रमाणात मते मिळाली होती. यंदा ‘मोदी फॅक्टर’ मुळे हे प्रमाण वाढणार असले तरी ते विजयाप्रत उंचावलेल का, हा खरा औत्सुक्याचा विषय आहे. तृणमूल व काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्याने त्यांच्यात होणारे मतविभाजन भाजपाच्या पथ्यावर पडते की डाव्यांच्या; हादेखील प्रश्न आहे, ज्याचे उत्तर आणखी चार दिवसांनी मिळेल.