शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईत किरणने फुलविला पपईचा मळा

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

तालुक्यातील किरण तुम्बडा या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकरात तैवान पपईची लागवड करून वर्षाकाठी ३ लाख ५० हजाराचे उत्पन्न मिळविले.

राहुल वाडेकर,

विक्रमगड- तालुक्यात भीषण पाणी टंचाई असतांना या तालुक्यातील किरण तुम्बडा या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकरात तैवान पपईची लागवड करून वर्षाकाठी ३ लाख ५० हजाराचे उत्पन्न मिळविले. यातून खर्च वजा करता २ लाख ७५ हजाराचा निव्वळ नफा त्याना होणार आहे.खांडया आदिवासी पाडयात राहणाऱ्या किरण तुम्बडा यांनी केवळ शेती करायची म्हणून दोन वर्षापूर्वी वसई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील वाहक पदाचा राजीनामा दिला. माळरान आणि काहीशा खडकाळ जमिनीवर केळी पिकविण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि आपल्या ४ एकर जागेपैकी एका एकरावर तैवान जातीच्या पपईची लागवड केली.जून २०१५ च्या सुरुवातीला जमिनीची नांगरणी केली त्यानंतर ६ बाय ६ फुट अंतरावर १ बाय दीड फुटाचे खडडे खोदले आणि वाडा तालुक्यतील अनिल पाटील यांच्या नर्सरीतून तैवान या जातीची ८५० रोपे आणून लागवड केली. खत आणि पाण्याचे योग्य ते नियोजन केले. विशेष म्हणजे पाण्याची टंचाई असूनदेखील पपई लागवडीचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला विहीर आणि बोअरवेल खोदून देखील पाणी लागले नाही तरीही त्यांनी हताश न होता २ किमी अंतरावरून धरणाचे पाणी इंजिनच्या सहाय्याने आपल्या विहिरीत साठवून पपईच्या झाडांना देण्यासाठी ड्रीपचा वापर केला. पपई लागवडीनंतर तुम्बडा यांना साधारणत: ९ महिन्यांनी उत्पन्न मिळण्यास सुरु वात झाली. दर दहा दिवसांनी पपईच्या फळांची तोडणी केली. जाते एक एकरातील पपईच्या लागवडीपासून तुम्बडा यांना या वर्षी ३५ ते ४० टन उत्पन्नाची अपेक्षा आहे सरासरी दर १० रु किलो गृहीत धरला तरी ३ लाख ५० हजाराचे उत्पन्न त्यांना मिळणार आहे. ाजुरी, रोप, खत , औषध यांचा सुरुवातीचा खर्च ७५ हजार वजा केला तरी २ लाख ७५ हजाराचा निव्वळ नफा यावर्षी त्याना होणार आहे. एका झाडापासून दोन वर्ष हे उत्पन्न अपेक्षित आहे .पपईची विक्र ी ते भिवंडीमार्केट मध्ये करीत आहेत. किरण यांच्या पपईलागवडीच्या कामात त्यांच्या घरच्यांचा खूप मोठा हात भार लागतो आहे. किरण यांनी हातची असलेली नोकरी सोडणे घरच्यांना मान्य नव्हते. मात्र नोकरी करून जे आर्थिक उत्पन्न मिळणार नव्हते ते पपईच्या पिकातून एका वर्षात मिळवले आहे यामुळे कुटुंबीय हि समाधान व्यक्त करत आहेत.>तरुणांनो शेती कडे पाठ फिरवू नकाशेती परवडत नाही म्हणून एकीकडे शेतकरी शहराकडे नोकरीसाठी स्थलांतर करीत असतांना या तरुणाने शेतकाऱ्याने वाहकाची नोकरी सोडून शेती करण्याचा ध्यास घेत शेतीतूनच आपली आर्थिक घडी मजबूत करण्याचा प्रयत्न यशस्वी केला हाच आदर्श शेतीतून पळ काढणाऱ्या आजच्या तरुण शेतकऱ्यांनी घेतल्यास ते त्यांच्या नक्कीच फायद्याचे ठरेल.