शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
6
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
10
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
11
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
12
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
13
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
14
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
15
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
16
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
17
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
18
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
19
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
20
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

नवरात्र उत्सवात ‘पानविड्या’चा प्रसाद!

By admin | Updated: October 9, 2016 21:56 IST

लक्षावधी भाविकांचे शक्तिपीठ असलेल्या घाटपुरी येथील जागृत जगदंबा देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात भाविकांची अलोट गर्दी असते

अनिल गवई/ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 9 - लक्षावधी भाविकांचे शक्तिपीठ असलेल्या घाटपुरी येथील जागृत जगदंबा देवीच्या दर्शनासाठी नवरात्रात भाविकांची अलोट गर्दी असते. या उत्सवानिमित्त अश्विन शु. अष्टमीला जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पान विड्याचा (तांबूल) अनोखा प्रसाद दिल्या जातो.

तांबुलाचा नावीन्यपूर्ण प्रसाद मिळणारे घाटपुरी देवस्थान हे विदर्भातील एक महत्त्वपूर्ण देवस्थान असून, या प्रसादाच्या परंपरेला दोन दशकांचा इतिहास आहे. जागृत ज्योत म्हणून परिसरात आणि विदर्भाच्या कानाकोपऱ्यात घाटपुरी येथील जगदंबा देवीची महती आहे. या देवीच्या साक्षात्काराची प्रचिती आल्याने, घाटपुरी येथील जगदंबा मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात नि:शुल्क तांबूल वितरणाची परंपरा खामगाव येथील अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी १९९८ पासून सुरू केली. सुरुवातीला अतिशय अल्प स्वरूप या प्रसाद वितरणाचे होते; मात्र दिवसेंदिवस या प्रसादाची ख्याती दूरवर पोहोचत असल्याने, आता सुमारे २७ हजार पानांपासून (खाण्याची पाने) प्रसाद तयार केल्या जातो.

अश्विन शु. अष्टमीला रात्री ८ ते ११ च्या कालावधीत दूरवरून तसेच दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हा प्रसाद दिल्या जातो. या प्रसादाच्या प्रसादाच्या वितरणासाठी अग्रवाल परिवाराकडून कोणतीही वर्गणी घेतली जात नाही, तथापि, आपल्या शक्तीनुरूप दान देणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेला तडा न देता, तो देईल तितक्याच रुपयांच्या साहित्याची प्रसादात अतिरिक्त वाढ करण्यात येते. तांबुलाचा प्रसाद वितरणासाठी पंकज अग्रवाल, पराग अग्रवाल, वरुण अग्रवाल, अंकित अग्रवाल, संजय केडिया आणि अग्रवाल परिवारातील सदस्य सहकार्य करतात. उपवासालाही चालतो पानविडा! जगदंबा देवीच्या मंदिरात वितरित केल्या जाणाऱ्या पानविड्याच्या प्रसादात खाण्याचे पान, सोप, सुपारी, लवंग, विलायची, चमन बहार, चटणी, गुलकंद आदी साहित्याचा वापर केल्या जातो. त्यामुळे हा प्रसाद उपवासालादेखील चालतो.

तसेच अष्टमीला उपवास सोडणारे भाविक या तांबुलाच्या प्रसादानेच उपवास सोडण्याची प्रथा आता येथे प्रचलित झाली आहे. आठ दिवसांपूर्वीच या प्रसादाची तयारी केल्या जाते.

अष्टमीला पान विड्याच्या प्रसादाचे वाटप करण्याच्या परंपरेला १८ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला या प्रसाद वितरणाचे अतिशय लहान स्वरूप होते. आता २७ हजार पाने आणि इतर साहित्याचा प्रसाद वितरित केल्या जातो. या प्रसादासाठी अनोखी श्रद्धा भाविकांमध्ये दिसून येते.- पंकज अग्रवाल सेवादायक,तांबूल प्रसाद