शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्या प्रकरण; संशयित आरोपी समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 14:18 IST

संशयित आरोपी समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 17- काँम्रेड गोविंद पानसरे हत्ये प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याला सशर्त जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयात आज समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली आहे. 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर समीर गायकवाडला जामीन मंजूर झाला आहे. 

पण हा जामीन मंजूर करताना अनेक अटी कोर्टाने घातल्या आहेत. समीर गायकवाडला महाराष्ट्राबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करायला बंदी घालण्यात आली आहे. तसंच दर रविवारी तपास यंत्रणांकडे हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समीर गायकवाडला त्याचा पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देण्याते आदेश आज कोर्टाने सुनावणी दरम्यान दिले आहेत. जामीनकाळात समीर गायकवाड याला निवासाचा पत्ता देणंसुद्धा कोर्टाने बंधनकारक केलं आहे.

समीर गायकवाडला एसआयटीने १६ सप्टेंबर २०१५ ला अटक केली होती. त्याच्या जामीनासाठी यापूर्वी चारवेळा सुनावणी झाली. शनिवारी सकाळी न्यायालयाने त्याचा निकाल दिला. गायकवाड याची २५ हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. परंतू हे करताना न्यायालयाने त्याच्यावर कांही निर्बंध घातले. त्यानुसार समीर गायकवाड याला दर रविवारी ११ ते १ वाजता विशेष तपास पथकाच्या कोल्हापुरातील कार्यालयात हजेरीस यावे लागेल. कोल्हापूर जिल्ह्यात त्यास इतरत्र कुठेही प्रवेश करता येणार नाही. साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालय त्याची गंभीर दखल घेईल. त्याचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागेल व बाहेर कुठेही जायचे असेल तर तो कुठे जाणार आहे, तिथे कुणाकडे राहणार आहे हे कळविणे बंधनकारक असेल. आपल्या वर्तनाने कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. 
 
पानसरे त्यांच्या येथील सागरमाळ परिसरातील घरापासून मॉर्निंग वॉकहून परत येताना त्यांच्यासह पत्नी उमा पानसरे यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या चार मारेकºयांनी १६ फेब्रुवारी २०१५ ला गोळीबार केला होता. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा २० फेब्रुवारीला उपचार सुरु असताना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत्यू झाला होता. उमा पानसरे यांच्याही डोक्याला गोळी चाटून गेली होती परंतू त्यातून त्या बचावल्या. त्यानंतर विशेष तपास पथकांने ‘सनातन’ संस्थेचा पूर्ण वेळ साधक असलेल्या समीर गायकवाड याला १६ सप्टेंबर २०१५ अटक केली होती. तेव्हा पासून तो पोलिसांच्या ताब्यात होता.