शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पानसरे हल्ल्याचा तपास अंधातरी

By admin | Updated: March 5, 2015 01:23 IST

ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व बाजूने शोध सुरू असला तरी पोलिसांना अजून कोणतेही ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत,

कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व बाजूने शोध सुरू असला तरी पोलिसांना अजून कोणतेही ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत, अशी कबुली पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. तसेच उमा पानसरेंना मानसिक धक्का बसल्याने त्यांच्याकडून दिली जाणारी माहिती विसंगत असल्याचेही त्यांनी सांगितले.पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्ही नक्कीच हल्लेखोरांपर्यंत पोहोचू, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. पानसरे दाम्पत्यावरील प्राणघातक हल्ल्यास १७ दिवस झाले, परंतु पोलिसांना कोणतीच ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे तपासाचा आढावा घेण्यासाठी दयाल मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बुधवारी तपास पथकांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दयाल म्हणाले, की हल्ल्यासाठी पिस्तूल वापरण्यात आले. त्याच्या तपासणीचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अजून मिळालेला नाही. कोणत्याही घटनेत तपासाच्या दृष्टीने प्रत्यक्षदर्शी पुरावा सगळ््यात महत्त्वाचा दुवा असतो. मात्र नागरिकांकडून ठोस माहिती दिली जात नाही. त्याची काही कारणे शकतील, परंतु लोक पोलिसांना माहिती देण्यास पुढे येण्यास तयार नाहीत. उमा पानसरेंना मंगळवारी डिस्चार्ज मिळाला. त्यांचा अजून पुरेसा जबाबही घेता आलेला नाही. पुणे, कोकण विभाग व परराज्यांतील पोलिसांचीही मदत आम्ही घेत आहोत. त्यामुळे खास तपास पथके (एसआयटी)आताही अस्तित्वात आहेत. सीबीआय चौकशीची मागणी केल्यास त्यास आमचा विरोध नाही. परंतु यापूर्वीच्या दोन खून प्रकरणांत सीबीआय चौकशीचे पुढे काय झाले, हे आपल्या सगळ््यांना ज्ञात आहेच, असेही ते म्हणाले.आता तिसऱ्या खंडपीठाचा शोधमुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणाऱ्या फौजदारी जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयातील दोन खंडपीठांनी बुधवारी नकार दिला. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही जनहित याचिका केली होती. उच्च न्यायालयातील सध्याच्या कामकाज वाटपानुसार फौजदारी प्रकरणांच्या सुनावणीसाठी हीच दोन खंडपीठे आहेत. त्यामुळे मुख्य न्यायमूर्तींना स्वतंत्र खंडपीठ नेमावे लागेल. ते कोणाचे असेल, हे लवकरच स्पष्ट होईल. तपासात अडचणी : पोलिसांनी हल्ला नेमका कसा झाला, त्याचे चित्रण करून ते उमातार्इंना टीव्हीवर दाखविले. मात्र त्यांना हल्लेखोर कोणत्या बाजूने आले याची माहितीही खात्रीपूर्वक देता आलेली नाही. अगोदरच्या माहितीबद्दल पुन्हा विचारणा केल्यावर त्यांच्याकडून विसंगत माहिती दिली जात आहे. पोलीस तपासास पूरक माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.पानसरे हल्ला तपासात कोणतीच प्रगती नसल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. ९ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. ११ मार्चला मुंबईत डाव्या पुरोगामी पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारची कोंडी होऊ शकते, हे लक्षात घेता स्वत: पोलीस महासंचालक घाईघाईने कोल्हापूरला आले.