शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

पंचनामे झाले : भरपाई कधी?

By admin | Updated: May 10, 2014 20:39 IST

धामणी (ता. आंबेगाव) येथे मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे फार मोठे नुकसान झाले,

लोणी-धामणी : धामणी (ता. आंबेगाव) येथे मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे फार मोठे नुकसान झाले, त्याचे पंचनामेसुद्धा झाले; पण आजपर्यंत एक पैसाही नुकसान म्हणून मिळाला नाही. येत्या आठ दिवसांत जर नुकसानभरपाईचे पैसे मिळाले नाही, तर येथील तलाठी कार्यालयासमोर शेतकरी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती उपसरपंच अंकुश भूमकर यांनी दिली आहे. मागील मार्च-एप्रिल महिन्यात धामणी व परिसरातील वाड्या-वस्त्या, मळे येथे गारपिटीचा व अवकाळी पावसाचा फार मोठा तडाखा बसल्याने येथील शेतकर्‍यांच्या शेतातील कांदा, गहू, कलिंगड, फळबागा व तरकारी पिकांना फार मोठा फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, अद्याप मदत मिळालेली नाही. वाळुंजनगर (ता.आंबेगाव) येथे मार्च व एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले; पण नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे कृषी विभाग, तलाठी व ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे पंचनामेच झाले नाहीत, अशी तक्रार येथील सरपंच उषा वाळुंज व उपसरपंच महेंद्र वाळुंज व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. येथील उपसरपंच म्हणाले की, आम्ही गारपीट व अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करा, असे येथील कृषी पर्यवेक्षक, तलाठी व ग्रामसेवकाला सांगितले; पण त्यांनी आम्हाला वाळुंजनगर येथील शेतकर्‍यांच्या पंचनाम्यासंदर्भात आदेश नाही, अशी टोलवा-टोलवीची उत्तरे दिली.