शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पंचाहत्तरीतही ‘साधू’ गाजवतोय तमाशाचा फड!

By admin | Updated: June 2, 2014 05:50 IST

माशाची कला जिवंत ठेवण्याची साधू व आत्मा (आत्मा आता हयात नाहीत) यांची जिद्द निश्चितच कौतुकास्पद. रंगमंचावर टाळ्यांची

प्रताप बडेकर, कासेगाव (सांगली) - वय वाढत चालले की, अंगातील शक्ती क्षीण होऊन काम करण्याचा उत्साह कमी होतो, असे म्हणतात़ मात्र, वयाची पंचाहत्तरी गाठूनही वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील नटसम्राट साधू कासेगावकर आजही तितक्यात जोमाने तमाशात फड गाजवतोय़ आतापर्यंत ‘साधू आणि आत्मा कासेगावकर’ या चुलत भावांच्या जोडगोळीने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे. तब्बल १० हजारांवर तमाशाचे प्रयोग करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. तमाशाची कला जिवंत ठेवण्याची साधू व आत्मा (आत्मा आता हयात नाहीत) यांची जिद्द निश्चितच कौतुकास्पद. रंगमंचावर टाळ्यांची, तर शासनदरबारी पुरस्कार-मानधनाची दाद मिळणे एवढेच कलाकारास पुरेसे असते, ही त्यांची भावना. दोघांचाही जन्म खेडेगावातील. लहानपणापासूनच तमाशा कलाप्रकाराबाबत विलक्षण आवड आणि आकर्षण. शिक्षण फक्त तिसरीपर्यंत! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रेरणा घेऊन तमाशा कला जपण्याचे ठरवले. काही तरी वेगळे करून दाखवायचे म्हणून दोर वळणे, झाडू बनवणे हा पिढीजात धंदा बाजूला सारला. दोघांनीही रियाज सुरू केला. त्यातूनच मग ‘साधू-आत्मा कासेगावकर’ हा तमाशाचा फड उभा राहिला. स्थानिक कलाकारांची जुळवाजुळव करून ७५ कलाकारांचा ताफा तयार झाला. सुरुवातीला गाववार यात्रा, उत्सवात कार्यक्रम होऊ लागले आणि १९७६ मध्ये तंबूमधील तमाशाचा फड सुरू केला. हा तंबूचा फड घेऊन सलग १० वर्षे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनील पालथा घातला़ कालांतराने आर्थिक अडचण भासू लागली. त्या वेळी काळू-बाळूची जोडी लोकप्रिय होती. काळू-बाळू यांनी साधू-आत्मा यांना आपल्या तमाशात काम करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. काळू-बाळू, छबू नगरकर, रावसाहेब आकलेकर, शंकर कुलट, चंद्रकांत महाडिक, रोशनबाई सातारकर यांचे लोकनाट्य तमाशे गाजवले. हळूहळू आर्थिक घडी बसू लागली. त्यानंतर, नव्या उमेदीने तमाशाचा फड पूर्ववत उभा केला. भंडारा, नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई, विजापूर, बेळगाव, नांदेड येथे कार्यक्रम केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणार्‍या महोत्सवात आजअखेर १२ वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी ‘साधू-आत्मा’ या जोडीला लाभली आहे. ‘यम’, ‘क्रांतिवीर उमाजी नाईक’, ‘संभाजी घोरपडे’, ‘१८५७ चा दरोडा’, ‘महाराणा प्रताप’ या वगनाट्यांतील साधू-आत्माच्या भूमिकांना रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. याची दखल घेऊन राज्य शासनाने २०१०-११ मध्ये ‘विठाबाई नारायणगावकर स्मृती लोककला जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरव केला. आज आत्मा कासेगावर हयात नाहीत, परंतु साधू कासेगावकर वयाच्या पंचाहत्तरीतही तरुणांना लाजवेल, अशी मेहनत घेऊन तमाशाची कला जोपासत आहेत. तीन मुलांपैकी मुरार आणि बाजीराव हे तमाशा फडामध्ये मदत करतात, तर तिसरा मुलगा पोपट प्राध्यापक आहे.