शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

पंढरपुरात होणार नवे ग्रामीण पोलीस ठाणे, २४ गावांचे कार्यक्षेत्र

By admin | Updated: April 24, 2016 21:26 IST

पोलीस प्रशासनाकडून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे विभाजन करुन नविन पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे सुरु करण्यात येत आहे. पुर्वी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत १०२ गावांचा कार्यभार होता

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. २४ - पंढरपूर तालुक्यातील लोकसंख्येत वारंवार वाढ होत आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या चार यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्याही असल्याने पोलीस यंत्रणेवर जादा ताण पडत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाकडून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे विभाजन करुन नविन पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे सुरु करण्यात येत आहे.  पुर्वी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत १०२ गावांचा कार्यभार होता. मात्र यातील २६ गावांचे विभाजन करुन करकंब पोलीस ठाणे सुरु करण्यात आले. आता पुन्हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे विभाजन करुन २४ गावांसाठी नविन स्वतंत्र ग्रामीण पोलीस ठाणे सुरु करण्यात येणार आहे. यामुळे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र ५२ गावांचे राहिले आहे. यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तत्काळ पोलीसांकडून मदत मिळण्यास होणार आहे.

पंढरपूर येथे नव्याने सुरु होत असलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याला योग्यती जागा मिळत नव्हती. ग्रामीण पोलीस ठाणे इसबावी येथे सुरु करण्याचे पोलीस प्रशासनाकडून ठरविण्यात आले. मात्र त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाल्या. यामुळे आता हे नविन पोलीस ठाणे उजनी सांस्कृतीक हॉलच्या परिसरातील आर.टी.ओ. कॅम्प भरणाऱ्या ठिकाणी हे नविन पोलीस ठाणे सुरु होणार आहे. या पोलीस ठाण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ६३ जणांचा स्टाफ मंजूर आहे.

या जागेत एक पोलीस निरक्षकाची खोली, ग्रामस्थांच्या तक्रारी घेण्यासाठी ठाणे अंमलदारची खोली, तसेच वायरलेस विभागाची एक खोली, पोलीस ठाण्याचे दस्ताऐवज ठेवण्यासाठी एक खोली असणार आहे. असे नविन ग्रामीण पोलीस ठाणे २४ गावांसाठी निर्माण करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिक्षक यांनी सांगितले.

या गावांसाठी पोलीस ठाणेकौठाळी, शिरढोण, वाखरी, शेळवे, खेडभाळवणी, भंडीशेगांवू, तिसंगी, पिराची कुरोली, वाडी कुरोली, गादेगांव, उपरी, सोनके, शेंडगेवाडी, केसरकरवाडी, जैनवाडी, भाळवणी, धोंडेवाडी, सुपली, पळशी, गार्डी, लोणारवाडी, कोर्टी, बोहाळी, उंबरगांव

असा असणार स्टाफपोलीस निरक्षक - १सपोनि. - १पो.उपनि. - ३सपोउनि. - ९पो.हवा. - १५पो.ना. - १५पो.शि. - १९

पालखी मार्गाचे कार्यक्षेत्र; जादा जबाबदारी

नविन सुरु होणाऱ्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पालखी मार्गावरची जादा गावे आहेत. पुर्वी सर्व कर्मचाऱ्यांना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्यून काम करण्याच्या ठिकाणी जावे लागत होते. मात्र हे नविन पोलीस ठाणे यात्रा कालावधीत कमी गर्दी असते, अशा ठिकाणी आहे. यामुळे पालखी मार्गावरील यात्रेत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणात याच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असणार आहे.