शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पंढरपूरात पूर परिस्थिती ; अनेक मंदिरे पाण्याखाली, व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 16:42 IST

१ लाख १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत येत असल्याने पंढरपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे़ भीमा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे़ 

ठळक मुद्दे१ लाख १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीतदोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ भीमा नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीसह इतर सखल भागात पाणी शिरण्याची शक्यतानदीपात्राजवळ प्रशासनाने कोणतीच यंत्रणा लावली नाही़

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर : उजनीतून ७० हजार क्युसेक आणि वीर धरणातून ४५ हजार क्युसेक असे एकूण १ लाख १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत येत असल्याने पंढरपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे़ भीमा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे़ उजनी धरणातून १४ सप्टेंबर रोजी ७० हजार क्युसेक तर वीर धरणातून ४५ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे़ त्यामुळे भीमा नदीत सध्या १ लाख १५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे़  तसेच उजनी धरण व पंढरपूर तालुक्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊ लागली आहे.सध्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून घाटाना पाणी लागले आहे. भीमा नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीसह इतर सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासनाने या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था केली आहे. पंढरपूर शहरासह नदी काठच्या गावातील लोकांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्याच्या तयारीला प्रशासन लागले आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.धोकादायक स्थितीत भाविकांचे स्नानभीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे़ अशी स्थिती असतानाही नदीपात्राजवळ प्रशासनाने कोणतीच यंत्रणा लावली नाही़ पूर परिस्थिती असतानाही भाविक स्नानासाठी नदीत उतरू लागल्याने धोका वाढला आहे. काही भाविक घाटापासून दूर नदी पात्रात जाऊन स्नान करीत आहेत़ मात्र वेगाने पाणी वाहत असल्याने भाविकांना स्नानापासून रोखणे गरजेचे आहे. शिवाय भीमा नदीवर प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणे गरजेचे आहे़