शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

पंचनामा - गजर की गाजर..?

By admin | Updated: February 18, 2017 02:01 IST

नटसम्राट नाटकात अप्पासाहेब बेलवलकर थरथरत्या आवाजात ‘टू बी आॅर नॉट टू बी... जगावं की मरावं... हा एवढा एकच प्रश्न

नटसम्राट नाटकात अप्पासाहेब बेलवलकर थरथरत्या आवाजात ‘टू बी आॅर नॉट टू बी... जगावं की मरावं... हा एवढा एकच प्रश्न आहे...’ असा भारदस्त संवाद म्हणायचे तेव्हा ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे रहायचे..! हल्ली असे रोमांचकारी संवाद अंमळ कमीच तयार होतात. त्यातही निवडणुकीचा मौसम आला की संवाद इतके वाढतात की कधी कधी शब्दही अपुरे पडायला लागतात... तेव्हा कार्यकर्ते, समीक्षक फळं, भाज्या, प्राणी यांचा आधार घेतात. कधी कधी असे आधार चपखल बसतात, तर कधी त्यातून नको ते अर्थही निघतात... या निवडणुकीत असेच काही घडले. काही धमाल आश्वासने देऊन भाजपा केंद्रात सत्तेवर आली. त्याच प्रभावाखाली राज्याच्या निवडणुका झाल्या तेव्हा देखील ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..’ या जाहिरातीने प्रभाव पाडला. सत्तापरिवर्तन झाले. पण केंद्र आणि राज्यात दोन ते तीन वर्षे उलटली तरीही आश्वासने काही पूर्ण होत नाहीत हे पाहून विरोधकांनी या आश्वासनांवर टीका करणे सुरू केले. कितीही टीका केली तरीही सरकारवर काही परिणाम होईना आणि विरोधकांचे शब्दभंडार रिकामे होऊ लागले तसे मग टीकेसाठी भाज्या, फळं यांची मदत घेतली जाऊ लागली. त्यातून भाजपाचे आश्वासनांचे गाजर असा शब्द पुढे जोराने आला. सोशल मीडियाच्या कृपेने हे गाजर घराघरात पोहोचले. एवढेच नाही तर मुंबईत भाजपाच्या एका प्रचार सभेत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांचे भाषण संपताक्षणी पोतं भरुन गाजर आणून वाटली. असाच किस्सा अकोल्यात घडला. तेथे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी शेतकरी संघटनेने गाजरं आणून फुकटात वाटप केली. सडकी अंडी, टोमॅटो फेकून सभांमध्ये निषेध करण्याची जागा गाजर वाटपाच्या अभिनव आंदोलनाने घेतली आणि पाहता पाहता गाजराचा भाव वधारला. प्रचाराच्या या काळात कोणी गाजरं विकत आणून देतो म्हणाले तरी लोक त्याला भाजपाचा प्रचार करतोयस का? असे विचारु लागले. कार्टूनकार देखील गाजराची अनेक रुपं चितारु लागली. आश्वासन किती जूने आणि किती महत्वाचे हे पाहून कार्टूनमधल्या गाजरांचे आकार ठरु लागले. तर भाजपाच्या सभेत फूकट गाजर वाटप करणाऱ्या अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कोणत्या कलमाखाली गुन्हे दाखल करायचे याची चाचपणी सुरु झाली. कोणी तरी सांगितले की भादंवि कलम १७१ यासाठी लागू होऊ शकते. तर कोणी त्यातील १७१ जी हे कलम तर खोटी आश्वासने देणाऱ्या प्रत्येकाला लागू होऊ शकते असे सांगून टाकले.परिणामी सध्या राज्यभर गाजराचा गजर सुरु झाला. याचा तीव्र प्रभाव भाजपाच्या महिला मोर्चाचे पोस्टर बनविणाऱ्या एका आर्टीस्टवरही झाला. त्याने मग हे वास्तव आपल्या पोस्टरवर शब्दबद्ध केले. भाजपाने निवडणुकीच्या निमित्ताने महिला प्रचार दिवसाचे आयोजन केले होते. त्याच्या पोस्टरवर (४ वाजता होणार सुरुवात ‘‘स्त्रीशक्तीच्या गाजराची’’) असे छापून टाकले गेले. अर्थात स्त्रीशक्तीच्या गजराची सुरुवात असे हवे होते. पण आता गाजराची नाही गजराची हे कितीही गजर करुन सांगितले तरी कोणाला खरे वाटेना हे सांगता सांगता भाजपा नेत्यांची पुरेवाट झालीय. काहींनी तर शिवसेनेनेच हे असले बनावट पोस्टर बनवून आमची बदनामी केलीय असाही दावा केलाय. काही असो, गाजरांना चांगले दिवस आल्याने काहींनी गाजर एक गरज, असा अभ्यासपूर्ण विवेचनाचा कार्यक्रम आयोजित केल्याची खबर आहे. भाजपाने पत्रकार परिषदेनंतरच्या जेवणाच्या मेन्यूमधूनही यंदा गाजराचा हलवा काढून टाकल्याची माहिती आहे...- अतुल कुलकर्णी -