शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

सांडपाण्याने पंचगंगेची गटारगंगा

By admin | Updated: June 4, 2015 04:13 IST

कोल्हापूर व इचलकरंजीमधील नागरी वसाहतीतील मैला व सांडपाणी हेच पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचे सर्वांत महत्त्वाचे व मुख्य कारण आहे.

विश्वास पाटील, कोल्हापूरकोल्हापूर व इचलकरंजीमधील नागरी वसाहतीतील मैला व सांडपाणी हेच पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचे सर्वांत महत्त्वाचे व मुख्य कारण आहे. नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यापैकी तब्बल ८७.५७ टक्के पाणी कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका व परिसरातील गावांमधून येते. तर उद्योगांपासून निर्माण होणाऱ्या प्रदूषित पाण्याचे प्रमाण १२.४३ टक्के इतके आहे. प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.प्रदूषण रोखण्याची कायद्याने सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या घटकांनीच नदीची गटारगंगा केली आहे. ‘पर्यावरण दिना’च्या (५ जून) पार्श्वभूमीवर पंचगंगेच्या सद्य:स्थितीचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गतवर्षी पंचगंगा नदी प्रदूषणाचा अत्यंत तपशीलवार कृती आराखडा केला. त्यामध्ये तीन स्थानिक स्वराज्य संस्थांनाच प्रदूषणासाठी जबाबदार धरण्यात आले. उच्च न्यायालयातील याचिकेमध्येही हाच मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. न्यायालयाने प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी ‘नॅशनल एनव्हार्यमेंटल इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ची (निरी) समिती नियुक्त केली. समितीने केलेल्या शिफारशी व उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे प्रदूषण रोखण्याची कार्यवाही काही प्रमाणात सुरू झाली, परंतु त्यास अपेक्षित वेग नाही. कोल्हापूर व इचलकरंजी वगळता इतर भागांत मैला व सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा नाही. कोल्हापूरमध्ये फक्त एकतृतीयांश भागातच मैलावाहिन्या आहेत. येथे ४३.५ दशलक्ष लिटर पाण्यावरच प्राथमिक प्रक्रिया होते. उर्वरित पाणी गेल्या २५ वर्षांपासून प्रक्रियेशिवायच नदीत मिसळत आहे. इचलकरंजीने २० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची यंत्रणा उभारली. मात्र, त्यातही १२ दशलक्ष लिटर सांडपाण्यावरच प्रक्रिया होते. उर्वरित प्रदूषित पाणी नदीत मिसळते.