शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पणजी महापालिका भाजपाच्या हातातून निसटली

By admin | Updated: March 8, 2016 13:14 IST

राजधानी पणजीची महापालिका भाजपाच्या हातातून निसटली आणि महापालिकेवर आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या गटाने 17 जागा मिळवून निर्विवाद यशाचा झेंडा फडकावला

ऑनलाइन लोकमत - 
पणजी, दि. ८ - पणजी महापालिकेची सत्ता भाजपाच्या हातातून निसटली आहे. देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी पणजी महापालिका निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची होती कारण हा सगळा भाग पणजी विधानसभा मतदार संघात येतो. आणि या मतदार संघातून सलग 5 वेळा पर्रिकर निवडून आले होते. मात्र राजधानी पणजीची महापालिका भाजपाच्या हातातून निसटली आणि महापालिकेवर आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या गटाने 17 जागा मिळवून निर्विवाद यशाचा झेंडा फडकावला. 
भाजपाला केवळ 13 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही पण मोन्सेरात हे अलिकडेच काँग्रेसमधून हकालपट्टी केले गेलेले आमदार आहेत. त्यांनी या महापालिका निवडणूकीत काँग्रेस आणि भाजपाचा पराभव केला आहे. एक़ूण 30 प्रभागातून 14 महिला विजयी ठरल्या आहेत. 
 
महापालिका निवडणूक विश्लेषण
 
पणजी : गोवा विधानसभेच्या निवडणूका पुढील केवळ 12 महिन्यात होणार आहेत. अशावेळी गोव्यातील एकमेव अशा राजधानीतील पणजी महापालिका निवडणूकीत भाजपाचा पराभव होणे हा गोव्यात सत्तेवर असलेल्या भाजपासाठी चिंतेचा विषय ठरतो. भाजपाच्या विरोधात असलेले काँग्रेस आणि अन्य सर्व पक्ष यांचा आत्मविश्वास वाढविणारा निकाल महापालिका निवडणूकीत लागला आहे. भाजपा विरोधात विविध लहानमोठे पक्ष एकत्रित येण्याची प्रक्रिया यामुळे सुरु होईल. असे राजकीय अभ्यासकांकडून मानले जाते. 
या महापालिका निवडणूकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, आमदार सिद्धार्थ कुंकळय़ेकर, बाबूश मोन्सेरात, पांडुरंग मडकईकर यांच्यासह तीन पक्षांच्या एकूण सात आमदारांनी भाग घेतला. विधानसभा निवडणूकीची ही सेमी फायनल असल्याप्रमाणो प्रचारकाम केले गेले. स्वत: संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शेवटच्या टप्प्यात भाजपचे बुडते जहाज सांभाळण्यासाठी पणजीत दोन दिवस तळ ठोकला होता. पणजीतील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांना त्यांनी फोन करुन भाजपाला मत द्या असे आवाहन केले होते. भाजपा गटाचा जाहिरनामाही पर्रिकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. महापालिकेवर भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वास पर्रिकर यांनी व्यक्त केला होता. पणजीचे महापौरपद भाजपाकडे होते. तरीही मतदारांनी आता भाजपला महापालिकेतून सत्तेपासून दूर ठेवले आहे. भाजपामध्ये याविषयी गंभीर चिंतन आता सुरु झाले आहे. काँग्रेसचे बळ वाढले नाही पण बाबूश मोन्सेरात, विश्वजीत राणो, विजय सरदेसाई, रोहन खवटे असे समविचारी आणि धर्मनिरपेक्ष विचारप्रणाली मांडणारे नेते एकत्र येण्याची प्रक्रिया महापालिका निवडणूक निकालाने सुरु केली. महिला शक्तीनेही 30 पैकी 14 जागा जिंकत महापालिकेच्या राजकारणात आपला करिष्मा दाखवला.