शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

पणजी महापालिका भाजपाच्या हातातून निसटली

By admin | Updated: March 8, 2016 13:14 IST

राजधानी पणजीची महापालिका भाजपाच्या हातातून निसटली आणि महापालिकेवर आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या गटाने 17 जागा मिळवून निर्विवाद यशाचा झेंडा फडकावला

ऑनलाइन लोकमत - 
पणजी, दि. ८ - पणजी महापालिकेची सत्ता भाजपाच्या हातातून निसटली आहे. देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी पणजी महापालिका निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची होती कारण हा सगळा भाग पणजी विधानसभा मतदार संघात येतो. आणि या मतदार संघातून सलग 5 वेळा पर्रिकर निवडून आले होते. मात्र राजधानी पणजीची महापालिका भाजपाच्या हातातून निसटली आणि महापालिकेवर आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या गटाने 17 जागा मिळवून निर्विवाद यशाचा झेंडा फडकावला. 
भाजपाला केवळ 13 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही पण मोन्सेरात हे अलिकडेच काँग्रेसमधून हकालपट्टी केले गेलेले आमदार आहेत. त्यांनी या महापालिका निवडणूकीत काँग्रेस आणि भाजपाचा पराभव केला आहे. एक़ूण 30 प्रभागातून 14 महिला विजयी ठरल्या आहेत. 
 
महापालिका निवडणूक विश्लेषण
 
पणजी : गोवा विधानसभेच्या निवडणूका पुढील केवळ 12 महिन्यात होणार आहेत. अशावेळी गोव्यातील एकमेव अशा राजधानीतील पणजी महापालिका निवडणूकीत भाजपाचा पराभव होणे हा गोव्यात सत्तेवर असलेल्या भाजपासाठी चिंतेचा विषय ठरतो. भाजपाच्या विरोधात असलेले काँग्रेस आणि अन्य सर्व पक्ष यांचा आत्मविश्वास वाढविणारा निकाल महापालिका निवडणूकीत लागला आहे. भाजपा विरोधात विविध लहानमोठे पक्ष एकत्रित येण्याची प्रक्रिया यामुळे सुरु होईल. असे राजकीय अभ्यासकांकडून मानले जाते. 
या महापालिका निवडणूकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, आमदार सिद्धार्थ कुंकळय़ेकर, बाबूश मोन्सेरात, पांडुरंग मडकईकर यांच्यासह तीन पक्षांच्या एकूण सात आमदारांनी भाग घेतला. विधानसभा निवडणूकीची ही सेमी फायनल असल्याप्रमाणो प्रचारकाम केले गेले. स्वत: संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शेवटच्या टप्प्यात भाजपचे बुडते जहाज सांभाळण्यासाठी पणजीत दोन दिवस तळ ठोकला होता. पणजीतील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांना त्यांनी फोन करुन भाजपाला मत द्या असे आवाहन केले होते. भाजपा गटाचा जाहिरनामाही पर्रिकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. महापालिकेवर भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वास पर्रिकर यांनी व्यक्त केला होता. पणजीचे महापौरपद भाजपाकडे होते. तरीही मतदारांनी आता भाजपला महापालिकेतून सत्तेपासून दूर ठेवले आहे. भाजपामध्ये याविषयी गंभीर चिंतन आता सुरु झाले आहे. काँग्रेसचे बळ वाढले नाही पण बाबूश मोन्सेरात, विश्वजीत राणो, विजय सरदेसाई, रोहन खवटे असे समविचारी आणि धर्मनिरपेक्ष विचारप्रणाली मांडणारे नेते एकत्र येण्याची प्रक्रिया महापालिका निवडणूक निकालाने सुरु केली. महिला शक्तीनेही 30 पैकी 14 जागा जिंकत महापालिकेच्या राजकारणात आपला करिष्मा दाखवला.