शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

By admin | Updated: June 27, 2016 01:05 IST

संत तुकाराममहाराज यांची पालखी येत्या बुधवारी म्हणजेच २९ जून रोजी पुण्यात येत असल्याने शहरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू

पुणे : महाराष्ट्राची परंपरा सांगणारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराममहाराज यांची पालखी येत्या बुधवारी म्हणजेच २९ जून रोजी पुण्यात येत असल्याने शहरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू आहे. एकीकडे राज्यात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, पेरणी करून हा वर्ग वारीत सहभागी होणार आहे. शहराच्या मध्यवस्तीतील संत तुकाराममहाराजांची पालखी थांबते त्या निवडुंगा विठोबा मंदिरातील तसेच ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी उतरते त्या पालखी विठोबा मंदिरातील पालखीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराच्या बाजूच्या इमारतीत असणाऱ्या हॉलमध्ये या २ दिवसांत ४ ते ५ हजार वारकरी उतरत असल्याने हॉलचीही साफसफाई करण्यात आली. याबरोबरच अन्नदानाची भांडीही स्वच्छ करून ठेवल्याचे पाध्ये यांनी सांगितले. पालखी काळात महानगरपालिकेतर्फे उत्तम प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यामध्ये मांडव, पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट, महावितरणतर्फे या भागातील विजेची सोय, जनरेटर अशा सर्व व्यवस्था उत्तम पद्धतीने करण्यात येतात. आरोग्य विभागातर्फेही या काळात विशेष साफसफाई व औषधफवारणी मोहीम राबविण्यात येत येते.>कमानींची स्वच्छतारविवारी मंदिराची डागडुजी, मांडव व इलेक्ट्रिसिटीचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र होते. निवडुंगा विठोबा मंदिरातील पालखीची तयारी १० जूनपासून चालू झाल्याचे येथील पुजारी आनंद पाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंदिराच्या आवारातील सभामंडपात असणाऱ्या चांदी व पितळ्याच्या कमानी धुवून-पुसून घेण्यात आल्या आहेत. तसेच भिंती व बाजूचा परिसर साफ करण्याचे काम चालू असल्याचे दिसले.>इंद्रायणीकाठी वैष्णवांचा मेळाआळंदी : ‘माज्या जीवाचे आवडी... पंढरपुरा नेईन गुढी’ असे म्हणत मोठ्या भक्तिभावाने हाती भगव्या पताका, मुखाने हरिनामाचा व हाताने टाळ-मृदंगांचा गजर करीत लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले असून, माऊलींच्या नामघोषाने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या १८६व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवारी (२८ जून) होणार असून, सोहळ्यासाठी हजारो वारकरी दाखल झाले आहेत. माऊलींच्या समाधी दर्शनासाठी वारकऱ्यांनी रविवारी गर्दी केली होती. ही रांग दीड किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. यंदाच्या पालखी सोहळ्यात साडेचारशेच्या आसपास दिंड्या सहभागी होणार असून, त्या मागे वीस एक नव्याने सुरू झालेल्या नोंदणी नसलेल्या दिंड्या असणार आहेत. आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक व इतर राज्यांतून विविध दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. आळंदीत दाखल झालेले वारकरी इंद्रायणीत मोठ्या भक्तिभावाने स्नान करीत होते. दर्शनासाठी भक्तिसोपान पुलावरून दर्शनबारीची सोय केली आहे. गर्दी वाढल्याने ही रांग सुमारे दीड किलोमीटर गेली होती. यंदा नव्यानेच उभारण्यात आलेल्या दर्शनबारीमुळे भक्तांचे दर्शन सुखकर झाले आहे. वारकऱ्यांना पाणी व्यवस्थित व चांगले मिळावे, यासाठी नगरपालिकेच्या वतीने २४ तास पाणीपुरवठा करण्यात येत असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही काही भागात पाणीपुरवठा केला जात आहे. (वार्ताहर)यंदा पंढरीची वारी ‘आयटी’तपुणे : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींचा वारीत सहभाग वाढत असून, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रविवारी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात कार्यशाळा झाली़ दोन वर्षांपासून वारीमध्ये आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण-तरुणी आयटी दिंडीच्या माध्यमातून सहभागी होत आहेत़ ज्याप्रमाणे वारकरी हरिनामाचा गजर करतात़ भजन करतात. तसे आयटी दिंडीतील सहभागी तरुणांना करता यावे, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते़ सहभागी तरुण-तरुणींना भजन करण्यास व लयीत टाळ कसा वाजवायचा शिकविण्यात आले़ ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल जल विठ्ठल निर्मल विठ्ठल...’ असा संदेश घेऊन ९०० जण यंदा वारीत सहभागी होणार आहेत़ ताणावात जगणाऱ्या आयटीयन्सना अध्यात्माचा आनंद मिळावा, या उद्देशाने दिंडी या सोहळ्यात सहभागी होणार आहे़ दागिन्यांना झळाळी देण्याचे काम यावर्षीच्या वारीत निर्मल वारी म्हणजेच स्वच्छता अभियानावर भर असल्याने जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालखी विठोबा मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रमोद बेंगरुट म्हणाले. रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली असून, विठ्ठल-रुक्मिणीच्या दागिन्यांना झळाळी देण्याचे काम चालू होते. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले असून, त्यांचे याठिकाणी टेस्टिंग चालू होते. या दोन प्रमुख मंदिरांबरोबरच शहरातील सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे यांच्याकडूनही वारकऱ्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येते. मध्यवस्तीत ठिकठिकाणी अशाप्रकारची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र होते. त्यामुळे ज्ञानोबा, तुकाबांच्या पालख्यांसाठी व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज असल्याचे दिसून आले. >‘अतिथी देवो भव’ची संस्कृतीजगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देहूनगरीत दाखल होणारे भाविक म्हणजे ग्रामस्थांचे अथितीच असतात. ‘अतिथी देवो भव’च्या भारतीय संस्कृतीप्रमाणे देहूत वारकरी आणि भाविकांना अन्नदान करण्याची संस्कृती चांगलीच रुजली आहे. घरोघरी वारकऱ्यांना अन्नदानाची परंपरा असलेल्या गावातील काही मंडळे आता मोठ्या स्वरूपात आयोजन करीत आहेत. पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेला भाविक, वारकऱ्यांना उपाशीपोटी झोपावे लागू नये, या विचारातून २३ वर्षांपूर्वी गावातील काही तरुणांनी गावातील हनुमान मंदिरात छोट्या प्रमाणात अन्नदान सुरू केले.