शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

‘पालखीचे भोई’ हरपले!

By admin | Updated: September 24, 2014 05:09 IST

सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

काव्यक्षेत्रातील ‘सर’ शंकर वैद्य यांचे निधन

मुंबई : ‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला’, ‘दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला’ अशा अनेक अजरामर काव्यपंक्तींनी गेली अनेक दशके काव्य रसिकांच्या मनावर राज्य करणारे आणि काव्यक्षेत्रात ‘सर’ म्हणून ओळखले जाणारे कविवर्य शंकर वैद्य यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा निरंजन, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी दीडच्या सुमारास त्यांचे पार्थिव दादर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तिथे रामदास भटकळ, अचला जोशी, अरुण म्हात्रे, विसुभाऊ बापट, उषा तांबे आदी मान्यवरांसह अनेक साहित्यप्रेमींनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. वैद्य यांचा जन्म १५ जू्न १९२८ रोजी पुण्यातील ओतूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जुन्नरमध्ये झाले. तिथे कवी वा. ज्यो. देशपांडे यांच्या सान्निध्यात त्यांची कविता फुलत गेली. त्यांच्याच ‘स्वस्तिका’ या काव्यसंग्रहाचे संपादनही त्यांनी केले. ‘पालखीचे भोई... आम्ही पालखीचे भोई’ ही त्यांची कविता प्रसिद्ध होती. भावनाशील कवी म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांचे ‘कालस्वर’, ‘दर्शन’, ‘सांजगुच्छ’, ‘मैफल’, ‘पक्षांच्या आठवणी’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी कुसुमाग्रजांच्या ‘रथयात्रा’ व ‘प्रवासी पक्षी’ या पुस्तकांचे हिंदी रूपांतर केले आहे. (प्रतिनिधी)