शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

पालघरचे शेतकरी इस्त्रायलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2016 03:10 IST

शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याकरता वसई तालुक्यातील २२ शेतकरी रविवारी इस्त्रायल दौऱ्यावर जात आहेत.

वसई: शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याकरता वसई तालुक्यातील २२ शेतकरी रविवारी इस्त्रायल दौऱ्यावर जात आहेत. पालघर जिल्ह्यात सोमवंशी क्षत्रिय समाजाची लोकसख्या सर्वाधिक आहे. या समाजाचा मुख्य उद्योग म्हणजे शेतीवाडी आहे. आज ह्या समाजातील शेतकरी अभ्यासू आणि प्रयोगशील आहे. पिढीजात शेती करीत असताना कुटुंबाची गुजराण करण्याचे साधन असे न बघता आधुनिकतेची कास धरुन शेती हा उद्योग जास्तीत जास्त फायदेशीर कसा होईल, याकडे सतत पाठपुरावा निरनिराळ्या प्रयोगाद्वारे नेहमीच शेतीमध्ये प्रगती करीत आहे. राहुरी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु पद्माश्री हरिश्चंद्र गोपाळराव पाटील यांनी जपानी शेती भारतात प्रथम रुजवणाऱ्या समाजाच्या सुपुत्राने भाताच्या उत्पन्नात क्रांती घडवून आणली. जागतिक पातळीचे थोर कृषीतज्ञ व भारत सरकार नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. जयंतराव पाटील तसेच निसर्गशेतीचे गाढे पुरस्कर्ते गांधीवादी निसर्गमित्र व बजाज पारितोषिक सन्मानित स्व. भास्कर सावे अशा कितीतरी समाजातील कृषीतज्ञ व्यक्तींनी शेतीच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावतच नेला. शेतीमधील या महान व्यक्तींचा पाठपुरावा करुन देहेरी पासून वसई पर्यंतच्या या शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञान, आधुनिकता व अभ्यासू वृत्ती अंगिकारुन शेती व्यवसायामध्ये एक निराळा ठसा उमटवला इतकेच नव्हे क्रांती घडवली. शेतीमध्ये जे जे काही नवीन आहे ते अंगिकारण्याची वृत्ती बाळगून नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याच्या मागे अभ्यासू वृत्तीने प्रयत्नशील राहतात. आज समाजातील उच्च विद्याविभूषित तरुणही नोकरीच्या मागे न धावता मोठ्या प्रमाणात शेती, भाजीपाला, फळे बागायती व्यवसाय करु लागला आहे.>नवनवे प्रयोग अन आधुनिकतेची कास धरणारदेहेरी, बोर्डी, डहाणू भागातील चिकू बागा, लिचीची लागवड, फळबागा, चिंंचणी, तारापूर, वाणगांव पट्टयातून भोपळी मिरची - केळीच्या बागा, फुलबागा आणि भाजीपाल्याचे मळे फुलवून वाणगांव पॅटर्न निर्माण केला. आगाशी, वसई भागांतील फुलबागा, राजेळी केळी व त्यापासून निर्माण होणारी सुकेळी अशा कितीतरी पॅटर्नने परिपूर्ण असलेला हा समाज आहे. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे अध्यक्ष विलास चोरघे यांच्यामुळे २२ शेतकरी इस्त्रायलच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आमच्या भागातील शेतकरी हा नेहमीच अभिमानाने म्हणतो की, कोण म्हणतो शेती परवडत नाही ? अतिवृष्टी असो किंवा दुष्काळ असो आमचा शेतकरी हा उत्तमच पिक घेतो. आत्महत्या हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही किंबहुना असा विचार कोसो दूर असतो. ही सहल शेतकऱ्यांना बरेच काही देऊन जाईल असे चोरघे यांनी सांगितले.