शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

पालघरचे शेतकरी इस्त्रायलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2016 03:10 IST

शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याकरता वसई तालुक्यातील २२ शेतकरी रविवारी इस्त्रायल दौऱ्यावर जात आहेत.

वसई: शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याकरता वसई तालुक्यातील २२ शेतकरी रविवारी इस्त्रायल दौऱ्यावर जात आहेत. पालघर जिल्ह्यात सोमवंशी क्षत्रिय समाजाची लोकसख्या सर्वाधिक आहे. या समाजाचा मुख्य उद्योग म्हणजे शेतीवाडी आहे. आज ह्या समाजातील शेतकरी अभ्यासू आणि प्रयोगशील आहे. पिढीजात शेती करीत असताना कुटुंबाची गुजराण करण्याचे साधन असे न बघता आधुनिकतेची कास धरुन शेती हा उद्योग जास्तीत जास्त फायदेशीर कसा होईल, याकडे सतत पाठपुरावा निरनिराळ्या प्रयोगाद्वारे नेहमीच शेतीमध्ये प्रगती करीत आहे. राहुरी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु पद्माश्री हरिश्चंद्र गोपाळराव पाटील यांनी जपानी शेती भारतात प्रथम रुजवणाऱ्या समाजाच्या सुपुत्राने भाताच्या उत्पन्नात क्रांती घडवून आणली. जागतिक पातळीचे थोर कृषीतज्ञ व भारत सरकार नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. जयंतराव पाटील तसेच निसर्गशेतीचे गाढे पुरस्कर्ते गांधीवादी निसर्गमित्र व बजाज पारितोषिक सन्मानित स्व. भास्कर सावे अशा कितीतरी समाजातील कृषीतज्ञ व्यक्तींनी शेतीच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावतच नेला. शेतीमधील या महान व्यक्तींचा पाठपुरावा करुन देहेरी पासून वसई पर्यंतच्या या शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञान, आधुनिकता व अभ्यासू वृत्ती अंगिकारुन शेती व्यवसायामध्ये एक निराळा ठसा उमटवला इतकेच नव्हे क्रांती घडवली. शेतीमध्ये जे जे काही नवीन आहे ते अंगिकारण्याची वृत्ती बाळगून नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याच्या मागे अभ्यासू वृत्तीने प्रयत्नशील राहतात. आज समाजातील उच्च विद्याविभूषित तरुणही नोकरीच्या मागे न धावता मोठ्या प्रमाणात शेती, भाजीपाला, फळे बागायती व्यवसाय करु लागला आहे.>नवनवे प्रयोग अन आधुनिकतेची कास धरणारदेहेरी, बोर्डी, डहाणू भागातील चिकू बागा, लिचीची लागवड, फळबागा, चिंंचणी, तारापूर, वाणगांव पट्टयातून भोपळी मिरची - केळीच्या बागा, फुलबागा आणि भाजीपाल्याचे मळे फुलवून वाणगांव पॅटर्न निर्माण केला. आगाशी, वसई भागांतील फुलबागा, राजेळी केळी व त्यापासून निर्माण होणारी सुकेळी अशा कितीतरी पॅटर्नने परिपूर्ण असलेला हा समाज आहे. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे अध्यक्ष विलास चोरघे यांच्यामुळे २२ शेतकरी इस्त्रायलच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आमच्या भागातील शेतकरी हा नेहमीच अभिमानाने म्हणतो की, कोण म्हणतो शेती परवडत नाही ? अतिवृष्टी असो किंवा दुष्काळ असो आमचा शेतकरी हा उत्तमच पिक घेतो. आत्महत्या हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही किंबहुना असा विचार कोसो दूर असतो. ही सहल शेतकऱ्यांना बरेच काही देऊन जाईल असे चोरघे यांनी सांगितले.