शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मार्चपर्यंत पालघर जिल्हा हागणदारीमुक्त

By admin | Updated: July 20, 2016 03:52 IST

पालघर जिल्हा मार्च २०१७ पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटेकोर नियोजना बरोबरच

पालघर : पालघर जिल्हा मार्च २०१७ पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटेकोर नियोजना बरोबरच शिस्तबध्द पध्दतीने अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले. युनिसेफ तर्फे सोमवारी मनोर येथे स्वच्छता व सुरक्षितता (वर्कशॉप आॅन सॅनिटेशन अ‍ॅण्ड हायजिन) या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक शारदा राऊत, जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, युनिसेफचे युसुफ कबीर तसेच पालघरमधील पाणी व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, महिला बालविकास विभाग या विभागांचे अधिकारी तसेच सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी स्वयंसेवी संस्था, उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल असा विश्वास प्रत्येक अधिकाऱ्याला वाटणे गरजेचे असल्याचे बांगर म्हणाले. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण लोकवस्त्यांमधील ८५ टक्के आदिवासी वस्ती असून ग्रामीण भागातील समस्या वैशिष्ट्यपूर्ण व वेगळ्या आहेत. कुपोषण, बालमृत्यूंच्या प्रश्नांसोबत अधिकारी वर्गाने हागणदारी मुक्तीचा विषय गांभीर्याने हाताळला पाहिजे. गटविकास अधिकाऱ्यांनी फिल्ड व्हिजिट व या कामांसाठी विशेष दौऱ्यांचे आयोजन करणे, विशेष ग्रामसभांचे आयोजन करणे, झालेल्या कामांचे आॅडिट करून घेणे, तसेच सगळ्यांचा सहभाग करून घेतल्यास जिल्हा ठरलेल्या वेळेत हागणदारी मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला. याकामी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभेल असेही बांगर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)>लोक सहभागावर भर तीन टप्प्यांचे नियोजनमार्च २०१७ पर्यंत संपूर्ण पालघर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठेवले असून ते साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सामाजिक व सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था उद्योगांतील सीएसआर फंड, बचत गट, माध्यम व लोकसहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. तलासरी तालुका हा हागणदारी मुक्त जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर असून जिल्ह्यातील इतर तालुके हे येत्या मार्च अखेरीस हागणदारी मुक्त करण्यासाठी तीन टप्प्यांचे नियोजन केल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली. ‘स्वच्छ पाडा, स्वच्छ घर, निर्मल आपले पालघर’ हे घोषवाक्य जाहीर करण्यात आले असून ते साध्य करण्यासाठी विविधस्तरांवर प्रयत्न केले जाणार असल्याचे त्या पुढे म्हणाल्या. हागणदारी मुक्त जिल्हा ही लोकचळवळ होण्यासाठी विद्यार्थी, माध्यम व इतर घटकांचा सहभाग करून घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.