शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

मार्चपर्यंत पालघर जिल्हा हागणदारीमुक्त

By admin | Updated: July 20, 2016 03:52 IST

पालघर जिल्हा मार्च २०१७ पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटेकोर नियोजना बरोबरच

पालघर : पालघर जिल्हा मार्च २०१७ पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटेकोर नियोजना बरोबरच शिस्तबध्द पध्दतीने अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले. युनिसेफ तर्फे सोमवारी मनोर येथे स्वच्छता व सुरक्षितता (वर्कशॉप आॅन सॅनिटेशन अ‍ॅण्ड हायजिन) या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक शारदा राऊत, जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, युनिसेफचे युसुफ कबीर तसेच पालघरमधील पाणी व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, महिला बालविकास विभाग या विभागांचे अधिकारी तसेच सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी स्वयंसेवी संस्था, उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल असा विश्वास प्रत्येक अधिकाऱ्याला वाटणे गरजेचे असल्याचे बांगर म्हणाले. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण लोकवस्त्यांमधील ८५ टक्के आदिवासी वस्ती असून ग्रामीण भागातील समस्या वैशिष्ट्यपूर्ण व वेगळ्या आहेत. कुपोषण, बालमृत्यूंच्या प्रश्नांसोबत अधिकारी वर्गाने हागणदारी मुक्तीचा विषय गांभीर्याने हाताळला पाहिजे. गटविकास अधिकाऱ्यांनी फिल्ड व्हिजिट व या कामांसाठी विशेष दौऱ्यांचे आयोजन करणे, विशेष ग्रामसभांचे आयोजन करणे, झालेल्या कामांचे आॅडिट करून घेणे, तसेच सगळ्यांचा सहभाग करून घेतल्यास जिल्हा ठरलेल्या वेळेत हागणदारी मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला. याकामी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभेल असेही बांगर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)>लोक सहभागावर भर तीन टप्प्यांचे नियोजनमार्च २०१७ पर्यंत संपूर्ण पालघर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठेवले असून ते साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सामाजिक व सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था उद्योगांतील सीएसआर फंड, बचत गट, माध्यम व लोकसहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. तलासरी तालुका हा हागणदारी मुक्त जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर असून जिल्ह्यातील इतर तालुके हे येत्या मार्च अखेरीस हागणदारी मुक्त करण्यासाठी तीन टप्प्यांचे नियोजन केल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली. ‘स्वच्छ पाडा, स्वच्छ घर, निर्मल आपले पालघर’ हे घोषवाक्य जाहीर करण्यात आले असून ते साध्य करण्यासाठी विविधस्तरांवर प्रयत्न केले जाणार असल्याचे त्या पुढे म्हणाल्या. हागणदारी मुक्त जिल्हा ही लोकचळवळ होण्यासाठी विद्यार्थी, माध्यम व इतर घटकांचा सहभाग करून घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.