शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

पाकिस्तानची साखर मुंबईत, ३० हजार क्विंटलची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 05:01 IST

ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र

राजाराम लोंढेकोल्हापूर : ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फायदा उठवित मुंबईतील एका बड्या उद्योग समुहाने ३० हजार क्विंटल साखरेची आयात केली आहे.विशेष म्हणजे पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा एक रुपयांनी कमी आहेत. कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. पनवेल आणि वाशी येथील गोदामामध्ये ती ठेवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात ३१६ लाख टन यंदा साखरेचे उत्पादन, तर गेल्या वर्षीचे ४० लाख टन साखर शिल्लक आहे. एफआरपीप्रमाणे पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. शेतकरी, साखर कारखानदारांच्या रेट्यानंतर केंद्राने निर्यात अनुदानाची घोषणा करीत आयात शुल्क वाढविले. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर स्थिर होतील, अशी अपेक्षा असतानाच पाकिस्तानची साखर आयात झाली.सहा महिने ‘रेक’ मोकळीचकोल्हापुरातून रोज २६०० टन साखर रेक (रेल्वे) मधून पंजाब, पश्चिम बंगाल, गुवाहाटी आदी राज्यांत जात होती; पण गेल्या सहा महिन्यांपासून एकही रेक जाऊ शकलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.‘पाकची साखर शेतकºयांना उद्ध्वस्त करणारी’ठाणे : भारतीयांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकचा माल आयात करण्याचे नवे धोरण भाजपा सरकारने आखले आहे. ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. ऊस उत्पादक शेतकरी हमीभावासाठी आक्रोश करत असताना, पाकिस्तानातील साखर येथे आणून आमच्या शेतकºयांना उद्ध्वस्त केले जात आहे. पाकची ही साखर आमच्या देशात विकू देणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे. ही साखर येथील बाजारभावापेक्षा एक रुपयाने कमी किमतीची आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा आमदार आव्हाड यांनी दिलेल्या पत्रकात समाचार घेतला.पाकिस्तानची साखर आयात का केली ?-राजू शेट्टीपुणे : साखरेचे चांगले उत्पादन झाले आहे. तरी पाकिस्तानमधून मुंबईमध्ये साखर का आणली गेली, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. दिवसेंदिवस साखरेचे दर कमी होत असताना निर्यातीपेक्षा पाकिस्तानमधून आयात करण्यावर भर का दिला जात आहे. त्यावरून शेतकºयांची सरकारला किती काळजी आहे, ते समजतेय, असा टोलाही त्यांनी लगावला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४४ व्या ज्ञानसत्रात सदाशिवराव पिंगळे स्मृती व्याख्यानात बळीराजाला-दयेची नाही तर न्यायाची गरज आहे, या विषयाची शेट्टी यांनी मांडणी केली.शेट्टी म्हणाले, आपल्या देशात टोमॅटो ५ रुपये किलोने विकला जात होता. तेव्हा पाकिस्तानात २०० रुपये किलो दर होता. तरी त्यांनी शत्रू राष्टÑाकडून टोमॅटो घ्यायचा नाही, अशी भूमिका घेतली होती. आपण मात्र त्यांच्याकडून साखर आयात करत आहोत. शेतकºयांच्या मालाला भाव मिळू नये, असे धोरण राज्यकर्त्यांनी केले आहे. आपली मते पक्की करण्यासाठी शेतकºयांचा बळी देऊन सर्वसामान्यांना खुश ठेवण्यात राज्यकर्ते यशस्वी झाले असल्याचेही शेट्टी म्हणाले.आयात शुल्कात पळवाट काढून अशा प्रकारे साखर देशात आल्याने साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आयातीबाबत कडक पावले उचलली नाही तर हा उद्योग उद्ध्वस्त होईलच, पण शेतकरीही देशोधडीला लागेल.- पी. जी. मेढे, तज्ज्ञ,साखर उद्योग, कोल्हापूर